Homeटॉप स्टोरीएमपीएससी परीक्षा घोळामागे...

एमपीएससी परीक्षा घोळामागे सरकारचा हलगर्जीपणा?

कोणत्याही परिस्थितीत एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणार नाहीत, हे राज्य सरकारचे आश्वासन मोडित काढताना सरकारने या परीक्षा घेण्याची पुरेशी तयारीच केली नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अप्रत्यक्ष कबूल केले.

येत्या रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा अवघे तीन दिवस असताना पुढे ढकलल्याने राज्यभर परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा एकच आक्रोश व उद्रेक झाला. गुरूवारी दिवसभर राज्यभर ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी निदर्शने, ठिय्या आंदोलन केल्यानंतर विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीसह काँग्रेसच्या नेत्यांनीही या परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ नये याचा आग्रह धरला होता. त्यानंतर रात्री मुख्यमंत्री ठाकरे यांनी समाजमाध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधताना या परीक्षा घेण्यासाठी कर्मचारीवर्गाची सोयच झाली नसल्याचे मान्य केले.

दिवाळीआधी परीक्षा पुढे ढकलताना आपण त्या कोणत्याही परिस्थितीत पुन्हा पुढे ढकलल्या जाणार नाहीत, असे आश्वासन दिले. परीक्षा घेताना शासकीय कर्मचाऱ्यांची गरज लागते. विद्यार्थ्यांना बसवण्याची सोय करणे, त्यांना पेपर देणे, पेपर गोळा करणे, त्यांचे गठ्ठे बांधणे या साऱ्या कामांना कर्मचारी लागतात. विद्यार्थ्यांबरोबर वावरणाऱ्या साऱ्या कर्मचाऱ्यांची चाचणी झाली पाहिजे. ते यात निगेटिव्ह आले पाहिजेत. त्यातल्या जास्तीतजास्त लोकांचे लसीकरण झालेले असले पाहिजे. विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचे दडपण असता कामा नये, यासाठी या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या परीक्षांची नवीन तारीख उद्याच जाहीर केली जाईल आणि ती येत्या आठ दिवसांतच असेल अशा सूचना आपण आयोगाला दिल्या आहेत. वयोमर्यादेची कोणतीही अडचण विद्यार्थ्यांना येणार नाही. या गैरसोयीबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो. विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा. कोणी भडकवतो म्हणून त्यांची राजकीय बंदूक आपल्या खांद्यावर घेऊ नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोना पुन्हा जोर धरत आहे. तो रोखण्यासाठी सर्व शासकीय कर्मचारी गुंतले आहेत. कोणाला बाधा झाली आहे, त्याची चाचणी झाली का, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले का, त्यांच्या संपर्कात कोण आले होते, आदी माहिती घेण्यात सारे व्यस्त आहेत, असे ते म्हणाले.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content