HomeArchiveस्वातंत्र्यवीर दौड 2019...

स्वातंत्र्यवीर दौड 2019 चे आयोजन

Details
स्वातंत्र्यवीर दौड 2019 चे आयोजन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार कृतीशील कार्य करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्याच्या पूर्वसंध्येला सैन्यदलातील शूरवीरांना अभिवादन करणारी स्वातंत्र्यवीर दौड 2019 26 मे 2019 यादिवशी सकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. 28 मे या स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीदिनी गेली अनेक वर्षे सैन्यदलातील शूरवीरांना शौर्य पुरस्कार दिला जातो. स्वातंत्र्यवीर दौड मधून होणाऱ्या निधी संकलातून सैन्यदलातील शूरवीरांच्या कुटुंबियांना सहाय्य करण्यात येईल. ही दौड 16 ते 80 या वयोगटातील सर्वांसाठी असून त्याची नावनोंदणी सुरू झाली आहे, अशी माहिती या उपक्रमाचे प्रमुख विज्ञानेश मासावकर यांनी दिली आहे.

 

स्पर्धेत 2.5 लाख रूपये किंमतीची वेगवेगळ्या गटात एकूण 64 पारितोषिके दिली जातील. तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्रदेखील दिले जाईल. नावनोंदणी तसेच अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 9220070386, 022-4459197 तसेच संकेतस्थळ www.savarkarsmarak.com वर संपर्क साधावा. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, वीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क येथेही स्पर्धेची नोंदणी करता येऊ शकते. ऑनलाईनद्वारेही नोंदणी करता येणार असून त्याच्या लिंक अशा.
https://events.indiarunning.com/Event/Details/SwatantryaveerRun2019/2799, Townscript – https://www.townscript.com/e/swatantryaveer-run-2019-302433, Bazabuzz – https://bazabuzz.com/events/2/m.swatantryaveer-run-2019.html

स्पर्धेचे स्वरूप असे– 5 किमी धाव – वयोगट 16 ते 25 वर्षे, 26 ते 35 वर्षे, 36 ते 45 वर्षे, 46 ते 55 वर्षे, 56 वर्षांवरील व्यक्ती. 10 किमी धावः वयोगट 18 ते 27वर्षे, 28 ते 37 वर्षे, 38 ते 47 वर्षे, 48 ते 57 वर्षे, 58 वर्षांवरील व्यक्ती.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याला अभिवादन करणारी ही दौड असून त्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक प्रभावी करण्याचा उद्देश आहे. त्याचबरोबर या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय जवानांचे शौर्य तसेच कामगिरीदेखील अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिप्रेत असलेला समाज तसेच राष्ट्र निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे, असेही मासावकर यांनी म्हटले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार कृतीशील कार्य करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्याच्या पूर्वसंध्येला सैन्यदलातील शूरवीरांना अभिवादन करणारी स्वातंत्र्यवीर दौड 2019 26 मे 2019 यादिवशी सकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. 28 मे या स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीदिनी गेली अनेक वर्षे सैन्यदलातील शूरवीरांना शौर्य पुरस्कार दिला जातो. स्वातंत्र्यवीर दौड मधून होणाऱ्या निधी संकलातून सैन्यदलातील शूरवीरांच्या कुटुंबियांना सहाय्य करण्यात येईल. ही दौड 16 ते 80 या वयोगटातील सर्वांसाठी असून त्याची नावनोंदणी सुरू झाली आहे, अशी माहिती या उपक्रमाचे प्रमुख विज्ञानेश मासावकर यांनी दिली आहे.

 

स्पर्धेत 2.5 लाख रूपये किंमतीची वेगवेगळ्या गटात एकूण 64 पारितोषिके दिली जातील. तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्रदेखील दिले जाईल. नावनोंदणी तसेच अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 9220070386, 022-4459197 तसेच संकेतस्थळ www.savarkarsmarak.com वर संपर्क साधावा. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, वीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क येथेही स्पर्धेची नोंदणी करता येऊ शकते. ऑनलाईनद्वारेही नोंदणी करता येणार असून त्याच्या लिंक अशा.
https://events.indiarunning.com/Event/Details/SwatantryaveerRun2019/2799, Townscript – https://www.townscript.com/e/swatantryaveer-run-2019-302433, Bazabuzz – https://bazabuzz.com/events/2/m.swatantryaveer-run-2019.html

स्पर्धेचे स्वरूप असे– 5 किमी धाव – वयोगट 16 ते 25 वर्षे, 26 ते 35 वर्षे, 36 ते 45 वर्षे, 46 ते 55 वर्षे, 56 वर्षांवरील व्यक्ती. 10 किमी धावः वयोगट 18 ते 27वर्षे, 28 ते 37 वर्षे, 38 ते 47 वर्षे, 48 ते 57 वर्षे, 58 वर्षांवरील व्यक्ती.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याला अभिवादन करणारी ही दौड असून त्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक प्रभावी करण्याचा उद्देश आहे. त्याचबरोबर या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय जवानांचे शौर्य तसेच कामगिरीदेखील अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिप्रेत असलेला समाज तसेच राष्ट्र निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे, असेही मासावकर यांनी म्हटले आहे.”
 

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content