HomeArchiveदोन निवडणुका!

दोन निवडणुका!

Details
दोन निवडणुका!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
मे 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकाआधी दोन राज्यांतील विधानसभेच्या दोन पोटनिवडणुका नुकत्याच झाल्या. हरियाणा आणि राजस्थान येथील पोटनिवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. 200 जागा असलेल्या राजस्थान विधानसभेत काही दिवसांपूर्वी काँग्रेसने 99 जागा जिंकून विजय मिळविला होता. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत रामगढ मतदारसंघातून काँग्रेसच्या साफीया झुबेर या प्रचंड बहुमताने विजयी झाल्या. त्यामुळे राजस्थानात काँग्रेसने जागांचे शतक पूर्ण केले आहे. लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला लाभलेला हा शुभशकून आहे. हरियाणाच्या जिन्द मतदारसंघात काँग्रेसचे विशेष अस्तित्व नव्हते. तरीही काँग्रेसने आपले प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना उमेदवारी दिली. सुरजेवाला हे कैथल मतदारसंघातून विधानसभेवर यापूर्वीच निवडून गेले आहेत. तरीही त्यांना पोटनिवडणुकीत उभे करून काँग्रेसने काय साधले, हे एकट्या राहुल गांधी यांनाच ठाऊक! सुरजेवाला तरुण आहेत. ते उत्तम बोलतात. प्रसारमाध्यमांच्या कार्यक्रमात ते चांगले चमकतात. सारांश, त्यांचे विमान नेहमी प्रसिद्धीच्या उंच आकाशात झेप घेत असते. कदाचित, हे `विमान’ खाली उतरविण्यासाठीच सुरजेवाला यांना जिन्द मतदारसंघातून उभे केले गेले असावे. कारण सुरजेवाला हे तिसऱ्या क्रमांकावर जाऊन दारूणरित्या पराभूत झाले. भारतीय जनता पार्टीचे किशन मिध्धा यांनी 12 हजार मतांनी विजय मिळविला.

 

दोन पोटनिवडणुकांत काँग्रेस आणि भाजपाने एक-एक जागा जिंकून लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा `सामना’ अनिर्णीत ठेवला, असे दिसत असले तरी वस्तुस्थिती तशी नाही. जिन्द हा भाजपाचा बालेकिल्लाच होता. काँग्रेसने तो गमावला यात विशेष काही नाही. पण राजस्थानमध्ये काँग्रेसने भाजपाची आणखी एक जागा हिसकावून घेऊन आपले विधानसभेतील जागांचे शतक पूर्ण केले. भाजपाला अशाप्रकारे सणसणीत चपराक लगावली. भाजपा नेतृत्त्वाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली असल्याचे या निकालावरून पुन्हा एकदा दिसून आले. आता घोडामैदान दूर नाही. एकीकडे विरोधक सत्ताधारी भाजपाविरुद्ध एकवटले आहेत तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नितीन गडकरी यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे.

 

एकेकाळी उत्तर प्रदेश हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेसचे दिग्गज पंतप्रधान उत्तर प्रदेशमधून लोकसभेवर निवडून गेले होते. पण गेल्या दोन दशकात या राज्यांत काँग्रेसचे अस्तित्त्व पणाला लागले आहे. प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशामुळे चित्र बदलेल का, हा खरा प्रश्न आहे. पोटनिवडणुकांवरून सदैव लोकांचा ट्रेंड कळत असतो. या निवडणुकीतदेखील तो उघड झाला आहे. राजस्थानने काँग्रेसच्या झोळीत जनतेने आणखी एक जागा टाकून काँग्रेसला पसंती दर्शविली आहे. भाजपाच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
मे 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकाआधी दोन राज्यांतील विधानसभेच्या दोन पोटनिवडणुका नुकत्याच झाल्या. हरियाणा आणि राजस्थान येथील पोटनिवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. 200 जागा असलेल्या राजस्थान विधानसभेत काही दिवसांपूर्वी काँग्रेसने 99 जागा जिंकून विजय मिळविला होता. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत रामगढ मतदारसंघातून काँग्रेसच्या साफीया झुबेर या प्रचंड बहुमताने विजयी झाल्या. त्यामुळे राजस्थानात काँग्रेसने जागांचे शतक पूर्ण केले आहे. लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला लाभलेला हा शुभशकून आहे. हरियाणाच्या जिन्द मतदारसंघात काँग्रेसचे विशेष अस्तित्व नव्हते. तरीही काँग्रेसने आपले प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना उमेदवारी दिली. सुरजेवाला हे कैथल मतदारसंघातून विधानसभेवर यापूर्वीच निवडून गेले आहेत. तरीही त्यांना पोटनिवडणुकीत उभे करून काँग्रेसने काय साधले, हे एकट्या राहुल गांधी यांनाच ठाऊक! सुरजेवाला तरुण आहेत. ते उत्तम बोलतात. प्रसारमाध्यमांच्या कार्यक्रमात ते चांगले चमकतात. सारांश, त्यांचे विमान नेहमी प्रसिद्धीच्या उंच आकाशात झेप घेत असते. कदाचित, हे `विमान’ खाली उतरविण्यासाठीच सुरजेवाला यांना जिन्द मतदारसंघातून उभे केले गेले असावे. कारण सुरजेवाला हे तिसऱ्या क्रमांकावर जाऊन दारूणरित्या पराभूत झाले. भारतीय जनता पार्टीचे किशन मिध्धा यांनी 12 हजार मतांनी विजय मिळविला.

 

दोन पोटनिवडणुकांत काँग्रेस आणि भाजपाने एक-एक जागा जिंकून लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा `सामना’ अनिर्णीत ठेवला, असे दिसत असले तरी वस्तुस्थिती तशी नाही. जिन्द हा भाजपाचा बालेकिल्लाच होता. काँग्रेसने तो गमावला यात विशेष काही नाही. पण राजस्थानमध्ये काँग्रेसने भाजपाची आणखी एक जागा हिसकावून घेऊन आपले विधानसभेतील जागांचे शतक पूर्ण केले. भाजपाला अशाप्रकारे सणसणीत चपराक लगावली. भाजपा नेतृत्त्वाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली असल्याचे या निकालावरून पुन्हा एकदा दिसून आले. आता घोडामैदान दूर नाही. एकीकडे विरोधक सत्ताधारी भाजपाविरुद्ध एकवटले आहेत तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नितीन गडकरी यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे.

 

एकेकाळी उत्तर प्रदेश हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेसचे दिग्गज पंतप्रधान उत्तर प्रदेशमधून लोकसभेवर निवडून गेले होते. पण गेल्या दोन दशकात या राज्यांत काँग्रेसचे अस्तित्त्व पणाला लागले आहे. प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशामुळे चित्र बदलेल का, हा खरा प्रश्न आहे. पोटनिवडणुकांवरून सदैव लोकांचा ट्रेंड कळत असतो. या निवडणुकीतदेखील तो उघड झाला आहे. राजस्थानने काँग्रेसच्या झोळीत जनतेने आणखी एक जागा टाकून काँग्रेसला पसंती दर्शविली आहे. भाजपाच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे.”
 
 

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content