HomeArchiveशरद पवार महाराष्ट्राचे...

शरद पवार महाराष्ट्राचे ‘मुख्यमंत्री’?

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“लॉकडाऊनच्या काळात विविध वीज कंपन्यांकडून पावण्यात आलेल्या वाढीव वीजबीलांतून सर्वसामान्यांना सूट द्यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची याकरीता भेट घेण्याचा सल्ला दिल्याने हे राज्य नेमके कोण चालवते, असा प्रश्न चर्चेला आला आहे.”
  

 
“राज्यपालांची भेट घेताना राज ठाकरे यांच्याबरोबर राजभवनात बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक प्रमुख नेते त्यांच्यासोबत उपस्थित होते.”
 
“लोकांना येणाऱ्या वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपालांशी चर्चा केली. गेली अनेक दिवस माझा पक्ष, कार्यकर्ते प्रकरणी आंदोलन करत आहेत. याप्रकरणी अदानी, बीईएसटीचे लोक भेटून गेले. वीज बिल आम्ही कमी करू शकतो पण एमईआरसीने आम्हाला मान्यता दिली पाहिजे असे त्यांनी सांगितले. पक्षाचे एक शिष्टमंडळ जाऊन एमईआरसीच्या लोकांना भेटून आले. त्यांच्याकडन लेखी स्वरुपात पत्र आले. कंपन्या वीज बिले कमी करण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. आमचे त्यांच्यावर दडपण नाही असे त्यांचे म्हणणे आहे. मग सरकार का थांबले आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी नंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केला.”
  

 
“राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणं झाले. त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊ असे सांगितले. त्यांनीही एकदा शरद पवारांशी बोलून घ्या सांगितले. मी पवार साहेबांशीही बोलणार आहे. मला वाटते हा विषय राज्य सरकारला माहिती आहे. लोकांना जिथे २००० बिल येत होते तिथे १० हजार बिल येत आहे. राज्य सरकारला माहिती आहे तर मग प्रकरण कशात अडकले आहे कळत नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे.”
 
“याचा निर्णय तत्काळ घ्यायला पाहजे. त्याच्यासाठी पहिले निवेदन राज्यपालांना दिले आहे. शरद पवारांशी फोनवरुन किंवा प्रत्यक्षात जाऊन चर्चा करणार. वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांना भेटणार. राज्यपालही बोलणार आहेत. पण, सरकार आणि राज्यपालांचे फार सख्य असल्याने विषय किती पुढे जातील कल्पना नाही. पण ते सरकारसमोर गोष्ट मांडतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हे सरकार कुंथत कुंथत काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली.”

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content