HomeArchiveया चिमण्यांनो परत...

या चिमण्यांनो परत फिरा रे..

Details
या चिमण्यांनो परत फिरा रे..

    31-Aug-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
शहरातील काँक्रीटच्या जंगलात हिरवळ निर्माण व्हावी, या उद्द्येशाने जपानच्या ‘अकीरा मियावाकी’, या तंत्राचा वापर करून हिरवळीची छोटी बेटं निर्माण करण्याचा उपक्रम मुंबईतल्या कांदिवली पूर्व मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राबविला आहे.
नवनवीन कल्पना अंमलात आणणारे आमदार भातखळकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा प्रकल्प कांदिवलीच्या लोखंडवाला संकुलात राबविण्यात आला आहे. शहीद अब्दुल हमीद यांचे नाव दिलेल्या या फॉरेस्ट गार्डनचे नुकतेच थाटात लोकार्पण झाले. या उद्यानामुळे कमी होत चाललेल्या चिमण्या, फुलपाखरं पुन्हा परततील, असा विश्वास भातखळकर यांनी व्यक्त केला.
 
 

 
 

 
 
 
केशवसृष्टी, ‘माय ग्रीन सोसायटी’ या उपक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या या जपानच्या ‘अकीरा मियावाकी’ या तंत्रामुळे कमी जागेत भरपूर हिरवळ निर्माण होते. अनेक ठिकाणी अशी सिटी फॉरेस्ट तयार केली जात आहेत. ‘एचडीएफसी लाइफ’ने या उपक्रमाला आर्थिक बळ दिले. या उद्यानाची जागा कित्येक वर्षे पडीक होती. आमदार भातखळकर यांच्या प्रयत्नांमुळेच या पडीक जागेची स्वच्छता तसेच तिला सुपिक बनविण्याचे प्रयत्न झाले. शहरात आरेसारखा प्रचंड मोठा हरीत पट्टा असलेले मुंबई हे जगातले एकमेव शहर. परंतु शहरीकरणाच्या रेट्याखाली ही हिरवळ आक्रसत चालली आहे. त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे अशाप्रकारे हिरवळ निर्माण करण्याचे उपक्रम हाती घेतले पाहिजेत, असे भातखळकर म्हणाले. मुंबईत आणखी काही ठिकाणी हा उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ‘एचडीएफसी लाइफ’चे उपाध्यक्ष सुब्रतो रॉय, ‘केशवसृष्टी’चे अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता, नगरसेविका सुरेखा पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
 
 

 
 

 
 
 
 ”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
शहरातील काँक्रीटच्या जंगलात हिरवळ निर्माण व्हावी, या उद्द्येशाने जपानच्या ‘अकीरा मियावाकी’, या तंत्राचा वापर करून हिरवळीची छोटी बेटं निर्माण करण्याचा उपक्रम मुंबईतल्या कांदिवली पूर्व मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राबविला आहे.
नवनवीन कल्पना अंमलात आणणारे आमदार भातखळकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा प्रकल्प कांदिवलीच्या लोखंडवाला संकुलात राबविण्यात आला आहे. शहीद अब्दुल हमीद यांचे नाव दिलेल्या या फॉरेस्ट गार्डनचे नुकतेच थाटात लोकार्पण झाले. या उद्यानामुळे कमी होत चाललेल्या चिमण्या, फुलपाखरं पुन्हा परततील, असा विश्वास भातखळकर यांनी व्यक्त केला.
 
 

 
 

 
 
 
केशवसृष्टी, ‘माय ग्रीन सोसायटी’ या उपक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या या जपानच्या ‘अकीरा मियावाकी’ या तंत्रामुळे कमी जागेत भरपूर हिरवळ निर्माण होते. अनेक ठिकाणी अशी सिटी फॉरेस्ट तयार केली जात आहेत. ‘एचडीएफसी लाइफ’ने या उपक्रमाला आर्थिक बळ दिले. या उद्यानाची जागा कित्येक वर्षे पडीक होती. आमदार भातखळकर यांच्या प्रयत्नांमुळेच या पडीक जागेची स्वच्छता तसेच तिला सुपिक बनविण्याचे प्रयत्न झाले. शहरात आरेसारखा प्रचंड मोठा हरीत पट्टा असलेले मुंबई हे जगातले एकमेव शहर. परंतु शहरीकरणाच्या रेट्याखाली ही हिरवळ आक्रसत चालली आहे. त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे अशाप्रकारे हिरवळ निर्माण करण्याचे उपक्रम हाती घेतले पाहिजेत, असे भातखळकर म्हणाले. मुंबईत आणखी काही ठिकाणी हा उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ‘एचडीएफसी लाइफ’चे उपाध्यक्ष सुब्रतो रॉय, ‘केशवसृष्टी’चे अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता, नगरसेविका सुरेखा पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
 
 

 
 

 
 
 
 ”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

“शहरातील काँक्रीटच्या जंगलात हिरवळ निर्माण व्हावी, या उद्द्येशाने जपानच्या ‘अकीरा मियावाकी’, या तंत्राचा वापर करून हिरवळीची छोटी बेटं निर्माण करण्याचा उपक्रम मुंबईतल्या कांदिवली पूर्व मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राबविला आहे.”

“नवनवीन कल्पना अंमलात आणणारे आमदार भातखळकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा प्रकल्प कांदिवलीच्या लोखंडवाला संकुलात राबविण्यात आला आहे. शहीद अब्दुल हमीद यांचे नाव दिलेल्या या फॉरेस्ट गार्डनचे नुकतेच थाटात लोकार्पण झाले. या उद्यानामुळे कमी होत चाललेल्या चिमण्या, फुलपाखरं पुन्हा परततील, असा विश्वास भातखळकर यांनी व्यक्त केला.”
 
 

 
 

 
 
 
“केशवसृष्टी, ‘माय ग्रीन सोसायटी’ या उपक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या या जपानच्या ‘अकीरा मियावाकी’ या तंत्रामुळे कमी जागेत भरपूर हिरवळ निर्माण होते. अनेक ठिकाणी अशी सिटी फॉरेस्ट तयार केली जात आहेत. ‘एचडीएफसी लाइफ’ने या उपक्रमाला आर्थिक बळ दिले. या उद्यानाची जागा कित्येक वर्षे पडीक होती. आमदार भातखळकर यांच्या प्रयत्नांमुळेच या पडीक जागेची स्वच्छता तसेच तिला सुपिक बनविण्याचे प्रयत्न झाले. शहरात आरेसारखा प्रचंड मोठा हरीत पट्टा असलेले मुंबई हे जगातले एकमेव शहर. परंतु शहरीकरणाच्या रेट्याखाली ही हिरवळ आक्रसत चालली आहे. त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे अशाप्रकारे हिरवळ निर्माण करण्याचे उपक्रम हाती घेतले पाहिजेत, असे भातखळकर म्हणाले. मुंबईत आणखी काही ठिकाणी हा उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ‘एचडीएफसी लाइफ’चे उपाध्यक्ष सुब्रतो रॉय, ‘केशवसृष्टी’चे अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता, नगरसेविका सुरेखा पाटील आदी यावेळी उपस्थित होते.”

 
 

 
 

 
 
 
 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content