HomeArchiveराणेंचे राजकारण आणि...

राणेंचे राजकारण आणि झालेली गोची!

Details
राणेंचे राजकारण आणि झालेली गोची!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विलास मुकादम, ज्येष्ठ पत्रकार
स्वत:स कोकणाचे भाग्यविधाते म्हणविणारे माजी शिवसेना नेते, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार नारायण राणे यांचे राजकारण म्हणजे राज्यात विनोदाचा आणि टवाळकीचा विषय झाला आहे. शिवसेना व्हाया काँग्रेस असे फिरलेले राणे सध्या भाजपाचे खासदार आहेत. मात्र नेते आहेत ते त्यांनी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाचे याला काय म्हणायचे? आता तर राणे स्वबळाची भाषा करू लागले आहेत. लोकसभा निवडणूक स्वाभिमानी पक्ष लढविणार आहे, अशी गर्जना करून भाजपालाच त्यांनी आव्हान दिले आहे. याचा दुसरा अर्थ म्हणजे राणे योग्यवेळी भाजपाची साथ सोडणार असा होतो. राणेंसारख्या नेत्याने अशा गप्पा मारणे त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना पटत नाहीत. किती वेळा पक्ष बदलायचा आणि कशासाठी असा सवाल राणेंच्या जवळच्या साथीदारांना पडला आहे.

भाजपामध्ये न जाताही भाजपाच्या खात्यावर खासदारकी खिशात घातली. ते दिल्लीच्या राजकारणात पोहोचले. मात्र एव्हढयाने प्रश्न सुटले नाहीतच. कारण दोघा चिरंजीवांचे राजकीय पुनर्वसनही अतिशय महत्त्वाचे आहे. थोरल्या लेकास खासदारकी हवी आणि धाकटया मुलास विधानसभेची आमदारकी हवीच. आमदार निलेश राणे हे सध्या काँग्रेसचे आमदार आहेत. पुढील निवडणूक ते महाराष्ट्र स्वाभिमान या घरच्या पक्षातर्फे लढवतील हे उघड आहे. माजी खासदार निलेश राणे रत्नागिरी-सिंधुदूर्ग या लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढतील. त्यांना दुसरा मतदारसंघ नाही. भाजपाने याच मतदारसंघातून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना मैदानात उतरविण्याचे ठरविले होते. मात्र प्रभू आता नाही म्हणत आहेत. भाजपा-शिवसेना युतीत ही जागा शिवसेनेकडे आहे. युती होणारच असे भाजपातर्फे ठासून सांगितले जात आहे. त्यामुळे राणेंसमोर संकट उभे ठाकणार आहे. त्यामुळे निलेश राणेंना स्वबळावर लढावे लागणार. मात्र जिंकण्यासाठी हवे असलेले बळ म्हणजेच राजकीय वातावरण राणेंना अनुकूल नाही. त्याचा फटका त्यांना बसू शकतो.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यंतरी राणेंची घरी जाऊन भेट घेतली. त्या भेटीचा अर्थ वेगळा काय असू शकतो? ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाकडे आहे. काँग्रेस ती राणेंसाठी सोडेल, अशी शक्यता नाही. त्यामुळे निलेश यांचा लोकसभेचा मार्ग आता सोपा नाही. मात्र पवारांचा मदतीने तरी ती जागा जिंकता येईल काय, असं गणित नारायण राणेंचे आहे. काँग्रेसमध्ये १२ वर्षे, त्याआधी शिवसेनेत सुमारे ३५ वर्षे आणि आता भाजपाचा आधार घेऊन राणेंचे राजकारण सुरू आहे. मात्र भाजपाकडून आता अधिक काहीच मिळणार नाही याची पुरेपूर खात्री झाल्याने राणेंनी आता स्वाभिमानांचा झेंडा फडकविला आहे. विश्वास यात्रा सुरू केली आहे. वातावरण काय असे कसे आहे, याचा अंदाज ते घेत आहेत. भाजपामध्ये राहून आता फारसं काही हाती लागणार नाही, हे ओळखूनच राणे आता स्वबळाची भाषा ऐकवित आहेत. भाजपाला राणेंची नव्हे तर शिवसेनची कधी नव्हे, ती गरज आहे. मोदी लाट नाही की शाहांचे कौतुक नाही. त्यामुळे पुन्हा सत्ता हवी तर शिवसेना हवीच, अशी विचित्र परिस्थिती भाजपासमोर आहे. शिवसेना नकोशी झाली आहे तरी दुसरा पर्याय नाही. राष्ट्रवादीची मैत्री भरोशाची नाही, हे भाजपाने अनुभवले आहेच. कितीही टीका झाली, उपमर्द झाला, मानहानी झाली, तरी शिवसेना भाजपासाठी टॉनिक आहे. ते दिल्लीतील सत्ता टिकवण्यासाठी. इतके स्वच्छ आहे. तरीही दोन्ही बाजूंनी प्रहार होत आहेत, होत राहतील..

शिवसेनेला मुंबई महापालिकेतील सत्ता टिकवायची आहे. राज्यभर भाजपाचा झझांवात आहे. मग मुंबईवर भाजपाचा झेंडा का नाही या प्रश्नाचे उत्तर नको असलेल्या युतीत आहे. भाजपा-शिवसेना आता एकत्रच आहेत. विधानसभा निवडणुकीत १५० जागांची मागणी शिवसेना करेल आणि त्याच अटीवर लोकसभा युती राहील. राणेंच्यामागे दहा आमदारही नाहीत. राणेंना त्यांचे अस्तित्व टिकवायचे आहे. त्यासाठी ते राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेतील. त्यातच भाजपाने त्यांना पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात स्थान दिले आहे. महाराष्ट्रातून हा मान फक्त रोणेंनाच मिळाला आहे. त्यामुळे राणेंची आता गोची झाली आहे..”
 
“विलास मुकादम, ज्येष्ठ पत्रकार
स्वत:स कोकणाचे भाग्यविधाते म्हणविणारे माजी शिवसेना नेते, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार नारायण राणे यांचे राजकारण म्हणजे राज्यात विनोदाचा आणि टवाळकीचा विषय झाला आहे. शिवसेना व्हाया काँग्रेस असे फिरलेले राणे सध्या भाजपाचे खासदार आहेत. मात्र नेते आहेत ते त्यांनी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाचे याला काय म्हणायचे? आता तर राणे स्वबळाची भाषा करू लागले आहेत. लोकसभा निवडणूक स्वाभिमानी पक्ष लढविणार आहे, अशी गर्जना करून भाजपालाच त्यांनी आव्हान दिले आहे. याचा दुसरा अर्थ म्हणजे राणे योग्यवेळी भाजपाची साथ सोडणार असा होतो. राणेंसारख्या नेत्याने अशा गप्पा मारणे त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना पटत नाहीत. किती वेळा पक्ष बदलायचा आणि कशासाठी असा सवाल राणेंच्या जवळच्या साथीदारांना पडला आहे.

भाजपामध्ये न जाताही भाजपाच्या खात्यावर खासदारकी खिशात घातली. ते दिल्लीच्या राजकारणात पोहोचले. मात्र एव्हढयाने प्रश्न सुटले नाहीतच. कारण दोघा चिरंजीवांचे राजकीय पुनर्वसनही अतिशय महत्त्वाचे आहे. थोरल्या लेकास खासदारकी हवी आणि धाकटया मुलास विधानसभेची आमदारकी हवीच. आमदार निलेश राणे हे सध्या काँग्रेसचे आमदार आहेत. पुढील निवडणूक ते महाराष्ट्र स्वाभिमान या घरच्या पक्षातर्फे लढवतील हे उघड आहे. माजी खासदार निलेश राणे रत्नागिरी-सिंधुदूर्ग या लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढतील. त्यांना दुसरा मतदारसंघ नाही. भाजपाने याच मतदारसंघातून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना मैदानात उतरविण्याचे ठरविले होते. मात्र प्रभू आता नाही म्हणत आहेत. भाजपा-शिवसेना युतीत ही जागा शिवसेनेकडे आहे. युती होणारच असे भाजपातर्फे ठासून सांगितले जात आहे. त्यामुळे राणेंसमोर संकट उभे ठाकणार आहे. त्यामुळे निलेश राणेंना स्वबळावर लढावे लागणार. मात्र जिंकण्यासाठी हवे असलेले बळ म्हणजेच राजकीय वातावरण राणेंना अनुकूल नाही. त्याचा फटका त्यांना बसू शकतो.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यंतरी राणेंची घरी जाऊन भेट घेतली. त्या भेटीचा अर्थ वेगळा काय असू शकतो? ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाकडे आहे. काँग्रेस ती राणेंसाठी सोडेल, अशी शक्यता नाही. त्यामुळे निलेश यांचा लोकसभेचा मार्ग आता सोपा नाही. मात्र पवारांचा मदतीने तरी ती जागा जिंकता येईल काय, असं गणित नारायण राणेंचे आहे. काँग्रेसमध्ये १२ वर्षे, त्याआधी शिवसेनेत सुमारे ३५ वर्षे आणि आता भाजपाचा आधार घेऊन राणेंचे राजकारण सुरू आहे. मात्र भाजपाकडून आता अधिक काहीच मिळणार नाही याची पुरेपूर खात्री झाल्याने राणेंनी आता स्वाभिमानांचा झेंडा फडकविला आहे. विश्वास यात्रा सुरू केली आहे. वातावरण काय असे कसे आहे, याचा अंदाज ते घेत आहेत. भाजपामध्ये राहून आता फारसं काही हाती लागणार नाही, हे ओळखूनच राणे आता स्वबळाची भाषा ऐकवित आहेत. भाजपाला राणेंची नव्हे तर शिवसेनची कधी नव्हे, ती गरज आहे. मोदी लाट नाही की शाहांचे कौतुक नाही. त्यामुळे पुन्हा सत्ता हवी तर शिवसेना हवीच, अशी विचित्र परिस्थिती भाजपासमोर आहे. शिवसेना नकोशी झाली आहे तरी दुसरा पर्याय नाही. राष्ट्रवादीची मैत्री भरोशाची नाही, हे भाजपाने अनुभवले आहेच. कितीही टीका झाली, उपमर्द झाला, मानहानी झाली, तरी शिवसेना भाजपासाठी टॉनिक आहे. ते दिल्लीतील सत्ता टिकवण्यासाठी. इतके स्वच्छ आहे. तरीही दोन्ही बाजूंनी प्रहार होत आहेत, होत राहतील..

शिवसेनेला मुंबई महापालिकेतील सत्ता टिकवायची आहे. राज्यभर भाजपाचा झझांवात आहे. मग मुंबईवर भाजपाचा झेंडा का नाही या प्रश्नाचे उत्तर नको असलेल्या युतीत आहे. भाजपा-शिवसेना आता एकत्रच आहेत. विधानसभा निवडणुकीत १५० जागांची मागणी शिवसेना करेल आणि त्याच अटीवर लोकसभा युती राहील. राणेंच्यामागे दहा आमदारही नाहीत. राणेंना त्यांचे अस्तित्व टिकवायचे आहे. त्यासाठी ते राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेतील. त्यातच भाजपाने त्यांना पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात स्थान दिले आहे. महाराष्ट्रातून हा मान फक्त रोणेंनाच मिळाला आहे. त्यामुळे राणेंची आता गोची झाली आहे..”
 

Continue reading

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...
Skip to content