Homeमुंबई स्पेशलमुंबईतल्या 269 शाळा...

मुंबईतल्या 269 शाळा अनधिकृत शाळा होणार अधिकृत!

तांत्रिकदृष्ट्या ज्या 269 शाळा अनधिकृत ठरवण्यात आल्या आहेत त्या अधिकृत करण्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच त्याला मान्यता दिली जाईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केले.

दुपारच्या सत्रात कपिल पाटील यांनी एका लक्षवेधी सूचनेद्वारे शैक्षणिक संस्थांच्या समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबईतल्या सरकारमान्य खाजगी शिक्षण संस्थांचा मालमत्ता कर रद्द करावा, त्यांना लावण्यात येणाऱ्या पाणीपट्टीचा दर व्यवसायिक न ठेवता तो निवासी करावा, त्याचप्रमाणे झोपडपट्टी परिसरात असलेल्या तांत्रिकदृष्ट्या अनधिकृत 269 शाळांना अधिकृत करावे अशी मागणी पाटील यांनी केली. या शाळांमधून 70 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळा जर बंद झाल्या तर हे विद्यार्थी जातील कुठे, असा सवालही त्यांनी केला. रिलायन्स, अंबानी अशा मोठमोठ्या शाळा वगळता खाजगी शाळांनाही मुंबई महापालिकेतर्फे त्यांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या 27 वस्तू देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. कायम विनाअनुदानित असलेल्या 104 शाळांना मुंबई महापालिकेने स्वनिधीतून अनुदान देण्याची तयारी दाखवली आहे. याबाबत त्वरित निर्णय व्हावा, अशी मागणीही कपिल पाटील यांनी केली.

शाळा

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्याला उत्तर दिले. मुंबईतल्या झोपडपट्टीत असलेल्या शाळांना धर्मादाय आयुक्तांकडे त्यांची नोंदणी असेल तर मालमत्ता करातून सूट मिळते. योग्य कागदपत्रे असतील तर महापालिकेने त्यांना विनाअट तशी सवलत द्यावी असे निर्देश देण्यात येतील. या शाळांसाठी असलेल्या पाणीपट्टीचा दर 62 रुपयांवरून दहा रुपये 35 पैसे असा निवासी दराने करावा, असे त्यांचे म्हणणे आहे. यामध्ये फार मोठी तफावत असल्याने याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

ज्या खाजगी शाळांना मुंबई महापालिकेकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या 27 वस्तू घेण्यामध्ये स्वारस्य असेल त्यांनी तशी विनंती केल्यास त्यांना ते पुरवले जातील, असेही सामंत म्हणाले. ज्या 104 शाळांना स्वनिधीतून अनुदान देण्याचे आश्वासन मुंबबई महापालिकेने दिले होते, त्यातील 92 शाळांना ते दिले जाईल आणि तेथील शिक्षकांना सातवा वेतन आयोग दिला जावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. बंद असलेल्या बारा शाळा यातून वगळण्यात आल्या आहेत, असेही उद्योगमंत्र्यांनी सांगितले.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content