HomeArchiveदारूच्या दुकानांमुळेच आले...

दारूच्या दुकानांमुळेच आले सर्वांवर गंडांतर!

Details

सोमवारी तिसऱ्या लॉकडाऊनला सुरूवात होण्याआधीच राज्य सरकारने रेड झोनमधील फक्त कंटेन्मेंट परिसर वगळता सर्वत्र दारूची दुकाने सुरू करण्यास आनुमती दिली. त्यामुळे दारूपासून गेले दीड महिना लांब राहिलेल्या मुंबईकरांनी दारूची दुकाने सुरू होण्याआधीच सामाजिक अंतर पाळत रांगा लावल्या. काही ठिकाणी असे शिस्तीचे वातावरण असले तरी अनेक ठिकाणी ग्राहकांनी झुंबड केली आणि सामाजिक अंतर राखण्याच्या मूळ उद्दीष्टालाच हरताळ फासला गेला. परिणामी मुंबईच्या महापालिका आयुक्तांनी मंगळवारी रात्री मुंबईतील किराणा मालाची आणि बाजीपाल्याची दुकाने वगळता दारूच्या दुकानांसह इतर वस्तूंच्या दुकानांनाही बंदी केली. दारूसाठी शिस्तीत रांग लावलेल्या ग्राहकांचे मुंबईच्या सायन येथील हे दृष्य टिपले आहे ए. श्रीनिवास यांनी.
 
 
 
 

 
छायाचित्रे : ए. श्रीनिवास

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content