HomeArchiveमुंबईत भरणार शस्त्रास्त्रांचं...

मुंबईत भरणार शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन!

Details
मुंबईत भरणार शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईसह राज्यातील लोकांना संरक्षण दलाविषयी माहिती होऊन सैनिकांप्रती जिव्हाळा वाढीस लागावा म्हणून मुंबईत शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन नि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे .येत्या गुरुवारी सायंकाळी वांद्रा कुर्ला संकुल, एमएमआरडीए क्षेत्रात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं उदघाटन होईल. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, संभाजी पाटील-निलंगेकर, खा. विनय सहस्त्रबुद्धे, ले. जन. एस. के. पराशर, पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव, इंडियन ऑइलचे परिन्दू भगत आदी उपस्थित राहणार आहेत.

वीर सेनानी फाऊंडेशन, स्वरनिनाद फाऊंडेशन यांनी राज्याच्या गृह मंत्रालयासह हे संरक्षण प्रदर्शन आणि चर्चासत्र आयोजित केलं आहे. यासाठी प्रवेश विनामूल्य असला तरी सोबत ओळखपत्र आवश्यक असल्याचं आयोजकांनी कळवलं आहे. सुमारे चार एकर परिसरात विविध प्रकारची शस्त्रे नि दारुगोळा पाहण्याचा अनुभव व माहिती घेता येईल. सकाळी दहा ते रात्री आठ, या वेळेत प्रदर्शन तर सायंकाळी ५.३० ते ८ राष्ट्रीय सुरक्षेवर चर्चासत्र आयोजित केली आहेत. तीन फेब्रुवारीपर्यंत ते चालेल. पहिल्या दिवशी राष्ट्रीय सुरक्षितता आणि संरक्षण दल नि केंद्रीय पोलिसांची भूमिका, दुसऱ्या दिवशी २०१४आधीपेक्षा आज आम्ही अधिक सुरक्षित आहोत का? हा विषय आहे. तिसऱ्या दिवशी अंतर्गत सुरक्षा यंत्रणांसमोरची आव्हानं नि धोके, बाह्य धोके यावर चर्चा होईल. लष्करी नि इतर क्षेत्रातील जाणकार मान्यवर यात सहभागी होतील. वीर सेनानीचे कर्नल विक्रम पत्की, सुनील वालावलकर, स्वर निनादचे भारत बलवल्ली, ज्ञानेश परांजपे यासह इतर सर्वजण यासाठी परिश्रम घेत आहेत. अशा प्रकारचा कार्यक्रम मुंबईत पहिल्यांदाच होत असल्याने जास्तीतजास्त लोकांनीं याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं जातंय.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईसह राज्यातील लोकांना संरक्षण दलाविषयी माहिती होऊन सैनिकांप्रती जिव्हाळा वाढीस लागावा म्हणून मुंबईत शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन नि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे .येत्या गुरुवारी सायंकाळी वांद्रा कुर्ला संकुल, एमएमआरडीए क्षेत्रात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं उदघाटन होईल. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, संभाजी पाटील-निलंगेकर, खा. विनय सहस्त्रबुद्धे, ले. जन. एस. के. पराशर, पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव, इंडियन ऑइलचे परिन्दू भगत आदी उपस्थित राहणार आहेत.

वीर सेनानी फाऊंडेशन, स्वरनिनाद फाऊंडेशन यांनी राज्याच्या गृह मंत्रालयासह हे संरक्षण प्रदर्शन आणि चर्चासत्र आयोजित केलं आहे. यासाठी प्रवेश विनामूल्य असला तरी सोबत ओळखपत्र आवश्यक असल्याचं आयोजकांनी कळवलं आहे. सुमारे चार एकर परिसरात विविध प्रकारची शस्त्रे नि दारुगोळा पाहण्याचा अनुभव व माहिती घेता येईल. सकाळी दहा ते रात्री आठ, या वेळेत प्रदर्शन तर सायंकाळी ५.३० ते ८ राष्ट्रीय सुरक्षेवर चर्चासत्र आयोजित केली आहेत. तीन फेब्रुवारीपर्यंत ते चालेल. पहिल्या दिवशी राष्ट्रीय सुरक्षितता आणि संरक्षण दल नि केंद्रीय पोलिसांची भूमिका, दुसऱ्या दिवशी २०१४आधीपेक्षा आज आम्ही अधिक सुरक्षित आहोत का? हा विषय आहे. तिसऱ्या दिवशी अंतर्गत सुरक्षा यंत्रणांसमोरची आव्हानं नि धोके, बाह्य धोके यावर चर्चा होईल. लष्करी नि इतर क्षेत्रातील जाणकार मान्यवर यात सहभागी होतील. वीर सेनानीचे कर्नल विक्रम पत्की, सुनील वालावलकर, स्वर निनादचे भारत बलवल्ली, ज्ञानेश परांजपे यासह इतर सर्वजण यासाठी परिश्रम घेत आहेत. अशा प्रकारचा कार्यक्रम मुंबईत पहिल्यांदाच होत असल्याने जास्तीतजास्त लोकांनीं याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं जातंय.”

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content