भारत बँकांच्या मार्गाने क्रांती घडवून आणणारी भारतातील आघाडीची ग्रामीण फिनटेक स्पाईस मनीने (डिजीस्पाईस टेक्नॉलॉजीजची एक उपकंपनी) गेल्या तीन वर्षांत एकूण व्यवहार मूल्यामध्ये ११४.२% वाढीसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उलथापालथ पाहिली आहे. हे स्पाईस मनी अधिकारीच्या (नॅनोप्रिन्युअर्स) प्रभावशाली नेटवर्कद्वारे समर्थित असून राज्यात २०२१पासून २०२३पर्यंत ८५.३३ %ने वाढले आहे. सध्या, स्पाईस मनीचं देशव्यापी 12.7 लाखांचं दृढ अधिकारी नेटवर्क आहे. त्यामध्ये एकट्या महाराष्ट्राचे योगदान ६०,०००पेक्षा जास्त आहे.
उत्पादनांना सर्वाधिक पाठबळ मिळवून दिल्यावर, कंपनीने AePS (आधार-सक्षम पेमेंट सिस्टम) व्यवहारांमध्ये ४५% वाढ नोंदवली आहे आणि ती राज्यातील प्रमुख उत्पादन ऑफरपैकी एक बनली आहे. AePS सोबत, लोन ईएमआय कलेक्शन, डायरेक्ट मनी ट्रान्सफर, मिनी-एटीएम आणि भारत बिल पेमेंट सर्व्हिसेस ही या विभागातील आघाडीची उत्पादने आहेत. स्पाईस मनीच्या महाराष्ट्रातील अभूतपूर्व वाढीमध्ये पुणे, नाशिक, गोंदिया, जळगाव आणि अमरावती या शहरांचा मोठा वाटा आहे.
राज्यात स्पाईस मनीच्या वाढीस हातभार लावणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे डिजिटलीकरण करण्यासाठी असलेली विभागाची इच्छा. उद्योगक्षेत्राच्या अहवालानुसार, भारतातील सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक इंटरनेट वापर आहे. २०११च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ११.२४ कोटी आहे, त्यापैकी ५४.७८% ग्रामीण भागात राहतात. स्पाईस मनीसारखे ग्रामीण फिनटेक त्यांना आर्थिक क्षेत्रात आणण्यासाठी सतत काम करत आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत आर्थिक

समावेशनाला चालना मिळते. स्पाईस मनीने वापरायला एकदम सोपी आणि सोयीस्कर अशी प्रक्रिया सादर करून व्यवसाय करण्याच्या सुलभतेमध्ये क्रांती केली आहे. यामुळे व्यक्तींना त्यांच्या मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे “अधिकारी” बनण्यास सक्षम करता येत आहे. उदयोन्मुख नॅनोप्रिन्युअर्स सहजतेने स्पाईस मनी अॅप डाउनलोड करू शकतात आणि बहुतांश वेळा करावी लागणारी किचकट कागदपत्र आणि लांबलचक पडताळणी प्रक्रिया यांना पूर्णपणे बाजूला करून अधिकारी म्हणून नोंदणी करण्यासाठी काही सोप्या पायऱ्या पूर्ण करू शकतात. या सहजसाध्य चौकटीने विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना आर्थिक सेवांमध्ये सक्रियपणे गुंतण्याचा आणि समृद्ध डिजिटल परिसंस्थेमध्ये अर्थपूर्ण योगदान देण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
स्पाईस मनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी संचालक संजीव कुमार म्हणाले की, भारतातील स्पाईस मनीच्या विकासकथेत सर्वात मजबूत योगदान देणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र एक आहे. अधिकारी नेटवर्कमधील झपाट्याने वाढ आणि महाराष्ट्रातील डिजिटल वित्तीय सेवा वाढ ही राज्याची डिजिटल जगाशी जुळवून घेण्याच्या इच्छेची पावती आहे. आमच्या डिजिटल बँकिंग आणि वित्तीय सेवांचा लाभ घेऊन, आमच्या अधिकार्यांनी महाराष्ट्रातील पारंपारिकपणे सेवा नसलेल्या भागात आर्थिक समावेशन आणले आहे. त्यामुळे व्यक्तींना स्वावलंबी बनण्यास आणि आर्थिक विकासाला चालना देण्यात मदत मिळाली आहे. आम्ही ग्रामीण नॅनोप्रिन्युअर्सचे सक्षमीकरण आणि महाराष्ट्राच्या दुर्गम भागातील रहिवाशांना उपजीविका देण्याच्या आमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत राहू.
स्पाईस मनीने देशभरात एक मजबूत असिस्टेड-डिजिटल परिसंस्था तयार केली असून त्याचे नेतृत्व 12.7 लाखांचं दृढ अधिक अधिकार्यांच्या विशाल नेटवर्कने केले आहे. हे अधिकारी २५०,००० गावे, ७०० जिल्हे आणि ५,००० ब्लॉक्सचा समावेश असलेल्या ९५ टक्के ग्रामीण पिन कोडसाठी मदत करतात. महिन्याला २० दशलक्ष ग्राहकांना सेवा देण्यावर समर्पित लक्ष केंद्रित करून, स्पाईस मनीने आपल्या ग्राहकांच्या एकूण व्यवहार मूल्यामध्ये (GTV) आर्थिक वर्ष २३ मध्ये १००,६०२ कोटी रुपयांपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे.

