Homeमुंबई स्पेशल‘इंडिया’च्या बैठकीत ठरणार...

‘इंडिया’च्या बैठकीत ठरणार आघाडीचा संयोजक?

भारतीय जनता पार्टीच्या आघाडीला केंद्रातल्या सत्तेतून हुसकावून लावण्याकरीता तयार करण्यात आलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीची दोन दिवसीय तिसरी बैठक उद्यापासून मुंबईत सुरू होत असून यामध्ये आघाडीचा संयोजक निवडला जाण्याची शक्यता आहे. याच बैठकीत घाडीचा किमान समान कार्यक्रमही तयार करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे समजते.

आज यानिमित्ताने राज्यातल्या महाविकास घाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आदी नेत्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. देशातली कायदा-सुव्यवस्था तसेच महागाईच्या मुद्द्यावर यावेळी सर्व पक्षांच्या नेत्यांनी भर दिला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू केलेली नाही. पहिल्या दोन बैठका झाल्या, त्या महत्त्वाच्या होत्या. उद्याच्या बैठकीत इथून पुढे सामूहिक कार्यक्रम काय असावा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. असा निर्णय झाला तर काही लोकांवर ही जबाबदारी द्यावी लागेल. अन्य राजकीय घटकपक्षांशी संवाद साधून यातून आपण एकत्र पुढे जाऊ शकतो का यासंदर्भातील अभ्यास करण्याबाबत काही लोकांवर जबाबदारी सोपवावी लागेल, असे शरद पवार यांनी सांगितले.

इंडिया आघाडीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार, जागावाटप कसे होणार, संयोजक कोण असणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. इंडिया आघाडीला अद्यापही संयोजक ठरवता आला नाही, ते पंतप्रधान काय ठरवणार अशी टीका भाजपाकडून सातत्याने केली जात आहे. यावर प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले की, इंडिया आघाडीच्या संयोजकासाठी आम्ही किमान समान कार्यक्रम करू शकतो. या आधारे संयोजक ठरवू.

शरद पवार बोलत असतानाच उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांसाठी आमच्याकडे खूप पर्याय आहेत. पण भाजपाकडे काय पर्याय आहे? गेल्या १० वर्षांत त्यांनी काय केलं? सगळ्यांनी त्यांचा अनुभव घेतला आहे. कर्नाटकात पाहिले, कोणतेच यश मिळाले नाही. बजरंग बलीनेही त्यांना आशीर्वाद दिला नाही. इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीपूर्वीच केंद्र सरकारने २०० रुपयांनी गॅस सिलिंडरचा दर कमी केला. ‘इंडिया’ जसजसा पुढे जाईल, तसा एक दिवस असा येईल, की केंद्र सरकार मोफत गॅस सिलिंडर देईल. आज झालेल्या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, अशोक चव्हाण, शेकापचे जयंत पाटील आदी उपस्थित होते.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content