Homeकल्चर +साथी नाट्य-कला प्रतिष्ठानतर्फे...

साथी नाट्य-कला प्रतिष्ठानतर्फे एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न!

साथी नाट्य-कला प्रतिष्ठानतर्फे विरार येथील पद्मश्री भाऊसाहेब वर्तक सभागृह येथे नुकताच एकपात्री अभिनय स्पर्धा आणि महाराष्ट्रातील साहित्य आणि कला क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंत साहित्यिक आणि कलाकारांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. एकपात्री अभिनय स्पर्धेसाठी वय वर्षे ६ ते १५ आणि १६ व त्यावरील अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आल्या. उद्घाटनप्रसंगी संपादक आणि लेखक उमाकांत वाघ, तानसा ग्लोबल स्कुल चे उपाध्यक्ष तुकाराम पष्ठे -प्रशासकीय अधिकारी, साहित्यिक डॉ. श्रीकांत पाटील-कोल्हापूर, साहित्यिक सचिन कुसनाळे-सांगली, संगीतकार -मिलींद वाणी-डोंबिवली, आंतरराष्ट्रीय चित्रकार रणजीत वर्मा-माहूर, नाट्य-सिने अभिनेता शिवाजी शिंदे-कल्याण, नाट्य अभिनेता रमेश मुनेश्वर-नांदेड, रांगोळीकार मच्छिंद्र वैती-विरार पालघर उपस्थित होते.

यावेळी कला व साहित्य क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील दहा मान्यवरांना राज्यस्तरिय साथी साहित्यभूषण व कलाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात नाट्य अभिनेता-दिग्दर्शक रमेश मुनेश्वर-नांदेड, आंतरराष्ट्रीय चित्रकार रणजीत वर्मा-माहूर, सिना-नाट्य अभिनेता शिवाजी शिंदे-कल्याण ठाणे,  सिने संगीतकार,तबला वादक-मिलींद वाणी-डोंबिवली,  राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक साहित्यिक  डॉ. श्रीकांत पाटील-कोल्हापूर, शोध साहित्यिक सचिन कुसनाळे- सांगली, प्रा.डॉ. महेंद्रकुमार पगारे मराठी विभाग प्रमुख उमवी-जळगाव, संत साहित्यिक प्रा. संपत गर्जे-पुणे, प्रसिध्द रांगोळीकार मच्छिंद्र वैती-विरार पालघर तसेच साहित्यासाठी कार्य करणाऱ्या वृत्तपत्रासाठीचा “साथी साहित्य मित्र” पुरस्कार संपादक उमाकांत वाघ विरार यांना संन्मानित करण्यात आले.  एकपात्री अभिनय स्पर्धेत ५ वर्षापासून ७६ वर्षापर्यंतच्या स्पर्धक कलाकावंतानी आपली कला सादर करुन उपस्थिताःची दाद मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गोतारणे, नेहा धारुळकर आणि डॉ अनुपमा जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साथी परिवाराचे अध्यक्ष नटराज मोरे, सचीव सौ. अनुराधा धामोडे, नाट्य विभाग प्रमुख नाट्य टि.व्ही.चित्रपट अभिनेता-दिग्दशॆक निर्माता भरत जगताप, सहसचिव विजय जोगमार्गे,  कोकण विभाग अध्यक्ष अडॅ. नेहा धारुळकर, सल्लागार डॉ. अनुपमा जाधव, योगेश गोतारणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content