Homeचिट चॅटदिव्यांगजनांना सक्षम बनवण्याचा...

दिव्यांगजनांना सक्षम बनवण्याचा 40 वर्षांचा प्रवास साजरा

मुंबईच्या अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन) AYJNISHD(D) अर्थात अली यावर जंग राष्ट्रीय मूकबधीर आणि कर्णबधीर संस्थेच्या 40 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे उद्घाटन आमदार आशिष शेलार यांनी नुकतेच केले. विविध रंगीबेरंगी सांस्कृतिक उपक्रमांसह भव्य उद्घाटन सोहोळ्यात भारताच्या विविध भागांतील दिव्यांगजन कर्मचारी आणि विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांसह सर्व सहभागींना समावेश आणि संधी प्रदान करण्यात आली. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ ही संकल्पना असलेल्या 75 वर्षांच्या कामगिरीच्या अनुषंगाने चार दशकांच्या कामगिरीचे प्रदर्शन, विविध क्षेत्रातील उत्क्रांती आणि प्रगतीचे प्रदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमाद्वारे वातावरण निर्मितीही झाली.

AYJNISHD(D), ही मुंबईच्या वांद्रे पश्चिम येथील, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या (DPwD) प्रमुख सर्वोच्च राष्ट्रीय संस्थांपैकी एक आहे.

यावेळी बोलताना ॲड. आशिष शेलार यांनी मुंबईतील तसेच देशातील मूकबधीर आणि कर्णबधीर व्यक्तींच्या समस्या दूर करण्यासाठी शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या सेवा, प्रयत्नांचे कौतुक केले. भारत सरकारच्या या संस्थेने गेल्या 40 वर्षांपासून समाजातील सदस्यांना दिलेल्या अविरत सेवेबद्दल त्यांनी अभिनंदन केले. त्यांनी 10-20 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सर्व कर्मचार्‍यांना पुरस्कृत प्रदान केला आणि AYJNISHD(D) च्या विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार केला.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, डॉ. हंस, ईसी सदस्य, कॉक्लियर प्रत्यारोपण सर्जन यांनी ‘कॉक्लियर इम्प्लांट: तंत्र आणि तंत्रज्ञानातील बदलत्या कलाचा अंगिकार’ या विषयावर चर्चा केली. या सत्राचे उद्दिष्ट श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी कॉक्लियर इम्प्लांटच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरातील अलीकडील वैज्ञानिक कल प्रदान करणे हा आहे.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content