HomeArchiveवक्त्यांचा महाराष्ट्र!

वक्त्यांचा महाराष्ट्र!

Details
वक्त्यांचा महाराष्ट्र!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
परवाचे राज ठाकरे यांचे भाषण तडाखेबंद होते. लोकसभेची एकही जागा मनसे लढवित नाही. तरीही मोदीमुक्त भारत करण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे हे आपले चुलते बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राजकारणी नाहीत. ते कलाकार आहेत. त्यामुळे राजकारण्यांच्या ठायी असलेले छक्केपंजे राज यांच्याकडे नाहीत. मनात एक आणि ओठात एक असे त्यांचे नसते. जे काही बोलायचे ते राज स्पष्टपणे बोलतात. राज यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हेदेखील असेच आक्रमक आणि जहाल वक्ते होते. ते राजकारणी नव्हते तर समाजसुधारक होते. एकदा बाळासाहेब आमच्याशी बोलताना म्हणाले होते की ‘‘दादांच्या समाजसुधारकाच्या भूमिकेमुळे आम्हाला खूप भोगावे लागले आहे. दादा जिवंत असताना आमच्या घरावरून त्यांची अंत्ययात्रा जाताना आम्ही पाहिली आहे.’’ सारांश, निर्भिडपणे बोलणे ही ठाकरे घराण्याची तीन पिढ्यांची परंपरा आहे.

 

तो ऐतिहासिक वारसा राज ठाकरे आज पुढे चालवत आहेत. जनसमुहाला आपल्या वक्तृत्त्वाने मोहिनी घालणे ही साधी गोष्ट नव्हे. त्यासाठी उपजत नेतृत्त्व आणि वक्तृत्त्वगुण असावे लागतात. महाराष्ट्र त्यादृष्टीने भाग्यवान आहे. किंबहुना, महाराष्ट्र म्हणजे उत्तमोत्तम वक्त्यांची खाण आहे. या भूमीने अनेक चांगले वक्ते दिले आहेत. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे काही फ़र्डे वक्ते नव्हते. पण ते विद्वान होते. त्यांचा व्यासंग दांडगा होता. त्यामुळे ते बोलत तेव्हा सभेला मंत्रमुग्ध करत. संथपणे वाहणार्या. कृष्णा नदीच्या पात्रासारखे त्यांचे भाषण असे. साठ आणि सत्तरच्या दशकात यशवंतरावजी महाराष्ट्रातील काँग्रेसचे मोठे नेते होते.

 

आपल्या वाणीने आणि लेखणीने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवून देणार्यास आचार्य अत्रेंना कोण बरे विसरेल? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या काळात आचार्य अत्रेंच्या विराट सभा होत. आपल्या धारदार वक्तृत्त्वाने ते मैदान जिंकत. आचार्य अत्रे भाषणासाठी उभे राहिले तरी लोकांमध्ये हंशा पिकत असे. अत्रेसाहेब हजरजबाबी आणि विनोदी होते. त्यासंदर्भातील एक किस्सा नमूद करण्यासारखा आहे. गिरगावच्या गायवाडीत अत्रेंची सभा होती. अत्रेंना यायला उशीर झाला. अत्रे भाषणासाठी उभे राहिले तेव्हा एक वात्रट श्रोता ओरडला, ‘‘अत्रे उशीर झाला.’’ त्यावर अत्रे पटकन म्हणाले, ‘‘मग गायवाडीत लवकर यायला मी काय बैल आहे?’’ (प्रचंड हंशा).
आचार्य अत्रेंनंतर महाराष्ट्राने पाहिलेले दुसरे प्रचंड लोकप्रिय वक्ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होय. बाळासाहेबांची वाणी म्हणजे मुलुखमैदानी तोफ होती. निवडणुकीचे पारडे फिरविण्याची ताकद बाळासाहेबांच्या वक्तृत्त्वात होती. 1995 साली विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांच्या विरोधात शिवसेनेने बाळा नांदगावकर हा नवखा उमेदवार उभा केला होता. तो पडणार असे चित्र दिसत होते. पण प्रचाराचा कालावधी संपण्यापूर्वी बाळासाहेबांची प्रचंड मोठी सभा काळाचौकी, अभ्युदयनगर येथे झाली. या एका सभेने भुजबळ यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले. नांदगावकर विजयी झाले.

 

काँग्रेसचे विलासराव देशमुख हेदेखील फर्डे वक्ते होते. मिश्किलपणे विरोधकांना चिमटे काढीत त्यांची टोपी उडविण्यात ते वाकबगार होते. किंबहुना, विलासराव म्हणजे काँग्रेसचा महाराष्ट्रातील हुकमी एक्का होता. दुर्दैवाने ते लवकर गेले. ऐंशीच्या दशकात प्रमोद महाजन यांचे भाषण आम्ही प्रथम ऐकले. शिवतीर्थावरील त्या विराट सभेत त्यांनी हंशा आणि टाळ्या उकळताना आम्ही पाहिले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत झालेले महाजन यांचे ते प्रभावी भाषण आजही आमच्या नजरेसमोर जसेच्या तसे दिसत आहे. भाजपमध्ये आजही अनेक चांगले वक्ते आहेत. पण महाजन ते महाजन होते. भाजपाचे प्रवक्ते मधु चव्हाण हेदेखील उत्तम वक्ते आहेत. त्यांचा व्यसंग दांडगा आहे. म्हणूनच त्यांची भाषणे रंगतात. लोकांना ती आवडतात. सारांश, महाराष्ट्र ही वक्त्यांची खाण आहे. त्या खाणीतील एक चमकणारा हिरा म्हणजे राज ठाकरे होय. गुढी पाडव्याच्या त्या सभेत राज हे आक्रमक योध्द्याप्रमाणे मोदी-शाहंच्या विरोधात उभे ठाकले. त्यांचे आम्हाला कौतुक वाटते.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
परवाचे राज ठाकरे यांचे भाषण तडाखेबंद होते. लोकसभेची एकही जागा मनसे लढवित नाही. तरीही मोदीमुक्त भारत करण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे हे आपले चुलते बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राजकारणी नाहीत. ते कलाकार आहेत. त्यामुळे राजकारण्यांच्या ठायी असलेले छक्केपंजे राज यांच्याकडे नाहीत. मनात एक आणि ओठात एक असे त्यांचे नसते. जे काही बोलायचे ते राज स्पष्टपणे बोलतात. राज यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हेदेखील असेच आक्रमक आणि जहाल वक्ते होते. ते राजकारणी नव्हते तर समाजसुधारक होते. एकदा बाळासाहेब आमच्याशी बोलताना म्हणाले होते की ‘‘दादांच्या समाजसुधारकाच्या भूमिकेमुळे आम्हाला खूप भोगावे लागले आहे. दादा जिवंत असताना आमच्या घरावरून त्यांची अंत्ययात्रा जाताना आम्ही पाहिली आहे.’’ सारांश, निर्भिडपणे बोलणे ही ठाकरे घराण्याची तीन पिढ्यांची परंपरा आहे.

 

तो ऐतिहासिक वारसा राज ठाकरे आज पुढे चालवत आहेत. जनसमुहाला आपल्या वक्तृत्त्वाने मोहिनी घालणे ही साधी गोष्ट नव्हे. त्यासाठी उपजत नेतृत्त्व आणि वक्तृत्त्वगुण असावे लागतात. महाराष्ट्र त्यादृष्टीने भाग्यवान आहे. किंबहुना, महाराष्ट्र म्हणजे उत्तमोत्तम वक्त्यांची खाण आहे. या भूमीने अनेक चांगले वक्ते दिले आहेत. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे काही फ़र्डे वक्ते नव्हते. पण ते विद्वान होते. त्यांचा व्यासंग दांडगा होता. त्यामुळे ते बोलत तेव्हा सभेला मंत्रमुग्ध करत. संथपणे वाहणार्या. कृष्णा नदीच्या पात्रासारखे त्यांचे भाषण असे. साठ आणि सत्तरच्या दशकात यशवंतरावजी महाराष्ट्रातील काँग्रेसचे मोठे नेते होते.

 

आपल्या वाणीने आणि लेखणीने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवून देणार्यास आचार्य अत्रेंना कोण बरे विसरेल? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या काळात आचार्य अत्रेंच्या विराट सभा होत. आपल्या धारदार वक्तृत्त्वाने ते मैदान जिंकत. आचार्य अत्रे भाषणासाठी उभे राहिले तरी लोकांमध्ये हंशा पिकत असे. अत्रेसाहेब हजरजबाबी आणि विनोदी होते. त्यासंदर्भातील एक किस्सा नमूद करण्यासारखा आहे. गिरगावच्या गायवाडीत अत्रेंची सभा होती. अत्रेंना यायला उशीर झाला. अत्रे भाषणासाठी उभे राहिले तेव्हा एक वात्रट श्रोता ओरडला, ‘‘अत्रे उशीर झाला.’’ त्यावर अत्रे पटकन म्हणाले, ‘‘मग गायवाडीत लवकर यायला मी काय बैल आहे?’’ (प्रचंड हंशा).
आचार्य अत्रेंनंतर महाराष्ट्राने पाहिलेले दुसरे प्रचंड लोकप्रिय वक्ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होय. बाळासाहेबांची वाणी म्हणजे मुलुखमैदानी तोफ होती. निवडणुकीचे पारडे फिरविण्याची ताकद बाळासाहेबांच्या वक्तृत्त्वात होती. 1995 साली विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांच्या विरोधात शिवसेनेने बाळा नांदगावकर हा नवखा उमेदवार उभा केला होता. तो पडणार असे चित्र दिसत होते. पण प्रचाराचा कालावधी संपण्यापूर्वी बाळासाहेबांची प्रचंड मोठी सभा काळाचौकी, अभ्युदयनगर येथे झाली. या एका सभेने भुजबळ यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले. नांदगावकर विजयी झाले.

 

काँग्रेसचे विलासराव देशमुख हेदेखील फर्डे वक्ते होते. मिश्किलपणे विरोधकांना चिमटे काढीत त्यांची टोपी उडविण्यात ते वाकबगार होते. किंबहुना, विलासराव म्हणजे काँग्रेसचा महाराष्ट्रातील हुकमी एक्का होता. दुर्दैवाने ते लवकर गेले. ऐंशीच्या दशकात प्रमोद महाजन यांचे भाषण आम्ही प्रथम ऐकले. शिवतीर्थावरील त्या विराट सभेत त्यांनी हंशा आणि टाळ्या उकळताना आम्ही पाहिले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत झालेले महाजन यांचे ते प्रभावी भाषण आजही आमच्या नजरेसमोर जसेच्या तसे दिसत आहे. भाजपमध्ये आजही अनेक चांगले वक्ते आहेत. पण महाजन ते महाजन होते. भाजपाचे प्रवक्ते मधु चव्हाण हेदेखील उत्तम वक्ते आहेत. त्यांचा व्यसंग दांडगा आहे. म्हणूनच त्यांची भाषणे रंगतात. लोकांना ती आवडतात. सारांश, महाराष्ट्र ही वक्त्यांची खाण आहे. त्या खाणीतील एक चमकणारा हिरा म्हणजे राज ठाकरे होय. गुढी पाडव्याच्या त्या सभेत राज हे आक्रमक योध्द्याप्रमाणे मोदी-शाहंच्या विरोधात उभे ठाकले. त्यांचे आम्हाला कौतुक वाटते.”
 
 
 

Continue reading

इराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची चर्चा!

अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम उद्या संपत असतानाच अमेरिकेबरोबर पाकिस्तानात होऊ घातलेल्या चर्चेला इराणने नकार दिला आहे. आम्ही सरशीत असताना आमच्या अटीशर्तींवरच अमेरिकेबरोबर चर्चा होईल, असे इराणच्या लष्करी गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या होर्मूझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण...

लग्नासाठी भाड्याने मिळणार कोल्हापूरची चित्रनगरी व नितीन देसाईंचा स्टडिओ?

चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रिकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूरची चित्रनगरी तसेच कर्जतमधला एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे सांस्कृतिक...

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख...
Skip to content