HomeArchiveराण्याचो झील!

राण्याचो झील!

Details
राण्याचो झील!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
नारायण राण्याचो झील खुळो झालो हां का? त्येका येड लागला हां का? तेंका बापाशीन शानपणा शिकयिला नाय का? राण्याचो झील निलेश राणे याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लोकनेते आनंद दिघे यांची हत्त्या करण्यापासून ते गायक सोनू निगम याच्या हत्त्येचा प्रयत्न करण्यापर्यंत अनेक बदनामीकारक आरोप निलेश राणे यांनी केले आहेत. आपले वडील नारायण राणे यांच्यापेक्षा चार पावले पुढे जात निलेशने हे आरोप केले आहेत. अर्थात त्यासोबत कोणतेही पुरावे जोडलेले नाहीत. आरोप करणे सोपे असते. पण पुरावे नसतील तर त्या आरोपाला काही अर्थ नसतो.

एकेकाळी गो. रा. खैरनार असेच शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत सुटले होते. आपल्याकडे पवार यांच्याविरोधात ट्रकभर पुरावे असल्याचे ते सांगत होते. प्रत्यक्षात ते पुरावा म्हणून कागदाचा एक चिटोरादेखील देऊ शकले नाहीत. खैरनार यांच्याप्रमाणेच समाजसेवक अण्णाहजारे हेदेखील अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत सुटले होते. त्यांनी असेच काही आरोप तत्कालीन मंत्री बबनराव घोलप यांच्यावर केले. घोलप यांनी अण्णांना कोर्टात खेचले. त्यांनी निलेश पावसकर या सुप्रसिद्ध वकिलाकडे आपले वकिलपत्र सोपविले. डॉ. पावसकर यांनी अण्णांची भेट घेऊन त्यांना नम्रपणे दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले. मात्र अण्णांनी नकार दिला. नंतर कोर्टात झालेल्या लढाईत अण्णा दोषी ठरले. त्यांना दोन महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. पण मनोहर जोशी सरकारने आपल्या अधिकारात ही शिक्षा दोन दिवसांत रद्द करून अण्णांना मुक्त केले.

 

सारांश, आरोप करतांना जवळ भक्कम पुरावे असणे आवश्यक असते. त्यात जे व्यक्तिमत्व लाखो लोकांचे श्रद्धास्थान असते त्यांच्यावर आरोप करणे तर अधिकच गंभीर मानले जाते. अशा आरोपांमुळे लाखो लोकांच्या भावना दुखावून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.आज निलेश राणे यांनी बाळासाहेबांवर गंभीर आरोप करून मोठी चूक केली आहे. त्यांना जर उद्या शिक्षा झाली तर कोणतेही सरकार, अण्णा हजारेंना सोडले तसे, दोन दिवसांत मुक्त करणारनाही. न्यायालय देईल ती शिक्षा निलेश राणे यांना भोगावी लागेल.

वास्तविक गेलेल्या माणसांबद्दल वाईट बोलणे ही आपली संस्कृती नाही. मग निलेश राणे असे का पिसाटले? शिवसेनेचे विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर जहाल टीका केल्यामुळेच निलेश यांचा तोल गेला. पण विनायक राऊत म्हणजे उद्धव ठाकरे नव्हेत. निलेश यांना टीका करायचीच होती तर ती त्यांनी राऊत यांच्यावर करायला हवी होती. त्यांचे वाभाडे काढायला हवे होते. या जगात नसलेल्या बाळासाहेबांवर आरोप करून त्यांनी काय साधले? नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यावर बाळासाहेबांनी त्यांच्यावर वारंवार ठाकरी भाषेत जहरी टीका केली. पण नारायणरावांनी आपला संयम कधीच ढळू दिला नाही. बाळासाहेबांवरची श्रद्धा कधी हटू दिली नाही. अखेरपर्यंत त्यांनी बाळासाहेबांचा आदर केला. निलेश राणे यांना हे सारे ठाऊक आहे. आपले वडील नारायण राणे यांना बाळासाहेबांनी जमिनीवरून उचलून नगरसेवक पदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत अनेक मोठी पदे दिली, हेदेखील त्यांना ठाऊक आहे. मग बाळासाहेबांच्या बाबतीत अशी कृतघ्नता त्यांनी का दाखवावी? बाळासाहेब हे लाखो शिवसैनिकांप्रमाणे नारायणरावांचेदेखील दैवत आहे. आपल्या वडिलांच्या दैवतावर चिखलफेक करूननिलेश यांनी मोठा नैतिक गुन्हा केला आहे. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. जे झाले ते झाले. आता निलेश राणे यांनी मोठ्या मनाने दिलगिरी व्यक्त करून या प्रकरणावर पडदा टाकावा. त्यांनी तसे न केल्यास त्यांचे वडीलही त्यांना क्षमा करणार नाहीत. एमबीए असलेल्या तरुणाला आम्ही आणखी काय शहाणपण शिकविणार?”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
नारायण राण्याचो झील खुळो झालो हां का? त्येका येड लागला हां का? तेंका बापाशीन शानपणा शिकयिला नाय का? राण्याचो झील निलेश राणे याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लोकनेते आनंद दिघे यांची हत्त्या करण्यापासून ते गायक सोनू निगम याच्या हत्त्येचा प्रयत्न करण्यापर्यंत अनेक बदनामीकारक आरोप निलेश राणे यांनी केले आहेत. आपले वडील नारायण राणे यांच्यापेक्षा चार पावले पुढे जात निलेशने हे आरोप केले आहेत. अर्थात त्यासोबत कोणतेही पुरावे जोडलेले नाहीत. आरोप करणे सोपे असते. पण पुरावे नसतील तर त्या आरोपाला काही अर्थ नसतो.

एकेकाळी गो. रा. खैरनार असेच शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत सुटले होते. आपल्याकडे पवार यांच्याविरोधात ट्रकभर पुरावे असल्याचे ते सांगत होते. प्रत्यक्षात ते पुरावा म्हणून कागदाचा एक चिटोरादेखील देऊ शकले नाहीत. खैरनार यांच्याप्रमाणेच समाजसेवक अण्णाहजारे हेदेखील अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत सुटले होते. त्यांनी असेच काही आरोप तत्कालीन मंत्री बबनराव घोलप यांच्यावर केले. घोलप यांनी अण्णांना कोर्टात खेचले. त्यांनी निलेश पावसकर या सुप्रसिद्ध वकिलाकडे आपले वकिलपत्र सोपविले. डॉ. पावसकर यांनी अण्णांची भेट घेऊन त्यांना नम्रपणे दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले. मात्र अण्णांनी नकार दिला. नंतर कोर्टात झालेल्या लढाईत अण्णा दोषी ठरले. त्यांना दोन महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. पण मनोहर जोशी सरकारने आपल्या अधिकारात ही शिक्षा दोन दिवसांत रद्द करून अण्णांना मुक्त केले.

 

सारांश, आरोप करतांना जवळ भक्कम पुरावे असणे आवश्यक असते. त्यात जे व्यक्तिमत्व लाखो लोकांचे श्रद्धास्थान असते त्यांच्यावर आरोप करणे तर अधिकच गंभीर मानले जाते. अशा आरोपांमुळे लाखो लोकांच्या भावना दुखावून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.आज निलेश राणे यांनी बाळासाहेबांवर गंभीर आरोप करून मोठी चूक केली आहे. त्यांना जर उद्या शिक्षा झाली तर कोणतेही सरकार, अण्णा हजारेंना सोडले तसे, दोन दिवसांत मुक्त करणारनाही. न्यायालय देईल ती शिक्षा निलेश राणे यांना भोगावी लागेल.

वास्तविक गेलेल्या माणसांबद्दल वाईट बोलणे ही आपली संस्कृती नाही. मग निलेश राणे असे का पिसाटले? शिवसेनेचे विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर जहाल टीका केल्यामुळेच निलेश यांचा तोल गेला. पण विनायक राऊत म्हणजे उद्धव ठाकरे नव्हेत. निलेश यांना टीका करायचीच होती तर ती त्यांनी राऊत यांच्यावर करायला हवी होती. त्यांचे वाभाडे काढायला हवे होते. या जगात नसलेल्या बाळासाहेबांवर आरोप करून त्यांनी काय साधले? नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यावर बाळासाहेबांनी त्यांच्यावर वारंवार ठाकरी भाषेत जहरी टीका केली. पण नारायणरावांनी आपला संयम कधीच ढळू दिला नाही. बाळासाहेबांवरची श्रद्धा कधी हटू दिली नाही. अखेरपर्यंत त्यांनी बाळासाहेबांचा आदर केला. निलेश राणे यांना हे सारे ठाऊक आहे. आपले वडील नारायण राणे यांना बाळासाहेबांनी जमिनीवरून उचलून नगरसेवक पदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत अनेक मोठी पदे दिली, हेदेखील त्यांना ठाऊक आहे. मग बाळासाहेबांच्या बाबतीत अशी कृतघ्नता त्यांनी का दाखवावी? बाळासाहेब हे लाखो शिवसैनिकांप्रमाणे नारायणरावांचेदेखील दैवत आहे. आपल्या वडिलांच्या दैवतावर चिखलफेक करूननिलेश यांनी मोठा नैतिक गुन्हा केला आहे. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. जे झाले ते झाले. आता निलेश राणे यांनी मोठ्या मनाने दिलगिरी व्यक्त करून या प्रकरणावर पडदा टाकावा. त्यांनी तसे न केल्यास त्यांचे वडीलही त्यांना क्षमा करणार नाहीत. एमबीए असलेल्या तरुणाला आम्ही आणखी काय शहाणपण शिकविणार?”
 

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content