Homeकल्चर +बालकुमार साहित्य संमेलनाच्या...

बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लता गुठे!

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या वतीने खामगाव येथे घेण्यात येणारे दुसरे राज्यस्तरीय बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध लेखिका, भरारी प्रकाशनच्या प्रकाशिका तसेच विश्वभरारी फाउंडेशनच्या संस्थापिका लता गुठे यांच्या नावाची घोषणा उज्जैनकर यांनी केली व सर्वांनी लता गुठे यांच्या नावाला एकमताने अनुमोदन केले. संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.

गेली वीस वर्ष लता गुठे ह्या साहित्यिका, संपादिका, प्रकाशिका. बाल साहित्यिक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेरही परिचित आहेत. लता गुठे ह्या एम्.ए.बी.एड्. असून त्या संतसाहित्य ते बालसाहित्य अशा विविध विषयावर सातत्याने लिखाण करतात. त्यांची एकूण २० पुस्तकं प्रकाशित आहेत. ‘मोहक युरोप’, ‘जीवनवेल’, ‘मी आहे तिथे’ संत चैतन्याचा मेळा, मना मना दार उघड, ‘पुन्हा नव्याने’, (कवितासंग्रह) शोध अस्तित्त्वाचा (कथासंग्रह), ‘इटुकले पिटुकले’, चांदनबाग, ‘बिन भिंतीची शाळा (बालकथा) काव्य कोडी तसेच मुलांसाठी चेरीलँड नावाचे मासिकाचे संपादनही त्यांनी केले आहे.

गीतलेखन- ‘स्वप्नकळ्या’ व ‘माझं प्रेम’ या ध्वनिमुद्रिकांचीनिर्मिती (ऑडिओ सीडीज), साम मराठी टी.व्ही. वाहिनीवरील ‘रुणुझुणू’ मालिकेला गीतलेखन त्यांनी दिले आहे. भरारी प्रकाशनच्या माध्यमातून २००हून अधिक पुस्तकांची निर्मिती केली आहे. गेली बारा वर्षं ‘धमाल मस्ती’ व तार्‍यांचे जग या दोन दिवाळी अंकाचे प्रकाशन व संपादन करत आहेत. विविध महत्त्वाच्या संस्थांचे एकूण ४८ राज्यस्तरीय पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्ष तसेच मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय विलेपार्ले शाखा कार्यवाह म्हणूनही त्या कार्यरत आहेत.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content