HomeArchiveमहाराष्ट्रातील पाण्यासाठी कीर्तिकरांनी...

महाराष्ट्रातील पाण्यासाठी कीर्तिकरांनी उठविला दिल्लीत आवाज

Details
महाराष्ट्रातील पाण्यासाठी कीर्तिकरांनी उठविला दिल्लीत आवाज

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्यातील कृषी सिंचन व पिण्याच्या पाण्याशी संबंधित प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास पाणी प्रश्न सुटू शकतो असा मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित करत खासदार गजानन कीर्तिकर यांनी केंद्रीय वने व पर्यावरण खात्याकडून संबंधित प्रकल्पांना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याची मागणी केली.

महाराष्ट्रातील पाणी प्रश्नाचे गांभीर्य नमूद करताना कीर्तिकर यांनी सिंचन प्रकल्पांसाठी मंजूर निधी व अडचणी नमूद केल्या. त्यामध्ये २०१५ ते २०१७ मध्ये राज्यातील २१ सिंचन प्रकल्पांसाठी रू. ६,४९६ कोटी मंजूर झाले. परंतु वने व पर्यावरण खात्याच्या मंजुरीविना उपरोक्त प्रकल्प मार्गी लागण्यास अडथळा येत असल्याचे संगितले. राज्यशासनाने ६ विविध प्रकल्पांसाठी मंजूर केलेला रू. १३३२ कोटींचा निधीदेखील पर्यावरण खात्याच्या मंजुरीविना वापरात आणता येत नसल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित प्रकल्पांना केंद्र शासनाकडून हिरवा कंदील मिळाल्यास महाराष्ट्रातील बहुतांश पाणीप्रश्न मार्गी लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्यातील कृषी सिंचन व पिण्याच्या पाण्याशी संबंधित प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास पाणी प्रश्न सुटू शकतो असा मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित करत खासदार गजानन कीर्तिकर यांनी केंद्रीय वने व पर्यावरण खात्याकडून संबंधित प्रकल्पांना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याची मागणी केली.

महाराष्ट्रातील पाणी प्रश्नाचे गांभीर्य नमूद करताना कीर्तिकर यांनी सिंचन प्रकल्पांसाठी मंजूर निधी व अडचणी नमूद केल्या. त्यामध्ये २०१५ ते २०१७ मध्ये राज्यातील २१ सिंचन प्रकल्पांसाठी रू. ६,४९६ कोटी मंजूर झाले. परंतु वने व पर्यावरण खात्याच्या मंजुरीविना उपरोक्त प्रकल्प मार्गी लागण्यास अडथळा येत असल्याचे संगितले. राज्यशासनाने ६ विविध प्रकल्पांसाठी मंजूर केलेला रू. १३३२ कोटींचा निधीदेखील पर्यावरण खात्याच्या मंजुरीविना वापरात आणता येत नसल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित प्रकल्पांना केंद्र शासनाकडून हिरवा कंदील मिळाल्यास महाराष्ट्रातील बहुतांश पाणीप्रश्न मार्गी लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.”

Continue reading

मुंबईच्या शहरी भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत

मुंबई महापालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर १५०० मिलीमीटर व्यासाचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जात आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार...

इराणकडून बाब-अल-मंदबची केली जाणार कोंडी?

अमेरिकेबरोबर कोणत्याही स्वरूपाची चर्चा करण्याची पाकिस्तानमार्फत करण्यात आलेली विनंती धुडकावून लावल्यानंतरही सध्याच्या युद्धविरामाला इराणबरोबरच्या पुढच्या चर्चेपर्यंत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात येत असल्याची घोषणा आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ तसेच लष्करप्रमुख आसीफ मुनीर यांच्या आवाहनाला...

इराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची चर्चा!

अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम उद्या संपत असतानाच अमेरिकेबरोबर पाकिस्तानात होऊ घातलेल्या चर्चेला इराणने नकार दिला आहे. आम्ही सरशीत असताना आमच्या अटीशर्तींवरच अमेरिकेबरोबर चर्चा होईल, असे इराणच्या लष्करी गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या होर्मूझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण...
Skip to content