Homeमुंबई स्पेशलकामगार एकता नागरी...

कामगार एकता नागरी पतपेढीची रौप्यमहोत्सवी सभा संपन्न

कामगार एकता नागरी सहकारी पतपेढी (मर्यादीत)ची रौप्यमहोत्सवी अहवाल सभा कॉ. विठ्ठल घाग यांच्या अध्यक्षतेखाली सभासदांच्या प्रचंड उपस्थितीत काल मुंबईतल्या दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर हॉल येथे पार पडली.

कामगार एकता नागरी सहकारी पतपेढी (मर्यादीत)चे वैशिष्ट्य म्हणजे 25 वर्षांपूर्वी स्वान मिल कामगारांनी निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून आपल्या गरजेपोटी ही पतपेढी सुरू केली. आज 25 वर्षांनंतर या पतपेढीत छोटे दुकानदार, भाजी विक्रेते, फेरीवाले, घरकाम करणाऱ्या महिलाही सभासद झाल्या आहेत. या पतपेढीत 3860 सभासद आहेत. त्यांनी विविध प्रकारच्या 7 कोटी 20 लाखांच्या ठेवी ठेवल्या आहेत. 2 कोटी 45 लाखांची गुंतवणूक पतपेढीने केली आहे. 61 लाखांचे भागभांडवल उभे केले आहे. 5 कोटी 70 लाखांचे कर्जवाटप आतापर्यंत केले आहे. अशा तऱ्हेने 13 कोटींचा समिश्र व्यवहार या 25व्या वर्षी पतपेढीने केला आहे.

ही पतपेढी गिरणी कामगारांची पतपेढी म्हणून ओळखली जाते. पतपेढीने गिरणी कामगारांना घरांसाठी 3 कोटी 50 लाखांचे कर्जवाटपसुद्धा केले आहे. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त या सभेत सभासदांचे गुणवंत विद्यार्थी, ठेवीदार, नियमित कर्ज फेडणारे कर्जदार, ज्यांनी या पतपेढीला मदत केली असे सर्व सन्माननीय सभासद तसेच रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून अंध शाळेतील मुलांचा व अनाथ मुलांचा संचालक मंडळाच्या हस्ते सन्मान करुन त्यांच्या शाळेला आर्थिक मदतही करण्यात आली. सर्व सभासदांनी टाळ्या वाजवून या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले. सर्व कर्मचाऱ्यांनादेखील यावेळी सन्मानित करण्यात आले. कामगार क्षेत्रातील नेते कॉ. राजेंद्र कोरडे, कॉ. मनोज यादव, कॉ. अशोक पवार, गणेश घाग आदी मान्यवर तसेच सहकार क्षेत्रातील दिनेश नाईक उपस्थित होते.

यावेळी पतपेढीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी सभासदांना मार्गदर्शन करताना सांगितले की, या पतपेढीचे खरे मालक सर्व सभासद आहेत. तेव्हा तुम्ही भागभांडवल, ठेवी वाढावा. चांगले कर्जदार आणा. म्हणजे ही पतपेढी आपण आणखी मोठी करू. गिरणी कामगारांनी लढून मिळविलेले घर व ही पतपेढी वर्षानुवर्षे या मुंबई शहरात गिरणी कामगारांच्या लढ्याची ओळख जिवंत ठेवेल.

उपस्थित सर्व सभासदांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संचालक, अध्यक्ष कॉ. विठ्ठल घाग, उपाध्यक्ष प्रवीण घाग, सेक्रेटरी शान्ताराम घाग, तज्ञ संचालक विलास घाग, प्रकाश गुणदेकर, सुधाकर गिरप, विनायक परब, मोहन कदम, यशवंत पाटेकर व खजिनदार उदय नेरुरकर हे संचालक उपस्थित होते. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून राष्ट्रगिताने सभा संपविण्यात आली.

Continue reading

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या...
Skip to content