Homeकल्चर +चर्चा करा महाराष्ट्राच्या...

चर्चा करा महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांवर, येत्या रविवारी!

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या (१८९८ – २०२३) सांगतेनिमित्त मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय संचालित इतिहास संशोधन मंडळाने येत्या ३० जुलैला एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. हे चर्चासत्र शारदा मंगल कार्यालय, तिसरा मजला, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पूर्व), मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे.

चर्चासत्राचा विषय ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि समकालीन महाराष्ट्र’ हा असून उद्घाटन सत्राचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि प्रमुख वक्त्या इतिहास अभ्यासक डॉ. प्राची देशपांडे आहेत. त्या ‘महाराष्ट्राचा इतिहास आणि वर्तमान : आंतरसंबंध’ या विषयावर आपले विचार मांडतील. महाराष्ट्रातील शेती, पर्यावरण, शिक्षण, उद्योग, रोजगार, प्रादेशिकता व संघराज्य व्यवस्था, भाषाधोरण या विषयांवर त्या-त्या क्षेत्रातले अभ्यासक आपले सखोल विचार यावेळी मांडणार आहेत.

‘शेती आणि पर्यावरण’, या विषयावरील पहिल्या सत्रात सोमिनाथ घोळवे आणि परिणिता दांडेकर भूमिका मांडतील. या सत्रात डॉ. जास्वंदी वांबूरकर आणि साईली पलांडे-दातार या  चर्चक असतील. दुसऱ्या सत्रात डॉ. शरद जावडेकर महाराष्ट्राच्या शिक्षणावर, तर डॉ. नीरज हातेकर उद्योग आणि रोजगारावर आपले विचार मांडतील. या सत्राचे चर्चक अनुक्रमे डॉ. अवनीश पाटील आणि डॉ. नारायण भोसले असतील. तिसऱ्या सत्रात ‘प्रादेशिकता व संघराज्य व्यवस्था’ या विषयावर डॉ. भालचंद्र मुणगेकर, तर ‘महाराष्ट्राचे भाषा धोरण’ या विषयावर डॉ. प्रकाश परब आपली मते मांडतील. डॉ. श्रद्धा कुंभोजकर व डॉ. नितीन रिंढे या सत्राचे चर्चक  असतील.

हे चर्चासत्र निःशुल्क असून सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अभ्यासक, शिक्षक, विद्यार्थी यांनी या अभ्यासपूर्ण चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक रवींद्र गावडे (प्रमुख कार्यवाह, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय), डॉ. जयसिंगराव पवार (अध्यक्ष, इतिहास संशोधन मंडळ), डॉ. दीपक पवार (संचालक, इतिहास संशोधन मंडळ) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८२०४३७६६५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content