Homeकल्चर +क्रियेशन कराओके क्लबच्या...

क्रियेशन कराओके क्लबच्या स्पर्धेत माधवी पाटील विजेत्या!

क्रियेशन कराओके क्लबच्या वतीने मुंबईत गोरेगावच्या प्रज्ञाबोधिनी हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केलेल्या कराओके गायन स्पर्धेत माधवी पाटील यांनी पहिले पारितोषिक पटकावले. रेश्मा धोत्रे यांना दुसरे तर पूर्वा पाठक यांना तिसरे बक्षिस मिळाले. कमल जोशी तसेच स्वाती परब यांना चौथे उत्तेजनार्थ पारितोषिक विभागून देण्यात आले.

या स्पर्धेच्या वेळी साधारण १२५ लोक उपस्थित होते. त्यापैकी ६२ जणांनी स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेसाठी काही नियम निश्चित करण्यात आले होते. यामध्ये गायकांचा क्रम सोडतीने ठरवला गेला होता. स्टेजवर गेल्यावर गायक त्याचे नाव आणि क्रमांक माईकवरून समोर बसलेल्या परीक्षकांना सांगायचा. गायक गाण्याचे बोल माईकवरून सांगायचा आणि त्याप्रमाणे समोरील मॉनिटरवर तो कराओके ट्रॅक यायचा. गायकाने गाण्याचा मुखडा आणि दोन अंतरे गायचे. त्यानंतर ट्रॅक बंद करण्यात यायचा. परीक्षक सूर, ताल, लय, भाव आणि सादरीकरण यांना अनुक्रमे १० गुणांपैकी गुण द्यायचे. अशी एकंदर ५० गुणांची ही स्पर्धा होती. भूषण सामंत, पंडित युधामन्यू गद्रे आणि गोपाळ सावंत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी याकरीता सलग पाच ते साडेपाच तास काम पाहिले.

कराओके

प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माधवी पाटील यांचं गाणं ऐकल्यानंतर परीक्षक काय निर्णय देतील तो निर्णय आधीच तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी लावला होता आणि सर्वांनीच पहिला क्रमांक ठरवूनही टाकला होता. कारण, त्यांचं गाणंच तसं झालं होतं. माधवींची मेहनत अफलातून तर होतीच, गाणं त्याहून सुंदर होतं आणि मुख्य म्हणजे ते गाणं गायला फार कठीण होतं.

कराओके

रेश्मा धोत्रे यांचं गाणं तर काही विचारायला नकोच. खूपच छान झालं. त्यांचा क्रमांक दुसरा आला. नियमित हसतमुख असणाऱ्या पूर्वा पाठक यांनी अक्षरशः त्या काळाची आठवण करून दिली. ज्यावेळेस तो सिनेमा प्रदर्शित झाला होता तेव्हा सर्वांच्या मुखात ते गाणं कायमच असायचं. त्यांना तिसरे बक्षिस मिळाले. कमल जोशी, स्वाती परब या कराओके क्लबचे सदस्यच आहेत. त्यांना उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले.

कराओके

अरविंद परुळेकर यांनी क्रियेशन कराओके क्लब १७ जून २०१३ साली चालू केला. अगदी कोरोना काळातही या क्लबचे कार्य चालूच राहिले. आज दहा वर्षांनंतरही या क्लबचे कार्य जोमाने चालूच आहे.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content