HomeArchiveउशीर झाला.. बाद!

उशीर झाला.. बाद!

Details
उशीर झाला.. बाद!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

वैभव मोहन पाटील
[email protected]
रविवारी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये उमेदवारांना काही मिनिटे उशीर झाल्याने परीक्षेला बसू न देण्याचा घडलेला प्रकार बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. राज्यातील लाखो बेरोजगार पदवीधरांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एमपीएससी परीक्षेचा मोठा आधार असतो. त्यामुळेच काही मोजक्या जागांसाठी लाखो बेरोजगार अर्ज करतात. या बेरोजगारांकडून एमपीएससीकडून तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत परीक्षा फी म्हणून दर परीक्षेला उकळली जाते. परीक्षेची वेळ दहाची असताना त्यांना साडेआठ वाजताच परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात येतात.

 

सुरक्षा व तपासणीच्या कारणास्तव लवकर बोलावण्याचे प्रयोजन असल्याचे सांगण्यात येत असले तरी ह्या बेरोजगार तरुणांची काटेकोर तपासणी करायला ते काही गुन्हेगार नक्कीच नाहीत. त्यात दुरून येणाऱ्या, वाहतूककोंडी व इतर कारणांमुळे काही मिनिटे उशीर झालेल्या उमेदवारांना प्रवेश नाकारला जात असेल तर ती बेरोजगारांच्या दुर्दैवात भर आहे असेच म्हणावे लागेल. दहा वाजताची परीक्षा असताना साडेनऊच्या ठोक्याला परीक्षा केंद्रात उमेदवारांचा प्रवेश बंद करण्यात येतो. आधीच बैठक क्रमांकाच्या घोळावरून या परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या असतानाच परीक्षा देण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या बेरोजगार उमेदवारांना दोन तीन मिनिटे उशीर झाल्याने परीक्षेलाच बसू दिले जात नसेल तर सरकारने यात हस्तक्षेप करून धोरण बदलण्याची गरज आहे जेणेकरून सर्व उमेदवारांना स्पर्धा परीक्षांत सहभाग घेण्याची संधी मिळून न्याय मिळेल.”
 
“वैभव मोहन पाटील
[email protected]
रविवारी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये उमेदवारांना काही मिनिटे उशीर झाल्याने परीक्षेला बसू न देण्याचा घडलेला प्रकार बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. राज्यातील लाखो बेरोजगार पदवीधरांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एमपीएससी परीक्षेचा मोठा आधार असतो. त्यामुळेच काही मोजक्या जागांसाठी लाखो बेरोजगार अर्ज करतात. या बेरोजगारांकडून एमपीएससीकडून तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत परीक्षा फी म्हणून दर परीक्षेला उकळली जाते. परीक्षेची वेळ दहाची असताना त्यांना साडेआठ वाजताच परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात येतात.

 

सुरक्षा व तपासणीच्या कारणास्तव लवकर बोलावण्याचे प्रयोजन असल्याचे सांगण्यात येत असले तरी ह्या बेरोजगार तरुणांची काटेकोर तपासणी करायला ते काही गुन्हेगार नक्कीच नाहीत. त्यात दुरून येणाऱ्या, वाहतूककोंडी व इतर कारणांमुळे काही मिनिटे उशीर झालेल्या उमेदवारांना प्रवेश नाकारला जात असेल तर ती बेरोजगारांच्या दुर्दैवात भर आहे असेच म्हणावे लागेल. दहा वाजताची परीक्षा असताना साडेनऊच्या ठोक्याला परीक्षा केंद्रात उमेदवारांचा प्रवेश बंद करण्यात येतो. आधीच बैठक क्रमांकाच्या घोळावरून या परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या असतानाच परीक्षा देण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या बेरोजगार उमेदवारांना दोन तीन मिनिटे उशीर झाल्याने परीक्षेलाच बसू दिले जात नसेल तर सरकारने यात हस्तक्षेप करून धोरण बदलण्याची गरज आहे जेणेकरून सर्व उमेदवारांना स्पर्धा परीक्षांत सहभाग घेण्याची संधी मिळून न्याय मिळेल.”
 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content