Homeहेल्थ इज वेल्थहत्तीरोगाच्या निर्मूलनाचे लक्ष्य...

हत्तीरोगाच्या निर्मूलनाचे लक्ष्य भारत 3 वर्षांआधीच गाठणार?

मिशन मोड, बहु भागीदार, बहु क्षेत्र लक्ष्यित मोहिमेद्वारे जागतिक लक्ष्यापेक्षा तीन वर्षे आधी म्हणजेच 2027पर्यंत हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितले.

डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे वार्षिक राष्ट्रव्यापी व्यापक औषध सेवन (एमडीए) उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचे नुकतेच उद्घाटन झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. उद्घाटनप्रसंगी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रो. एस. पी. सिंह बघेल हेदेखील उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, जन भागीदारी, ‘सरकारचा संपूर्ण सहभाग’ आणि ‘संपूर्ण समाजाचा सक्रिय सहभाग’ या दृष्टिकोनाद्वारे आपण हा आजार देशातून नष्ट करू शकू, असा विश्वास डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला. 10 ऑगस्ट 2023 पासून सुरू होणारा या उपक्रमाचा दुसरा टप्पा या आजाराचा प्रादुर्भाव जास्त असणाऱ्या 9 राज्यांमधील (आसाम, बिहार, छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, ओदिशा, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश) 81 जिल्ह्यात राबवला जाणार आहे.

हा आजार आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केवळ औषधे घेण्यापुरते मर्यादित नसावेत, तर डासांच्या माध्यमातून याचा प्रसार रोखण्यासाठीही पावले उचलली पाहिजेत, यावर डॉ. मांडविया यांनी यावर भर दिला. त्याशिवाय आपले ध्येय साध्य करण्याच्या मार्गावरील प्रगती खुपच मर्यादित राहील. असेही ते म्हणाले.

आरोग्य संपन्न  राष्ट्र सुनिश्चित करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमधील समन्वय वाढवण्यावरही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी भर दिला.

याप्रसंगी डॉ. मांडविया यांनी डेंग्यू ताप 2023 आणि चिकुनगुनिया तापाच्या चिकित्सा  व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content