Homeमुंबई स्पेशलमुंबईकरांसाठी खुशखबर! तुळशी...

मुंबईकरांसाठी खुशखबर! तुळशी तलाव वाहू लागला ओसंडून!!

मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या तलावांपैकी एक तुळशी तलाव काल मध्यरांत्रीनंतर म्हणजेच आज पहाटे ओसंडून वाहू लागला. यंदाच्या पावसाळ्यात भरुन वाहणारा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हा पहिलाच तलाव आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये आता ३९.६१ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांना दररोज शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी तुळशी तलाव हा आज मध्यरात्री १.२८ वाजता ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण ८०४.६० कोटी लीटर (८,०४६ दशलक्ष लीटर) इतकी आहे. हा तलाव संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यात असून भांडूप जलशुद्धीकरण संकुलापासून जवळच्या परिसरात आहे.

८०४ कोटी लीटर इतकी कमाल उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गेल्या वर्षी म्हणजेच सन २०२२ व सन २०२१मध्ये १६ जुलै रोजीच भरुन वाहू लागला होता. वर्ष २०२०मध्ये २७ जुलै; वर्ष २०१९मध्ये १२ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍याआधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०१८मध्‍ये ९ जुलै रोजी; वर्ष २०१७मध्‍ये १४ ऑगस्‍ट रोजी आणि वर्ष २०१६मध्‍ये १९ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी असून आज पहाटे ६.०० वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये ५७,३३४ कोटी लिटर (५,७३,३४० दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच ३९.६१ टक्‍के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. याबाबत तलावनिहाय आकडेवारी विचारात घ्यावयाची झाल्यास अप्पर वैतरणा तलावात ३,३६०.५० कोटी लीटर (३३ लाख ६०५ दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा आहे. मोडक-सागर तलावात ८,१२१.४ कोटी लीटर (८१ हजार २१४ दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा आहे. तर तानसा तलावात १०३०३.१ कोटी लीटर (१,०३,०३१ दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा आहे. बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयमध्ये (मध्य वैतरणा) ९८०९.५ कोटी लीटर (९८ हजार ९५ दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा आहे. भातसा तलावात २३,१९२ कोटी लीटर (२,३१,९२० दशलक्ष लीटर) इतका पाणीसाठा आहे. विहार तलावात १७४२.७ कोटी लीटर (१७ हजार ७२७ दशलक्ष लीटर) पाणीसाठा आहे. आज रात्री भरून वाहू लागलेल्या तुळशी तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या १०० टक्के अर्थात ८०४.६ कोटी लीटर (८०४६ दशलक्ष लीटर) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.

Continue reading

समाजमाध्यमांवरच्या 11 हजार संदेशांविरूद्ध निवडणूक आयोगाची कारवाई

देशातली पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुका यासंदर्भात 15 मार्च 2026 रोजी घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 11 हजारांपेक्षा अधिक समाजमाध्यम संदेश, यूआरएल शोधण्यात आले असून त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आशय काढून टाकणे, प्रथम माहिती अहवाल नोंदविणे, स्पष्टीकरणे आणि खंडन यांचा समावेश आहे. केंद्रीय...

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...
Skip to content