Homeकल्चर +डॉ. गणेश चंदनशिवे...

डॉ. गणेश चंदनशिवे शारदा पुरस्काराने सन्मानित 

मुंबईतल्या बोरीवली येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेने मला दिलेला ‘शारदा’ पुरस्कार हा माझ्या लोककलेचा गौरव म्हणावा लागेल. या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे, अशा शब्दांत लोककलेचे गाढे अभ्यासक, मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक विजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चाळीस वर्षांपासून जय महाराष्ट्र नगर येथे वसंत व्याख्यानमाला सुरू असून यंदाच्या ४१व्या वर्षी प्रथेप्रमाणे लोककलेचे गाढे अभ्यासक डॉ. गणेश चंदनशिवे यांना ‘शारदा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे माजी अध्यक्ष विनोद घोसाळकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. चंदनशिवे यांनी संयुक्त महाराष्ट्र लढा शाहिरांनी गाजविल्याचे सांगितले. शाहीर आत्माराम पाटील यांचा पोवाडा खड्या आवाजात गाऊन रसिक श्रोत्यांना या ज्वालाग्राही चळवळीची आठवण त्यांनी करून दिली. वसंत बापट, मधुसूदन कालेलकर, विद्याधर गोखले, कुमार गंधर्व, शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रख्यात गायक श्रीरंग भावे, केतकी भावे जोशी यांनी ‘शत स्मरण’ या कार्यक्रमाद्वारे या महाराष्ट्राच्या महान सुपुत्रांना सांगितिक आदरांजली वाहिली. श्रेयसी मंत्रवादी यांनी अत्यंत समयोचित आणि समर्पक असे निवेदन केले. सचिन वगळ यांनी मानपत्राचे वाचन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्याख्यानमालेच्या आयोजक प्रा. नयना रेगे यांनी केले.

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content