HomeArchiveउशीर झाला.. बाद!

उशीर झाला.. बाद!

Details
उशीर झाला.. बाद!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

वैभव मोहन पाटील
[email protected]
रविवारी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये उमेदवारांना काही मिनिटे उशीर झाल्याने परीक्षेला बसू न देण्याचा घडलेला प्रकार बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. राज्यातील लाखो बेरोजगार पदवीधरांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एमपीएससी परीक्षेचा मोठा आधार असतो. त्यामुळेच काही मोजक्या जागांसाठी लाखो बेरोजगार अर्ज करतात. या बेरोजगारांकडून एमपीएससीकडून तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत परीक्षा फी म्हणून दर परीक्षेला उकळली जाते. परीक्षेची वेळ दहाची असताना त्यांना साडेआठ वाजताच परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात येतात.

 

सुरक्षा व तपासणीच्या कारणास्तव लवकर बोलावण्याचे प्रयोजन असल्याचे सांगण्यात येत असले तरी ह्या बेरोजगार तरुणांची काटेकोर तपासणी करायला ते काही गुन्हेगार नक्कीच नाहीत. त्यात दुरून येणाऱ्या, वाहतूककोंडी व इतर कारणांमुळे काही मिनिटे उशीर झालेल्या उमेदवारांना प्रवेश नाकारला जात असेल तर ती बेरोजगारांच्या दुर्दैवात भर आहे असेच म्हणावे लागेल. दहा वाजताची परीक्षा असताना साडेनऊच्या ठोक्याला परीक्षा केंद्रात उमेदवारांचा प्रवेश बंद करण्यात येतो. आधीच बैठक क्रमांकाच्या घोळावरून या परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या असतानाच परीक्षा देण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या बेरोजगार उमेदवारांना दोन तीन मिनिटे उशीर झाल्याने परीक्षेलाच बसू दिले जात नसेल तर सरकारने यात हस्तक्षेप करून धोरण बदलण्याची गरज आहे जेणेकरून सर्व उमेदवारांना स्पर्धा परीक्षांत सहभाग घेण्याची संधी मिळून न्याय मिळेल.”
 
“वैभव मोहन पाटील
[email protected]
रविवारी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये उमेदवारांना काही मिनिटे उशीर झाल्याने परीक्षेला बसू न देण्याचा घडलेला प्रकार बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. राज्यातील लाखो बेरोजगार पदवीधरांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एमपीएससी परीक्षेचा मोठा आधार असतो. त्यामुळेच काही मोजक्या जागांसाठी लाखो बेरोजगार अर्ज करतात. या बेरोजगारांकडून एमपीएससीकडून तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत परीक्षा फी म्हणून दर परीक्षेला उकळली जाते. परीक्षेची वेळ दहाची असताना त्यांना साडेआठ वाजताच परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात येतात.

 

सुरक्षा व तपासणीच्या कारणास्तव लवकर बोलावण्याचे प्रयोजन असल्याचे सांगण्यात येत असले तरी ह्या बेरोजगार तरुणांची काटेकोर तपासणी करायला ते काही गुन्हेगार नक्कीच नाहीत. त्यात दुरून येणाऱ्या, वाहतूककोंडी व इतर कारणांमुळे काही मिनिटे उशीर झालेल्या उमेदवारांना प्रवेश नाकारला जात असेल तर ती बेरोजगारांच्या दुर्दैवात भर आहे असेच म्हणावे लागेल. दहा वाजताची परीक्षा असताना साडेनऊच्या ठोक्याला परीक्षा केंद्रात उमेदवारांचा प्रवेश बंद करण्यात येतो. आधीच बैठक क्रमांकाच्या घोळावरून या परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या असतानाच परीक्षा देण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या बेरोजगार उमेदवारांना दोन तीन मिनिटे उशीर झाल्याने परीक्षेलाच बसू दिले जात नसेल तर सरकारने यात हस्तक्षेप करून धोरण बदलण्याची गरज आहे जेणेकरून सर्व उमेदवारांना स्पर्धा परीक्षांत सहभाग घेण्याची संधी मिळून न्याय मिळेल.”
 

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content