Homeमुंबई स्पेशलपथविक्रेत्यांना मिळणार ५०...

पथविक्रेत्यांना मिळणार ५० हजारांपर्यंत आणखी कर्ज

केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या प्राप्त मार्गदर्शक सूचना व महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्याकरिता https://pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरी पथविक्रेते एक वर्षाच्या परतफेड मुदतीसह दहा हजार रुपयांपर्यंतचे खेळते भांडवल कर्ज घेण्यास आणि त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील. तसेच या दहा हजार रुपयांची परतफेड केल्यास सदर पथविक्रेत्यास आणखी २० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येईल. संबंधित कर्जदार पथविक्रेत्याने या २० हजार रुपयांची परतफेड केल्यास त्यास आणखी ५० हजार रुपयांचा लाभ देण्यात येईल.

अद्याप मुंबईतल्या ज्या पथविक्रेत्यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेतलेला नसल्यास त्यांनी ते व्यवसाय करीत असलेल्या सबंधित विभाग कार्यालयात वरिष्ठ निरीक्षक (अतिक्रमण निर्मूलन) यांच्याशी संपर्क साधून, संकेतस्थळावर अर्ज करावा. तसेच अर्ज भरण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन विभाग कार्यालयातून करण्यात येईल, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.

कोविड संसर्गामुळे संपूर्ण देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला होता. तेव्हापासून त्यांच्या व्यवसायास खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडून ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना’ राबविण्यात येत आहे. मुंबईत आतापर्यंत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत साधारणपणे ९० हजार पथविक्रेत्यांना बँकेमार्फत अर्थसहाय्य वाटप करण्यात आले आहे. ही योजना डिसेंबर २०२४पर्यंत लागू असून, अद्याप  ज्या पथविक्रेत्यांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेतला नसेल त्यांनी तत्काळ संबंधित विभाग कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेमार्फत करण्यात येत आहे.

असा करा अर्ज

संबंधित इच्छुक पथविक्रेत्याने https://pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. तसेच त्याच्याकडे आधार कार्डशी जोडणी असलेला भ्रमणध्वनी क्रमांक असणे आवश्यक आहे. पथविक्रेत्याने स्वत: व्यवसाय करणे आवश्यक आहे. तसेच सदर योजनेचा लाभ घेतल्यास “स्वनिधी से समृद्धीतक” या पंतप्रधानांच्या योजनेचा लाभ संपूर्ण कुटूंबास प्राप्त होणार आहे.

Continue reading

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...
Skip to content