Homeमुंबई स्पेशलमनोज सौनिक राज्याचे...

मनोज सौनिक राज्याचे नवे मुख्य सचिव!

राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव येत्या 30 तारखेला सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक कार्यभार स्वीकारणार आहेत.

मनोज सौनिक हा कार्यभार स्वीकारताना पुढील आदेश होईपर्यंत आपल्याकडील वित्त विभागाचा कार्यभार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळतील. राज्य शासनाने आज याबाबतचे आदेश जारी केले.

सौनिक मूळचे बिहारचे असून ते 1987च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी कलकत्ता येथील सेंट झेविअर महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयातून पदवी घेतली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापिठातून आंतरराष्ट्रीय संबंधांवर पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. रायगड, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक, धुळे येथे जिल्हाधिकारीपदी त्यांनी काम केले आहे. अमरावती विभागाचे विभागीय आयुक्तपदी काम केले आहे. याचबरोबर महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि शेती स्वावलंबन अभियानाचे महासंचालक म्हणून काम केले आहे. नवी दिल्लीतील सेवा कालावधीत ऊर्जा विभाग आणि संरक्षण विभागात काम केले आहे. त्यांना वस्त्रोद्योग, अल्पसंख्यांक, गृह, परिवहन, सार्वजनिक बांधकाम अशा विभागातील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे.

मनू कुमार श्रीवास्तव राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त

येत्या 30 तारखेला राज्याच्या मुख्य सचिव पदावरून सेवानिवृत्त होत असलेले मनू कुमार श्रीवास्तव यांची महाराष्ट्राचे मुख्य सेवा हक्क आयुक्त या पदावर नेमणूक केली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पाच वर्षांच्या कालावधीपर्यंत किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होतील, यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत ते या पदावर असतील.

Continue reading

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...
Skip to content