HomeArchiveया चिमण्यांनो परत...

या चिमण्यांनो परत फिरा रे..

Details
या चिमण्यांनो परत फिरा रे..

    31-Aug-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
शहरातील काँक्रीटच्या जंगलात हिरवळ निर्माण व्हावी, या उद्द्येशाने जपानच्या ‘अकीरा मियावाकी’, या तंत्राचा वापर करून हिरवळीची छोटी बेटं निर्माण करण्याचा उपक्रम मुंबईतल्या कांदिवली पूर्व मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राबविला आहे.
नवनवीन कल्पना अंमलात आणणारे आमदार भातखळकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा प्रकल्प कांदिवलीच्या लोखंडवाला संकुलात राबविण्यात आला आहे. शहीद अब्दुल हमीद यांचे नाव दिलेल्या या फॉरेस्ट गार्डनचे नुकतेच थाटात लोकार्पण झाले. या उद्यानामुळे कमी होत चाललेल्या चिमण्या, फुलपाखरं पुन्हा परततील, असा विश्वास भातखळकर यांनी व्यक्त केला.
 
 

 
 

 
 
 
केशवसृष्टी, ‘माय ग्रीन सोसायटी’ या उपक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या या जपानच्या ‘अकीरा मियावाकी’ या तंत्रामुळे कमी जागेत भरपूर हिरवळ निर्माण होते. अनेक ठिकाणी अशी सिटी फॉरेस्ट तयार केली जात आहेत. ‘एचडीएफसी लाइफ’ने या उपक्रमाला आर्थिक बळ दिले. या उद्यानाची जागा कित्येक वर्षे पडीक होती. आमदार भातखळकर यांच्या प्रयत्नांमुळेच या पडीक जागेची स्वच्छता तसेच तिला सुपिक बनविण्याचे प्रयत्न झाले. शहरात आरेसारखा प्रचंड मोठा हरीत पट्टा असलेले मुंबई हे जगातले एकमेव शहर. परंतु शहरीकरणाच्या रेट्याखाली ही हिरवळ आक्रसत चालली आहे. त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे अशाप्रकारे हिरवळ निर्माण करण्याचे उपक्रम हाती घेतले पाहिजेत, असे भातखळकर म्हणाले. मुंबईत आणखी काही ठिकाणी हा उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ‘एचडीएफसी लाइफ’चे उपाध्यक्ष सुब्रतो रॉय, ‘केशवसृष्टी’चे अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता, नगरसेविका सुरेखा पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
 
 

 
 

 
 
 
 ”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
शहरातील काँक्रीटच्या जंगलात हिरवळ निर्माण व्हावी, या उद्द्येशाने जपानच्या ‘अकीरा मियावाकी’, या तंत्राचा वापर करून हिरवळीची छोटी बेटं निर्माण करण्याचा उपक्रम मुंबईतल्या कांदिवली पूर्व मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राबविला आहे.
नवनवीन कल्पना अंमलात आणणारे आमदार भातखळकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा प्रकल्प कांदिवलीच्या लोखंडवाला संकुलात राबविण्यात आला आहे. शहीद अब्दुल हमीद यांचे नाव दिलेल्या या फॉरेस्ट गार्डनचे नुकतेच थाटात लोकार्पण झाले. या उद्यानामुळे कमी होत चाललेल्या चिमण्या, फुलपाखरं पुन्हा परततील, असा विश्वास भातखळकर यांनी व्यक्त केला.
 
 

 
 

 
 
 
केशवसृष्टी, ‘माय ग्रीन सोसायटी’ या उपक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या या जपानच्या ‘अकीरा मियावाकी’ या तंत्रामुळे कमी जागेत भरपूर हिरवळ निर्माण होते. अनेक ठिकाणी अशी सिटी फॉरेस्ट तयार केली जात आहेत. ‘एचडीएफसी लाइफ’ने या उपक्रमाला आर्थिक बळ दिले. या उद्यानाची जागा कित्येक वर्षे पडीक होती. आमदार भातखळकर यांच्या प्रयत्नांमुळेच या पडीक जागेची स्वच्छता तसेच तिला सुपिक बनविण्याचे प्रयत्न झाले. शहरात आरेसारखा प्रचंड मोठा हरीत पट्टा असलेले मुंबई हे जगातले एकमेव शहर. परंतु शहरीकरणाच्या रेट्याखाली ही हिरवळ आक्रसत चालली आहे. त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे अशाप्रकारे हिरवळ निर्माण करण्याचे उपक्रम हाती घेतले पाहिजेत, असे भातखळकर म्हणाले. मुंबईत आणखी काही ठिकाणी हा उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ‘एचडीएफसी लाइफ’चे उपाध्यक्ष सुब्रतो रॉय, ‘केशवसृष्टी’चे अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता, नगरसेविका सुरेखा पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
 
 

 
 

 
 
 
 ”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

“शहरातील काँक्रीटच्या जंगलात हिरवळ निर्माण व्हावी, या उद्द्येशाने जपानच्या ‘अकीरा मियावाकी’, या तंत्राचा वापर करून हिरवळीची छोटी बेटं निर्माण करण्याचा उपक्रम मुंबईतल्या कांदिवली पूर्व मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राबविला आहे.”

“नवनवीन कल्पना अंमलात आणणारे आमदार भातखळकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा प्रकल्प कांदिवलीच्या लोखंडवाला संकुलात राबविण्यात आला आहे. शहीद अब्दुल हमीद यांचे नाव दिलेल्या या फॉरेस्ट गार्डनचे नुकतेच थाटात लोकार्पण झाले. या उद्यानामुळे कमी होत चाललेल्या चिमण्या, फुलपाखरं पुन्हा परततील, असा विश्वास भातखळकर यांनी व्यक्त केला.”
 
 

 
 

 
 
 
“केशवसृष्टी, ‘माय ग्रीन सोसायटी’ या उपक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या या जपानच्या ‘अकीरा मियावाकी’ या तंत्रामुळे कमी जागेत भरपूर हिरवळ निर्माण होते. अनेक ठिकाणी अशी सिटी फॉरेस्ट तयार केली जात आहेत. ‘एचडीएफसी लाइफ’ने या उपक्रमाला आर्थिक बळ दिले. या उद्यानाची जागा कित्येक वर्षे पडीक होती. आमदार भातखळकर यांच्या प्रयत्नांमुळेच या पडीक जागेची स्वच्छता तसेच तिला सुपिक बनविण्याचे प्रयत्न झाले. शहरात आरेसारखा प्रचंड मोठा हरीत पट्टा असलेले मुंबई हे जगातले एकमेव शहर. परंतु शहरीकरणाच्या रेट्याखाली ही हिरवळ आक्रसत चालली आहे. त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे अशाप्रकारे हिरवळ निर्माण करण्याचे उपक्रम हाती घेतले पाहिजेत, असे भातखळकर म्हणाले. मुंबईत आणखी काही ठिकाणी हा उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ‘एचडीएफसी लाइफ’चे उपाध्यक्ष सुब्रतो रॉय, ‘केशवसृष्टी’चे अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता, नगरसेविका सुरेखा पाटील आदी यावेळी उपस्थित होते.”

 
 

 
 

 
 
 
 

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content