Homeकल्चर +'जाने भी दो...

‘जाने भी दो यारों’ विनोदीपटाचे पुन्हा झाले सादरीकरण!

राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालय (एनएमआयसी) रविवारी, 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अभिजात संस्मरणीय असा चित्रपट “जाने भी दो यारों” चे विशेष सादरीकरण झाले. क्रॉनिकल्स ऑफ टाइमलेस ट्रेझर्स इनिशिएटिव अंतर्गत अनेक दशकांपासून प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या या कालातीत विनोदीपटाचे पुन्हा सादरीकरण करुन भारतीय सिनेमाचा गौरवशाली वारशाचे दर्शन घडवण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

जाने भी दो यांरो 1983 मधे प्रदर्शित झाला. या अप्रतिम चित्रपटाचे दिग्दर्शन कुंदन शहा यांनी केले होते. अतिशय विनोदी पण विचार करायला लावणाऱ्या ढंगाने त्यांनी ही कलाकृती घडवली आहे. कारकिर्द घडवण्यासाठी धडपणाऱ्या दोन छायाचित्रकारांनी ही कथा आहे. ते दोघे भ्रष्टाचाराऱ्यांद्वारे जाळ्यात अडकवले जातात. दिग्गज अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी आणि रवी वासवानी यांनी या भूमिका साकारल्या आहेत. यासोबतच ओम पुरी, पंकज कपूर आणि सतीश शहांसारखे एकाहून एक सरस अभिनेते चित्रपटात आहेत. सामाजिक मुद्यांवर व्यंगात्मक भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडतो.

भष्ट्राचारी आणि शक्तीशाली लोकांच्या घोटाळ्यांभोवती अडखळत अतिसाहस करणाऱ्या दोन निरागसांभोवती ही कथा फिरते. दुर्दैव म्हणजे कधीच न केलेल्या गुन्ह्यासाठी त्यांना तुरुंगात जावे लागते. समाजातल्या काळ्या गडद बाजूवर सिनेमा प्रकाश टाकतो. जाने भी दो यांरो हा केवळ अभिजात सिनेमाच ठरला नाही तर त्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत खूप प्रेम आणि कौतुक मिळवलं. भारतीय चित्रपटाच्या इतिहासील तो सर्वाधिक लोकप्रिय, पसंतीच्या सिनेमांपैकी एक ठरला आहे.

चित्रपटाचा शेवट असलेले महाभारतातील पौराणिक दृश्य तर अविस्मरणीय आहे. विविध ओटीटी मंचावर असंख्य वेळा पाहिल्यानंतरही प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट झाल्याशिवाय राहत नाही. राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाने (एनएमआयसी) – एनएफडीसी, क्रॉनिकल्स ऑफ टाइमलेस ट्रेझर्स इनिशिएटिव्हच्या सहकार्याने, “जाने भी दो यारों” चे मुंबईतील एनएमआयसी इथे आयोजन केले होते.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content