Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्रासह 4 राज्यांत...

महाराष्ट्रासह 4 राज्यांत रेल्वेच्या 4,000 कोविड बोगी!

सौम्य तसेच म्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोविड रूगणांसाठी रेल्वेने सुमारे 64,000 खाटा असलेल्या 4,000 कोविड सेवा रेल्वेबोगी देशातील विविध रेल्वेस्थानकांवर तैनात केल्या आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्लीत ही सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

त्यातील काहींनी कोविडच्या पहिल्या लाटेच्या वेळी रुग्णांच्या विलगीकरणाच्या गरजा पूर्ण केल्या आहेत. यासंदर्भात, राज्य सरकारांना त्यांच्या राज्यांतील कोविड सेवा बोगींच्या थांब्याचे ठिकाण, त्याच्या परीचालनासाठी असलेल्या कार्यपद्धती आणि मानक कार्यप्रणाली (एसओपी) यांच्याबद्दल अवगत करण्यात आल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.

दिल्लीमध्ये 50 बोगी (800 खाटा  असलेले) शकुरबस्ती स्थानकात तैनात आहेत (सध्या त्यात 4 रुग्ण दाखल आहेत आणि 25 बोगी (400 खाटा  असलेले), आनंद विहार टर्मिनलवर उपलब्ध आहेत. नंदुरबार (महाराष्ट्र) येथे 21 बोगी (378 खाटा असलेले) आणि त्यात 55 रुग्ण सध्या दाखल आहेत. भोपाळ स्थानकात 20 बोगी दाखल झाल्या  आहेत. पंजाबमध्ये 50 बोगी तैनात करण्यासाठी सज्ज आहेत तर जबलपूरमध्ये 20 बोगी तैनात करण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारांनी मागणी केल्यास ही विलगीकरण केंद्रे सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांच्या गरजा पूर्ण करतील. या रुग्णांना जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी तसेच या डब्यात स्वच्छता राखण्यासाठी रेल्वे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

सध्या देश कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या संकटाशी सामना करत आहे. अशा वेळी रेल्वे मंत्रालय कोविड-19च्या पहिल्या लाटेदरम्यान तयार करण्यात आलेल्या, कोविड सेवा विलगीकरण  (कोविड केअर आयसोलेशन) बोगीच्या रचनेत अधिक सुधारणा करत ते तैनात करण्याचा  पुनश्च प्रयत्न करत आहे. या बोगी सौम्य लक्षणे असलेल्या कोविड रूग्णांच्या विलगीकरणासाठी अतिरिक्त आरोग्य सेवा म्हणून कार्य करण्यास सज्ज करण्यात आल्या  आहेत. या डब्यांमधून सद्ध्याच्या उष्ण हवामानाच्या पार्श्वभूमीवर कूलर, तागाच्या चटया उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

1 मेपासूनच्या लसीकरणासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शन

दरम्यान, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि कोविड-19चा मुकाबला करण्यासाठी तंत्रज्ञान व डेटा व्यवस्थापनावरील अधिकारप्राप्त गटाचे अध्यक्ष डॉ. आर. एस. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत नव्या लसीकरण कार्यनीतीच्या (टप्पा-3) प्रभावी अंमलबजावणीबाबत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शन करण्यात आले.

कोविन मंच 1 मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या नवीन टप्प्यासाठी सुसज्ज आहे. यावर राज्य/केंद्रशासित प्रदेशांकडून योग्य आणि वेळेवर माहिती अपलोड करावी. खासगी रुग्णालये, औद्योगिक प्रतिष्ठानांची रुग्णालये, उद्योग संस्था इ. इत्यादींचा समावेश करून अभियानस्तरावर अतिरिक्त खासगी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रांची नोंदणी करत नियुक्त केलेल्या योग्य प्राधिकरणासह समन्वय राखत अर्ज / विनंत्या यासाठी व्यवस्था आणि त्यावरील कृती, प्रलंबित नोंदणीवर देखरेख ठेवावी. लसी खरेदी केलेल्या आणि कोविनवर  किंमती आणि साठा जाहीर केलेल्या रुग्णालयांच्या संख्येवर लक्ष ठेवावे. कोविनवर लसीकरण स्लॉट्सची पुरेशी दृश्यता प्रदान करून पात्र व्यक्तींसाठी लसीकरण वेळापत्रक तयार करावे. राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या लसींच्या थेट खरेदीसंदर्भातील निर्णयाला प्राधान्य द्यावे. 18-45 वयोगटासाठी ‘केवळ ऑनलाइन नोंदणी’च्या सुविधेबद्दल प्रचार करा. लसीकरण, एईएफआय अहवाल देणे आणि व्यवस्थापन याविषयी सीव्हीसी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण द्यावे, लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी गर्दीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी कायदा आणि सुव्यवस्था अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा, आदी सूचना त्यांनी दिल्या आहेत.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content