HomeArchiveउशीर झाला.. बाद!

उशीर झाला.. बाद!

Details
उशीर झाला.. बाद!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

वैभव मोहन पाटील
[email protected]
रविवारी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये उमेदवारांना काही मिनिटे उशीर झाल्याने परीक्षेला बसू न देण्याचा घडलेला प्रकार बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. राज्यातील लाखो बेरोजगार पदवीधरांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एमपीएससी परीक्षेचा मोठा आधार असतो. त्यामुळेच काही मोजक्या जागांसाठी लाखो बेरोजगार अर्ज करतात. या बेरोजगारांकडून एमपीएससीकडून तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत परीक्षा फी म्हणून दर परीक्षेला उकळली जाते. परीक्षेची वेळ दहाची असताना त्यांना साडेआठ वाजताच परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात येतात.

 

सुरक्षा व तपासणीच्या कारणास्तव लवकर बोलावण्याचे प्रयोजन असल्याचे सांगण्यात येत असले तरी ह्या बेरोजगार तरुणांची काटेकोर तपासणी करायला ते काही गुन्हेगार नक्कीच नाहीत. त्यात दुरून येणाऱ्या, वाहतूककोंडी व इतर कारणांमुळे काही मिनिटे उशीर झालेल्या उमेदवारांना प्रवेश नाकारला जात असेल तर ती बेरोजगारांच्या दुर्दैवात भर आहे असेच म्हणावे लागेल. दहा वाजताची परीक्षा असताना साडेनऊच्या ठोक्याला परीक्षा केंद्रात उमेदवारांचा प्रवेश बंद करण्यात येतो. आधीच बैठक क्रमांकाच्या घोळावरून या परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या असतानाच परीक्षा देण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या बेरोजगार उमेदवारांना दोन तीन मिनिटे उशीर झाल्याने परीक्षेलाच बसू दिले जात नसेल तर सरकारने यात हस्तक्षेप करून धोरण बदलण्याची गरज आहे जेणेकरून सर्व उमेदवारांना स्पर्धा परीक्षांत सहभाग घेण्याची संधी मिळून न्याय मिळेल.”
 
“वैभव मोहन पाटील
[email protected]
रविवारी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये उमेदवारांना काही मिनिटे उशीर झाल्याने परीक्षेला बसू न देण्याचा घडलेला प्रकार बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. राज्यातील लाखो बेरोजगार पदवीधरांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एमपीएससी परीक्षेचा मोठा आधार असतो. त्यामुळेच काही मोजक्या जागांसाठी लाखो बेरोजगार अर्ज करतात. या बेरोजगारांकडून एमपीएससीकडून तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत परीक्षा फी म्हणून दर परीक्षेला उकळली जाते. परीक्षेची वेळ दहाची असताना त्यांना साडेआठ वाजताच परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात येतात.

 

सुरक्षा व तपासणीच्या कारणास्तव लवकर बोलावण्याचे प्रयोजन असल्याचे सांगण्यात येत असले तरी ह्या बेरोजगार तरुणांची काटेकोर तपासणी करायला ते काही गुन्हेगार नक्कीच नाहीत. त्यात दुरून येणाऱ्या, वाहतूककोंडी व इतर कारणांमुळे काही मिनिटे उशीर झालेल्या उमेदवारांना प्रवेश नाकारला जात असेल तर ती बेरोजगारांच्या दुर्दैवात भर आहे असेच म्हणावे लागेल. दहा वाजताची परीक्षा असताना साडेनऊच्या ठोक्याला परीक्षा केंद्रात उमेदवारांचा प्रवेश बंद करण्यात येतो. आधीच बैठक क्रमांकाच्या घोळावरून या परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या असतानाच परीक्षा देण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या बेरोजगार उमेदवारांना दोन तीन मिनिटे उशीर झाल्याने परीक्षेलाच बसू दिले जात नसेल तर सरकारने यात हस्तक्षेप करून धोरण बदलण्याची गरज आहे जेणेकरून सर्व उमेदवारांना स्पर्धा परीक्षांत सहभाग घेण्याची संधी मिळून न्याय मिळेल.”
 

Continue reading

इराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची चर्चा!

अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम उद्या संपत असतानाच अमेरिकेबरोबर पाकिस्तानात होऊ घातलेल्या चर्चेला इराणने नकार दिला आहे. आम्ही सरशीत असताना आमच्या अटीशर्तींवरच अमेरिकेबरोबर चर्चा होईल, असे इराणच्या लष्करी गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या होर्मूझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण...

लग्नासाठी भाड्याने मिळणार कोल्हापूरची चित्रनगरी व नितीन देसाईंचा स्टडिओ?

चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रिकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूरची चित्रनगरी तसेच कर्जतमधला एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे सांस्कृतिक...

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख...
Skip to content