Homeमुंबई स्पेशलथोरातांच्या राजीनाम्याने प्रदेश...

थोरातांच्या राजीनाम्याने प्रदेश काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये गटबाजीला नव्याने उधाण आले आहे.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवरून बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते. आज त्यांचा वाढदिवसही होता. नाशिकमध्ये त्यांचे भाचे सत्यजित तांबे अपक्ष उमेदवार म्हणून प्रचंड मताधिक्याने निवडून आले. त्याआधी सत्यजित यांचे वडील विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून मिळालेला एबी फॉर्म बाजूला ठेवत उमेदवारी दाखल केली नाही. त्याऐवजी तेथून सत्यजित यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. सत्यजित यांच्या उमेदवारीला बाळासाहेब थोरात यांचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा चालू होती. मात्र त्या काळात आणि आताही थोरात यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते प्रत्यक्ष कोठेही, कोणत्याही व्यासपीठावर दिसून आले नव्हते व नाहीत.

बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवशी काहीतरी विशेष घडेल अशी अटकळ अनेकांनी बांधली होती. आज सकाळीच थोरात यांनी विधिमंडळ काँग्रेसच्या नेतेपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवल्याचे स्पष्ट झाले. पुण्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वतः या राजीनाम्याला पुष्टी दिली.

दरम्यान, या राजीनाम्यावरून उद्भवलेल्या परिस्थितीत नेमकी काय भूमिका घ्यायची याबद्दल पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या नवी दिल्लीला रवाना होत असल्याचे कळते. थोरात यांनी राजीनामा दिल्याचे आणि त्या राजीनामापत्रात आपल्यावर नाराजी व्यक्त केल्याबद्दल कोणतीही माहिती आपल्याला नसल्याची पटोले यांनी सांगितले. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील हेसुद्धा मुंबईमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची बैठक घेऊन पक्षांतर्गत गटबाजी थोपवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वृत्त आहे.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content