HomeArchiveमेलबर्नच्या विजयाने आठवणी...

मेलबर्नच्या विजयाने आठवणी दाटल्या!

Details
मेलबर्नच्या विजयाने आठवणी दाटल्या!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]

ऑस्ट्रेलियाविरूद्धचा तिसरा कसोटी सामना भारताने 137 धावांनी जिंकून 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचा हा कसोटी कारकिर्दीतील 150वा विजय ठरला. मेलबर्नवरील या विजयामुळे 1981 सालच्या गोड आठवणी ताज्या झाल्या. भारत आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या त्या सामन्यात चौथ्या डावात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी केवळ 143 धावांचे आव्हान होते. ग्रेग चॅपल, किंम ह्युजेस यांच्यासारखे तगडे फलंदाज असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला ही धावसंख्या काहीच नव्हती. पण खेळपट्टी मात्र ऑस्ट्रेलियन संघाकडे पाहून खदखदा हसत होती. चौथ्या डावात ती आपली करामत दाखविणार होती. खेळपट्टीवरची माती गडद होती. खेळपट्टीवर अनेक ठिकाणी भेगा पडल्या होत्या. सारांश, खेळपट्टी खेळण्यालायक उरली नव्हती.

 

ऑस्ट्रेलियन संघाचे पहिले काही फलंदाज पटापट बाद करणे हेच भारताचे प्रथम लक्ष्य होते. जॉन डायसनला वेगवान करसन घावरीने यष्टीमागे झेल देण्यास भाग पाडून चांगला शुभारंभ केला. त्यानंतर ग्रेग चॅपल मैदानात उतरला. गावसकर घावरीला म्हणाला, ‘कडूभाई, त्याला बाऊंसर टाक.’ ग्रेगने गार्ड घेतला. घावरीने गावसकरच्या सूचनेनुसार जोरदार बाऊंसर टाकण्याचा प्रयत्न केला. पण तो चेंडू उसळलाच नाही. तो एका भेगेवर पडला. बाऊंसरची अपेक्षा करणारा चॅपल बॅकफूटवर गेला होता. तथापि, चेंडू खाली राहिला. तो क्षणार्धात चॅपलचा लेगस्टम्प उखडून शांत झाला. अशाप्रकारे चॅपल पहिल्याच चेंडूवर बाद होऊन तंबूत परतला. त्यानंतर तिसरा हादरा दिलीप दोशीने दिला. ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 बाद 18 अशी केविलवाणी झाली.

सामन्याच्या चौथ्या दिवशी दुखापतीमुळे कपिल देव मैदानावर उतरला नव्हता. पाचव्या दिवशी मात्र कपिल ताजातवाना होऊन गोलंदाजीसाठी आला. त्याने अप्रतिम गोलंदाजी करीत ऑस्ट्रेलियाची मधली फळी कापून काढली. भारताने त्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताचा ऑफस्पिनर शिवलाल यादव दुखापतीमुळे चौथ्या डावात गोलंदाजी टाकू शकला नाही. त्यामुळे भारताला एक गोलंदाज कमी पडला. पण त्याची उणीव दिलीप दोशीने भरून काढली. विशेष म्हणजे दोशीची डावी टाच दुखावलेली होती. तो खेळण्यास फिट नव्हता. पण आपली दुखापत लपवून ठेवत तो जिद्दीने खेळला. भारताचे दोन आधारस्तंभ सुनील गावसकर आणि गुंडप्पा विश्वनाथ यांनी नेमका आपला फॉर्म गमावला होता. पण, या सामन्यात त्यांना सूर गवसला. विश्वनाथचे पहिल्या डावातील शतक आणि गावसकरच्या दुसर्‍या डावातील महत्त्वपूर्ण 70 धावा भारतासाठी वरदान ठरल्या. दुसर्‍या डावात गावसकर आणि चेतन चौहान या सलामीच्या जोडीनेच ऑस्ट्रेलियन गोलंदाजी ठोकून काढली. चौहानने तडाखेबंद 85 धावा करीत ऑस्ट्रोलियन क्षेत्ररक्षकांना चौफेर पळविले. त्या सामन्याचे समालोचन करताना रिची बेनॉर्ड चॅनल 9 वर वारंवार सांगत होता की, ‘दिलीप दोशीने आपल्या पूर्ण क्षमतेने गोलंदाजी केली तर भारताचा विजय अशक्य नाही.’ दोशीने बेनॉर्डचा विश्वास खरा करुन दाखविला. बलाढ्य ऑस्ट्रोलियन संघाला भारताने धूळ चारली. कालच्या भारताच्या विजयामुळे या सर्व आठवणी दाटून आल्या. आपल्याही असतील…”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]

ऑस्ट्रेलियाविरूद्धचा तिसरा कसोटी सामना भारताने 137 धावांनी जिंकून 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचा हा कसोटी कारकिर्दीतील 150वा विजय ठरला. मेलबर्नवरील या विजयामुळे 1981 सालच्या गोड आठवणी ताज्या झाल्या. भारत आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या त्या सामन्यात चौथ्या डावात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी केवळ 143 धावांचे आव्हान होते. ग्रेग चॅपल, किंम ह्युजेस यांच्यासारखे तगडे फलंदाज असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला ही धावसंख्या काहीच नव्हती. पण खेळपट्टी मात्र ऑस्ट्रेलियन संघाकडे पाहून खदखदा हसत होती. चौथ्या डावात ती आपली करामत दाखविणार होती. खेळपट्टीवरची माती गडद होती. खेळपट्टीवर अनेक ठिकाणी भेगा पडल्या होत्या. सारांश, खेळपट्टी खेळण्यालायक उरली नव्हती.

 

ऑस्ट्रेलियन संघाचे पहिले काही फलंदाज पटापट बाद करणे हेच भारताचे प्रथम लक्ष्य होते. जॉन डायसनला वेगवान करसन घावरीने यष्टीमागे झेल देण्यास भाग पाडून चांगला शुभारंभ केला. त्यानंतर ग्रेग चॅपल मैदानात उतरला. गावसकर घावरीला म्हणाला, ‘कडूभाई, त्याला बाऊंसर टाक.’ ग्रेगने गार्ड घेतला. घावरीने गावसकरच्या सूचनेनुसार जोरदार बाऊंसर टाकण्याचा प्रयत्न केला. पण तो चेंडू उसळलाच नाही. तो एका भेगेवर पडला. बाऊंसरची अपेक्षा करणारा चॅपल बॅकफूटवर गेला होता. तथापि, चेंडू खाली राहिला. तो क्षणार्धात चॅपलचा लेगस्टम्प उखडून शांत झाला. अशाप्रकारे चॅपल पहिल्याच चेंडूवर बाद होऊन तंबूत परतला. त्यानंतर तिसरा हादरा दिलीप दोशीने दिला. ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 बाद 18 अशी केविलवाणी झाली.

सामन्याच्या चौथ्या दिवशी दुखापतीमुळे कपिल देव मैदानावर उतरला नव्हता. पाचव्या दिवशी मात्र कपिल ताजातवाना होऊन गोलंदाजीसाठी आला. त्याने अप्रतिम गोलंदाजी करीत ऑस्ट्रेलियाची मधली फळी कापून काढली. भारताने त्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताचा ऑफस्पिनर शिवलाल यादव दुखापतीमुळे चौथ्या डावात गोलंदाजी टाकू शकला नाही. त्यामुळे भारताला एक गोलंदाज कमी पडला. पण त्याची उणीव दिलीप दोशीने भरून काढली. विशेष म्हणजे दोशीची डावी टाच दुखावलेली होती. तो खेळण्यास फिट नव्हता. पण आपली दुखापत लपवून ठेवत तो जिद्दीने खेळला. भारताचे दोन आधारस्तंभ सुनील गावसकर आणि गुंडप्पा विश्वनाथ यांनी नेमका आपला फॉर्म गमावला होता. पण, या सामन्यात त्यांना सूर गवसला. विश्वनाथचे पहिल्या डावातील शतक आणि गावसकरच्या दुसर्‍या डावातील महत्त्वपूर्ण 70 धावा भारतासाठी वरदान ठरल्या. दुसर्‍या डावात गावसकर आणि चेतन चौहान या सलामीच्या जोडीनेच ऑस्ट्रेलियन गोलंदाजी ठोकून काढली. चौहानने तडाखेबंद 85 धावा करीत ऑस्ट्रोलियन क्षेत्ररक्षकांना चौफेर पळविले. त्या सामन्याचे समालोचन करताना रिची बेनॉर्ड चॅनल 9 वर वारंवार सांगत होता की, ‘दिलीप दोशीने आपल्या पूर्ण क्षमतेने गोलंदाजी केली तर भारताचा विजय अशक्य नाही.’ दोशीने बेनॉर्डचा विश्वास खरा करुन दाखविला. बलाढ्य ऑस्ट्रोलियन संघाला भारताने धूळ चारली. कालच्या भारताच्या विजयामुळे या सर्व आठवणी दाटून आल्या. आपल्याही असतील…”
 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content