Homeहेल्थ इज वेल्थमुंबई मनपाच्या प्रसूतिगृहातील...

मुंबई मनपाच्या प्रसूतिगृहातील कर्मचाऱ्यांना संवादाचे धडे

गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता आणि प्रसूतिगृहातील अधिकारी व कर्मचारी यांच्यातील संवाद अधिक उत्तम व्हावा म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. प्रसूतिगृहात येणाऱ्या रूग्णांसोबत अधिक सौजन्य आणि समाधानपूर्वक संवादाचा भाग म्हणून अधिकारी आणि कर्मचारीवर्गाला ‘सॉफ्ट स्किल’चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि टाटा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुढाकार घेण्यात येणार आहे.

टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस – TISS) या संस्थेद्वारे ‘वर्तन बदल संवाद’ प्रशिक्षणाचे पहिले सत्र नुकतेच घेण्यात आले. या प्रशिक्षणाचा एकूण ४२ कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. जुलै व ऑगस्ट महिन्यात सर्व प्रसूतिगृहांमध्ये मिळून एकूण ५८ प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येणार आहेत. सार्वजनिक आरोग्य सुविधांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आरोग्य कर्मचारी हा संपर्काचे पहिला घटक आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशी विश्वास आणि संबंध निर्माण करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची पहिली छाप अत्यंत महत्त्वाची आहे. आघाडीच्या आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये सहानुभूतीपूर्ण आणि सर्वसमावेशक वृत्ती सुनिश्चित करण्यासाठी कर्मचार्‍यांचे ‘सॉफ्ट स्किल्स’ विकसित करण्याची सतत गरज असल्याने सातत्याने समोर आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत एकूण ३० प्रसूतिगृहे आहेत व तेथे वर्षाला साधारणत: १७ हजार प्रसूती होतात. ८ हजार ६०० शस्त्रक्रिया, ५ लाख २८ हजार बाह्यरुग्ण तपासणी होतात. प्रसूतिगृहांमध्ये एकूण कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या अंदाजे १ हजार ८०० आहे. प्रसूतिगृहातील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी, रुग्णांशी सुसंवाद साधण्यासाठी संवाद कौशल्य कार्यशाळा (Behavior Change Communication) महत्त्वाची ठरणार आहे.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content