Homeटॉप स्टोरीचतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी...

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू

अनेक दिवसांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सुमारे साडेतीन लाख चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून आंदोलनाचा पहिला दिवस यशस्वी केला. शासनाने दखल घेतली नाही तर, उद्या तीव्र निदर्शने आणि परवा (दि. 29 जानेवारी) एक दिवसाचा संप करण्यासाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे शासनाने त्वरीत तोडगा काढावा, अन्यथा संपामुळे शासकीय यंत्रणा ठप्प होईल, असा इशारा राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिला आहे.

शासनाला वारंवार निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्यामुळे, नाईलाजाने हा अखेरीचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. दरम्यान महाराष्ट्रातील सर्व शासकीय कारभार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांशिवाय अशक्य असल्यामुळे सर्व शासकीय कामकाज ठप्प होणार असल्याने या प्रकरणी लवकरात लवकर शासनाने तोडगा काढावा, अशी मागणी राज्यातील जनतेकडून करण्यात येत आहे.

वर्ग-४ची पदे निरसित करू नयेत, दि. 14 जानेवारी, 2016 रोजीचा 25% चतुर्थश्रेणी पदे निरसित करण्याचा शासननिर्णय रद्द करावा, शासकीय कार्यालये आणि रुग्णालये यांचे खाजगीकरण थांबवावे, अनुकंपा तत्त्वावरील पदे त्वरीत भरली जावीत, राज्यातील वारसाहक्काची पदे तत्काळ भरावीत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास त्वरीत शासनसेवेत समाविष्ट करावे, सर्व शासकीय कार्यालयांतील चतुर्थश्रेणीची पदे सरळसेवा भरतीने त्वरीत भरावीत, ती बाह्यस्त्रोतांद्वारे भरू नयेत, वेतन त्रुटीसंदर्भात खंड-२च्या अहवालाची तत्काळ अंमलबजावणी करावी, वर्षानुवर्षे कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करावे, आकृतीबंधानुसार सरळसेवेत तत्काळ रिक्त पदे भरण्यात यावीत, आरोग्य सेवेतील 925 चतुर्थश्रेणी बदली कामगारांना विशेष बाब म्हणून एकाच वेळी शासनसेवेत कायम करावे, राज्य सरकारी विमा योजना, मंत्रालय उपाहारगृहे, वस्तू व सेवा कर उपाहारगृहे, राज्य राखीव पोलिस बलातील वर्ग-४ची पदे, सार्वजनिक आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणीची पदे कंत्राटी पद्धतीने न भरता ती सरळसेवेने तत्काळ भरावीत, अशा विविध 25 मागण्या चतुर्थश्रेणी महासंघाच्या वतीने करण्यात आल्या आहेत, असे पठाण यांनी म्हटले आहे.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content