HomeArchiveवैद्यकीय महाविद्यालयांसाठी नवे...

वैद्यकीय महाविद्यालयांसाठी नवे मापदंड जाहीर!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“वैद्यकीय शिक्षण परवडण्याजोगे व्हावे म्हणून राष्ट्रीय वैद्यकीय परीषदेने, परिषदेच्या नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. या वर्षीच्या “एममीबीएस अभ्यासक्रमाच्या वार्षिक प्रवेशासाठी (2020) प्रवेश नियम,” असे त्याचे शीर्षक आहे. या अधिनियमानुसार भारतीय वैद्यकीय परीषदेचे (MCI) पूर्वीचे नियम वैद्यकीय महाविद्यालयांसाठी किमान प्रवेश आवश्यकता मानदंड 1999 (for 50/100/150/200/250 वार्षिक प्रवेश) आज बदलण्यात आले आहेत.”
 
“हे नियम नव्याने सुरू होणाऱ्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांसाठी आणि जी महाविद्यालये आपल्या वार्षिक एमबीबीएस प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22साठी अधिक प्रवेश देऊ इच्छित आहेत त्यांना लागू होतील. या बदलाच्या काळात, जी वैद्यकीय महाविद्यालये आधीपासूनच अस्तित्त्वात आहेत, त्यांच्यासाठी गेल्या वेळेच्या नियमांप्रमाणे संबंधित नियम लागू होतील.”
 
नवे मानदंड संस्थेच्या (संस्थांच्या) कार्यकारी आवश्यकता विचारात घेऊन तयार करण्यात आले आहेत. यामुळे साधनसंपत्तीचा वापर करत सर्वोत्तमीकरण आणि लवचिकता येईल आणि नव्या आधुनिक तांत्रिक साधनांच्या वापराला प्राधान्य मिळेल.
 
महत्त्वाचे बदल
 
नविन नियमांनुसार वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न शैक्षणिक रुग्णालय उभारण्यासाठी ठराविक प्रमाणात मोकळी जागा असण्याची अट रद्द केली आहे. (सर्व इमारती या सध्याच्या इमारतीसाठीच्या कायद्यांनुसार असणे आवश्यक). या नोटीफिकेशनमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी लागणारी जागा तसेच त्यांच्या कामासाठी आवश्यक किमान रिकामी जागा संस्थेने पुरवणे आवश्यक आहे. शिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जागा या सर्व विभागांमध्ये सामायिक असतील या गृहितकावर आधारित मानके आखण्यात आली आहेत. (आतापर्यंत नियमांमध्ये लवचिकता नसल्याच्या पार्श्वभूमीवर) म्हणून सर्व शिकवण्याच्या जागा ई-लर्निंगपूरक करण्यात येतील आणि डिजीटली एकमेकांशी जोडलेल्या असतील. (याआधीही फक्त हेच प्रस्तावित होते.)
 
“नवीन नियमांनुसार, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सुसज्ज ‘कौशल्य प्रयोगशाळा’ असणे आवश्यक आहे. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी वैद्यकीय शिक्षण एककसुद्धा ठरवण्यात आले आहे. ग्रंथालयासाठी लागणारी जागा तसेच पुस्तके व जर्नल्सची जागा तर्कशुद्धपणे कमी करण्यात आली आहे. सध्याच्या काळात वैद्यकीय विद्यार्थी व निवासींवरचा वाढता ताण लक्षात घेता विद्यार्थी समुपदेशन सेवा अनिवार्य करण्यात आली आहे.”
 
“वैद्यकीय प्रशिक्षणासाठी सुसज्ज रुग्णालय असणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेता नव्या नियमांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालयासाठी अर्ज करताना त्याआधी किमान 2 वर्षांपासून सुरू असलेले बहुउद्देशीय सुसज्ज 300 खाटांचे संलग्न रुग्णालय असणे अनिवार्य केले आहे. (आधीच्या नियमांमध्ये हा रुग्णालय कार्यरत असण्याचा कालावधी नमूद नव्हता) अंडरग्रॅज्युएट वैद्यकीय शिक्षणासाठीची विद्यार्थ्यांची वार्षिक प्रवेशसंख्या, क्लिनिकल विशेष आणि किमान क्लिनिकल सामग्री शिकवण्याचा कालावधी हे सर्व विचारात घेता आधीच्या नियमांनुसार शिक्षणासाठी लागणाऱ्या खाटांपेक्षा नवीन नियमानुसार 10 टक्के खाटा कमी लागतील.”
 
शिक्षणक्षेत्रातील मानव संसाधनाचा विचार करता त्याचेही नव्या नियमावलीनुसार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. आवश्यक शिक्षकवर्गाची गरज व्हिजिटींग शिक्षकवर्गाने भरून काढता येईल. अंडरग्रॅज्युएट वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी सर्व वैद्यकीय महाविद्यालय संलग्न रुग्णालयांमध्ये दोन विभाग अनिवार्य आहेत. त्यामध्ये आपत्कालीन वैद्यकीय उपचार (आधीच्या दुर्घटना विभागाऐवजी) त्यामुळे ट्रॉमॉसारख्या वैद्यकीय आपत्तीत वेळेवर निदान होईल व उपचार मिळतील. दुसरे फिजीकल मेडिसिन व पुनर्वसन. यामुळे थोडक्या पुनर्वसनाची गरज असणारे आणि उपचारक यांच्यामधील अंतर कमी होण्यास मदत होईल.
 
या नियमावलीने गरजेपुरती आवश्यक आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेतलेल्या महाविद्यालये अशी सुस्पष्ट आखणी मांडली आहे. त्यामुळे उत्कृष्टेचा ध्यास घेणारी महाविद्यालये वाढतील. परिणामी यानुसार राष्ट्रीय वैद्यकीय परिषद (National Medical Commission) वैद्यकीय महाविद्यालयांचे गुणानुक्रम देऊ शकेल.

Continue reading

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...

इराणवर हल्ला करण्यास अमेरिकी सेनेटची मनाई!

गेल्या जवळपास चार महिन्यांपासून पश्चिम आशियाला अशांतेच्या गर्तेत लोटणाऱ्या अमेरिका-इराण संघर्षात एक मोठी घडामोडी समोर आली आहे. १७ जून रोजी स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारानंतर या दोन्ही देशांमध्ये युद्ध थांबले असले, तरी आता दोन्ही देशांमध्ये अटी आणि नियमांवरून पुन्हा एकदा...

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...
Skip to content