Homeचिट चॅट४० बेवारस मृतदेहांचे...

४० बेवारस मृतदेहांचे ‘वारसदार’ नारायण पारदळे सन्मानित

मुंबईतल्या बोरीवली पश्चिम येथील रेल्वेस्थानकाजवळ गेल्या अनेक वर्षांपासून नारायण पांडुरंग पारदळे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. या अनेक वर्षांच्या काळात त्यांनी रेल्वे अपघातातील सुमारे चाळीसहून अधिक बेवारस मृतांच्या पार्थिवावर स्वतः पदरमोड करून अंत्यसंस्कार केले. रेल्वे फलाटावर अनाथ म्हणून वावरणाऱ्यांना सामाजिक व मानवतावादी दृष्टिकोनातून सहकार्य करणाऱ्या पारदळे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

नारायणरावांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या अकाली निधनानंतर खचून न जाता मुलगा आणि मुलींचा त्यांनी सांभाळ केला. स्वतःच्या प्रकृतीची तमा बाळगली नाही. आर्थिक विवंचनेत असूनही स्वत:ची सामाजिक बांधिलकी कायम ठेवून वयाच्या ७२व्या वर्षीसुद्धा ते कार्यरत आहेत. अशा या नारायण पारदळे यांचा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि वि. स. पागे अध्यासन केंद्राचे संचालक निलेश मदाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कवितांगण परिवाराचे प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार पंकज दळवी, ईशान संगमनेरकर, संदीप बाक्रे आणि प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला नारायण पारदळे यांची कन्या स्मिता पारदळे जंगम, जावई विजय जंगम आवर्जून उपस्थित होते.

नारायणराव, आपण बोरीवली रेल्वेमार्ग अपघातात मृत आणि जखमींसाठी देवदूत म्हणून सदैव निःस्वार्थ भावनेने उभे असता. आपण वर्तमानपत्र विक्रीचा व्यवसाय करुन या वयातही कुटुंबाची जबाबदारी पार पाडता. स्वतःची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही पदरमोड करून मृत जखमींसाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत करीत असता. दिवसेंदिवस लोप पावत असलेली मानवता, समाजातील माणसं जात, धर्म, पंथ, राजकारणातील गटबाजीत विभागत चाललेली असताना तसेच धनदांडगे आर्थिक संपन्न समृद्ध मंडळींचा ‘आपल्याला काय त्याचे?’ अशी कोरडी, स्वार्थी, आत्मकेंद्री वृत्ती यामुळे आपली समाजाप्रती असलेली संवेदनशीलता दीपस्तंभासारखी समाजाला सदैव मार्गदर्शक राहील. आपल्या या महान कार्याकडे पाहून आम्हाला ‘बाबा आमटे’ यांच्या कुष्ठरोगी सेवेची आठवण आल्याशिवाय रहात नाही, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत गोरेगावच्या प्रबोधन क्रीडा भवनात उपस्थितांनी पारदळे यांना सन्मानित केले.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content