Homeब्लॅक अँड व्हाईटवंदे भारत गाड्यांचा...

वंदे भारत गाड्यांचा एकूण वापर 99.60%!

चालू आर्थिक वर्ष, 2023-24 (जून 2023 पर्यंत) दरम्यान, वंदे भारत गाड्यांचा एकूण वापर 99.60% एवढा झाला आहे. परिचालन किंमत ही कर्षण ऊर्जा आणि कर्षण ऊर्जा वापर यासह विविध घटकांवर अवलंबून असते. विविध गाड्यांच्या परिचालन खर्चात कपात करण्याचा भारतीय रेल्वेचा सातत्याने प्रयत्न आहे. वंदे भारत रेकमध्ये रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम असून त्याचे मुख्य डिझाइन वैशिष्ट्यपूर्ण आहे. ज्यामुळे ओव्हर हेड इक्विपमेंट (OHE) मध्ये ब्रेकिंग उर्जा परतते आणि त्यामुळे कर्षण उर्जेचा वापर कमी होतो. 

ही माहिती रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली.

  • रेल्वेच्या वातानुलुकीत चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह वर्गात प्रवास करण्याच्या सुविधेचा लाभ अधिकाधिक प्रवाशांना घेता यावा, यासाठी विभागीय रेल्वेचा मूळ भाड्याच्या कमाल 25% पर्यंत सवलत देण्याचा निर्णय
  • परिचालनाची किंमत कमी करण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रयत्नाचाच हा भाग आहे.

विभागीय रेल्वेच्या वातानुलुकीत चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह वर्गात प्रवास करण्याच्या सुविधेचा अधिकाधिक प्रवाशांना लाभ मिळावा यासाठी, विभागीय रेल्वेने मूळ भाड्याच्या कमाल 25% पर्यंत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. (2019 चे व्यावसायिक परिपत्रक क्रमांक 40, दिनांक 27.8.2019)

सर्व स्पर्धात्मक पद्धतींसाठी प्रवासाच्या पद्धतींचे विश्लेषण केल्यानंतर आणि भविष्यातील व्याप्तीचा अंदाज घेतल्यानंतर काही विभागांमध्ये स्पर्धात्मक भाड्याची प्रवाश्यांना संधी देण्यासाठी विभागीय रेल्वेने याविषयी अधिकृत धोरण स्वीकारले. त्याच तरतुदी काही किरकोळ सुधारणांसह वाढविण्यात आल्या आहेत. (2023 चे व्यावसायिक परिपत्रक क्रमांक 11, दिनांक 8-7-2023) रेल्वेमधील प्रवासासाठी भाडे निर्धारित करणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content