Homeकल्चर +ऐतिहासिक तोफांनी वाढविले...

ऐतिहासिक तोफांनी वाढविले मुंबईतल्या दोन उद्यानांचे सौंदर्य!

समुद्राने वेढलेल्या मुंबई नगरीचे संरक्षण करण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी तोफा बसविल्या होत्या. यापैकी तब्बल १६७ वर्षे जुन्या असणाऱ्या, पण तरीही भरभक्कम असणाऱ्या दोन पौलादी तोफा महापालिकेच्या घाटकोपर परिसरात असणाऱ्या ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’मध्ये काही वर्षांपूर्वी आढळून आल्या होत्या. घाटकोपर पश्चिमेला असणारे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार उद्यान आणि घाटकोपर पूर्वेला असणारे ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’ या उद्यानांमध्ये या तोफा पुनर्स्थापित करण्यात आल्या आहेत. उद्यानाला भेट देणाऱ्या लहानग्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या तोफा आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरत असून अनेक नागरिक या दोघांसह आपला ‘सेल्फी’देखील आवर्जून घेत आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पालिकेचे पुरातन वास्तू जतन अभियंता खाते ज्यांच्या अखत्यारीत येते, त्या इमारत परीक्षण खात्याचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी सांगितले की, घाटकोपर पूर्व परिसरात असणाऱ्या ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’मध्ये काही वर्षांपूर्वी दोन जुन्या तोफा आढळून आल्या होत्या. या तोफांना एक नवी झळाळी मिळण्याच्या दृष्टीने व त्या तोफांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन अनुरुपता जपत पुनर्स्थापना करण्यासाठीचा एक विशेष प्रस्ताव पालिकेच्या उद्यान खात्याद्वारे पुरातन वास्तू ज़तन खात्याकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावानुसार आवश्यक तो अभ्यास करुन या दोन्ही तोफांची आता पुनर्स्थापना करण्यात आली आहे. या तोफांना पुनर्स्थापित करताना किल्ल्यांच्या बुरुजाशी साधर्म्य साधणारे चबुतरे तयार करण्यात आले असून त्यावर या तोफा बसविण्यात आल्या आहेत.

‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या काळातील या दोन्ही तोफांची लांबी ३.१० मीटर असून तोफांचा घेर हा ०.६४ मिटर आणि बाहेरील चाकांचा घेर १.१७ मीटर इतका आहे. या दोन्ही तोफांवर सन‌ १८५६ या‌ वर्षाची नोंद असून एका बाजूला रोमन लिपीमध्ये ‘एन सी पी सी’ अशी अक्षरे कोरण्यात आली आहेत. साधारणपणे १६७ वर्षे जुन्या असणार्‍या या दोन्ही तोफांना नवी झळाळी देण्यासह त्या बुरुजासमान चबुतऱ्यावर पुनर्स्थापित केल्यामुळे आता या ऐतिहासिक ठेव्याला नवा‌ रुबाब प्राप्त होण्यासह मुंबईकरांनादेखील एक ऐतिहासिक स्पर्श असलेली विरंगुळ्याची आणखी दोन ठिकाणे उपलब्ध झाली आहेत.

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content