Homeचिट चॅटटिळकांच्या स्वराज्यभूमीवर झाले...

टिळकांच्या स्वराज्यभूमीवर झाले अमृतमहोत्सवी ध्वजारोहण

मुंबईतल्या गिरगाव चौपाटी येथील स्वराज्यभूमी, या लोकमान्य टिळकांच्या समाधीस्थानासमोर दैवज्ञ समाजाचे समाजश्रेष्ठी सुरेंद्र शंकरशेट यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवपूर्ती ध्वजारोहण काल करण्यात आले.

महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाने यावेळी राष्ट्रगीत गाऊन शानदार सलामी दिली. ब्रिटिशांनी त्यावेळच्या लोकमान्य टिळक स्मारक समितीला अमर्याद लीजवर दिलेल्या जागेत ‘मेरी माटी मेरा देश’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून लोकमान्य टिळकांची पणती उज्ज्वला मेहेंदळे यांनी वृक्षारोपण केले. या जागेत असलेल्या उच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीच्या नियमावलीमुळे राष्ट्रपुरुषांच्या या आंतर्राष्ट्रीय दर्जाच्या स्मारक निर्मितीत अडचण येत आहे. येथे भूमिगत चित्रशिल्प व भव्य कृतज्ञता ध्वजस्तंभ उभारण्याचा स्वराज्यभूमी स्मारक समितीचा संकल्प आहे. ती योजना २०२०पासून शासनाकडे प्रलंबित आहे.

उच्चाधिकार समितीच्या नियमांचे पालन करीत लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समिती समारंभाचे आयोजन करीत असते. समारंभाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मुंबई महानगरपालिका ड विभाग सांभाळत असते. राष्ट्रपुरुषांच्या समाधीस्थान परिसराची सुरक्षाव्यवस्था भडकमकर मार्ग पोलीसठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विनय घोरपडे यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडली.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content