Homeकल्चर +वीर सावरकर: फाळणी...

वीर सावरकर: फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष!

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे क्रांतिकार्य, सामाजिक क्रांती आणि हिंदुत्व याबद्दल सगळ्यांना माहीत आहे. तरीही त्यांचे अनेक महत्त्वाचे पैलू सर्वांनाच ज्ञात नाहीत. अशावेळी वीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि कार्याचे सर्व पैलू ज्ञात होतील, असे पुस्तक केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिले आहे. ‘Veer Savarkar: The Man who could prevented partition’ असे या पुस्तकाचे नाव आहे. या इंग्रजी पुस्तकाचा मराठी भाषेत अनुवाद ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी केले आहे. ‘वीर सावरकर: फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ असे अनुवादित पुस्तकाचे नाव आहे.

उद्या गुरुवारी, २० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार, खासदार राहुल शेवाळे, आमदार अतुल भातखळकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

वीर सावरकर राष्ट्राची सुरक्षा आणि विदेशनीती यासंदर्भातील द्रष्ट्ये राष्ट्रनायक होते. या देशाला असणारा फाळणीचा धोका सर्वात आधी ओळखून ती टाळण्यासाठी पराकाष्ठेने प्रयत्न करणारे खरेखुरे राष्ट्रनायक. वीर सावरकरांचे राष्ट्रीय विचार जर स्वातंत्र्यपूर्व काळात ऐकले गेले असते, तर  फाळणी टळली असती. त्यांच्या विदेशनीतीची सूत्रे आणि दूरदृष्टी लक्षात घेऊन जर धोरणे आखली असती, तर सीमा सुरक्षित राहिल्या असत्या. वीर सावरकर यांच्या या द्रष्टेपणाच्या गुणावर सविस्तर प्रकाशझोत या पुस्तकात टाकण्यात आला आहे.

Continue reading

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...
Skip to content