Homeमुंबई स्पेशलसांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्याला अडथळा...

सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्याला अडथळा ठरणारी ५ बांधकामे पाडली

मुंबईतल्या सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्पअंतर्गत लालबहादूर शास्त्री मार्गावर एका मार्गिकेचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. या जोडरस्त्याच्या कामात एल विभागाच्या हद्दीतील पाच बांधकामे अडथळा ठरत होती. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पोलीस यांनी एकत्रित कार्यवाही करून या पाच बांधकामांचे नुकतेच निष्कासन करण्यात आले. त्यामुळे या जोडरस्त्याच्या कामाला वेग मिळणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एल विभागअंतर्गत लाल बहादूर शास्त्री मार्गावर सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याची एक मार्गिका घाटकोपरच्या दिशेने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या पूल विभागाकडून हे काम करण्यात येत आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावर मार्गिका उपलब्ध करून दिल्याने सांताक्रूझच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना घाटकोपरला जाण्याचा मार्ग सुलभ होणार आहे. या प्रकल्पांतर्गत अडथळा ठरणाऱ्या पाच बांधकामाच्या निष्कासनाची कारवाई करण्यासाठीचे निर्देश उपायुक्त (परिमंडळ ५) हर्षद काळे आणि एल विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांनी दिले होते. त्यानुसार पालिकेचे अभियंते, १५ कामगार, दोन जेसीबी आणि पोलीस दलाच्या मदतीने ही निष्कासन कारवाई करण्यात आली. आज (दिनांक १९ डिसेंबर २०२३) पार पडली. 

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content