Homeहेल्थ इज वेल्थहत्तीरोगाच्या निर्मूलनाचे लक्ष्य...

हत्तीरोगाच्या निर्मूलनाचे लक्ष्य भारत 3 वर्षांआधीच गाठणार?

मिशन मोड, बहु भागीदार, बहु क्षेत्र लक्ष्यित मोहिमेद्वारे जागतिक लक्ष्यापेक्षा तीन वर्षे आधी म्हणजेच 2027पर्यंत हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितले.

डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे वार्षिक राष्ट्रव्यापी व्यापक औषध सेवन (एमडीए) उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचे नुकतेच उद्घाटन झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. उद्घाटनप्रसंगी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रो. एस. पी. सिंह बघेल हेदेखील उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, जन भागीदारी, ‘सरकारचा संपूर्ण सहभाग’ आणि ‘संपूर्ण समाजाचा सक्रिय सहभाग’ या दृष्टिकोनाद्वारे आपण हा आजार देशातून नष्ट करू शकू, असा विश्वास डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला. 10 ऑगस्ट 2023 पासून सुरू होणारा या उपक्रमाचा दुसरा टप्पा या आजाराचा प्रादुर्भाव जास्त असणाऱ्या 9 राज्यांमधील (आसाम, बिहार, छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, ओदिशा, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश) 81 जिल्ह्यात राबवला जाणार आहे.

हा आजार आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केवळ औषधे घेण्यापुरते मर्यादित नसावेत, तर डासांच्या माध्यमातून याचा प्रसार रोखण्यासाठीही पावले उचलली पाहिजेत, यावर डॉ. मांडविया यांनी यावर भर दिला. त्याशिवाय आपले ध्येय साध्य करण्याच्या मार्गावरील प्रगती खुपच मर्यादित राहील. असेही ते म्हणाले.

आरोग्य संपन्न  राष्ट्र सुनिश्चित करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमधील समन्वय वाढवण्यावरही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी भर दिला.

याप्रसंगी डॉ. मांडविया यांनी डेंग्यू ताप 2023 आणि चिकुनगुनिया तापाच्या चिकित्सा  व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content