Homeमुंबई स्पेशलमोदींनी युक्रेन युद्ध...

मोदींनी युक्रेन युद्ध थांबवले ही भाकडकथा!

कितीही शाह आणि अफजलखान येऊ द्यात. आपल्या घरात येऊन फोडाफोडी करताहेत. सत्तेची मस्ती आहे. तुमचा फुगा फोडायला आम्हाला वेळ लागणार नाही. जा मणिपूरमध्ये.. अमित शाहांनी जाऊन काय केले? मोदी अमेरिकेत जातायत.. मग मणिपूरला का जात नाही? युक्रेन युद्ध थांबवले ही भाकडकथा आहे. मोदींनी जाऊन दाखवावे मणिपूरला, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

उद्धव ठाकरेंच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शिबीर आज मुंबईत झाले. त्यावेळी उपस्थितांना ते मार्गदर्शन करताना ते बोलत होते. निवडणुकीचे वर्ष सुरू झालेले आहे. पैसा येईल. त्यावेळचा गॅसचा भाव, आताचा भाव… विचारा जनतेला. महागाई, बेरोजगारी किती वाढली? अनेक योजनांचे फोटो.. आता झाडाझडती घ्या. दहा वर्षे हा काळ मोठा आहे. माझा उलटा प्रश्न आहे. जी देशाची वाट लागली आहे, त्यापेक्षा अधिक कोण वाट लावू शकतो?  भाजपाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. हिटलरच्या वाटेवर भाजपा आहे. आपले काम आहे क्रांतिकारकांची शपथ घेऊन पुढे जायचे आहे. इंग्रजांनासुद्धा जावे लागले. इंग्रजपण गुर्मीत होते. भाजपा आव्हान नाही. पण जे पायंडे पाडताहेत ते आव्हान आहे, असेही ते म्हणाले.

कागदावर माझ्याकडे काहीच नाही. ना चिन्ह ना नाव. तुम्ही रक्ताची पाणी केले ते लाचार मिंधे पलिकडे गेले. तरीदेखील तुम्ही सोबत आहात. तुमची साथ महत्त्वाची. सुखात सोबत असणारे रिश्ते आणि दुःखात सोबत असतात ते फरिश्ते. मुद्दाम अयोध्येला व्यासपीठावर बोलावले. यापुढे माता-भगिनीवर हात उचलला तर तो हात जागेवर ठेवू नका, असे ते म्हणाले.

मी २३ तारखेला पाटण्याला जातोय. पूर्वी भाजपाचे लोक यायचे. आता भाजपा सोडून सगळे येताहेत. भाजपेतर एकत्र येणार आहेत. ती देशप्रेमींची एकजूट होणार आहे. फडणवीसांची अवस्था सध्या सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झाली आहे. सावरकरांनी हालअपेष्टा मोदी, शाह, फडणवीसांसाठी भोगल्या नव्हत्या. आमचा एकच बाप… तुमचे किती? असा सवाल त्यांनी केला.

हिंदू आहोतच आम्ही. तुम्ही ढकलले म्हणून आम्ही गेलो. अमित शाहांना प्रश्न विचारले तर बोबडी वळते. ३७०ला आमचा पाठिंबाच. पण अजूनही तेथे निवडणुका घेऊ शकत नाही याचे उत्तर द्यावे. तिथला हिंदू सुरक्षित नाही, अजूनही काश्मिरी पंडित परतलेला नाही. मणिपूरला काय गोमूत्र शिंपडणार आहात? आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व तोच वारसा आम्ही समोर नेतोय. गोमूत्र, शेंडी जानवे, केवळ देवळात घंटा बडवणारा हिंदू आम्हाला मान्य नाही. देशासाठी लढणारे सगळे हिंदू आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

गद्दार आईच्या कुशीवर वार करुन गेले आहेत. कुणीही देशापेक्षा मोठा होऊ शकत नाही. देश सर्वोच्च. मोदींचा देश.. मग इतरांचा देश नाहीए. आमची ओळख भारतमातेचा पुत्र म्हणून व्हायला हवी. हिंदुस्थान ही ओळख मोठी.. पंतप्रधान उद्याही होतील. अगोदरही होते.  पाठ्यपुस्तक मंडळाने राजीनामे दिले कारण त्यांनी मान्य केलेली पुस्तके नाहीत. इतिहास बिघडवणारे तुम्ही… आम्ही इतिहास घडविणारे… असेही ते म्हणाले.

Continue reading

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...

समाजमाध्यमांवरच्या 11 हजार संदेशांविरूद्ध निवडणूक आयोगाची कारवाई

देशातली पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुका यासंदर्भात 15 मार्च 2026 रोजी घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 11 हजारांपेक्षा अधिक समाजमाध्यम संदेश, यूआरएल शोधण्यात आले असून त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आशय काढून टाकणे, प्रथम माहिती अहवाल नोंदविणे, स्पष्टीकरणे आणि खंडन यांचा समावेश आहे. केंद्रीय...

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...
Skip to content