HomeArchiveउशीर झाला.. बाद!

उशीर झाला.. बाद!

Details
उशीर झाला.. बाद!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

वैभव मोहन पाटील
[email protected]
रविवारी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये उमेदवारांना काही मिनिटे उशीर झाल्याने परीक्षेला बसू न देण्याचा घडलेला प्रकार बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. राज्यातील लाखो बेरोजगार पदवीधरांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एमपीएससी परीक्षेचा मोठा आधार असतो. त्यामुळेच काही मोजक्या जागांसाठी लाखो बेरोजगार अर्ज करतात. या बेरोजगारांकडून एमपीएससीकडून तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत परीक्षा फी म्हणून दर परीक्षेला उकळली जाते. परीक्षेची वेळ दहाची असताना त्यांना साडेआठ वाजताच परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात येतात.

 

सुरक्षा व तपासणीच्या कारणास्तव लवकर बोलावण्याचे प्रयोजन असल्याचे सांगण्यात येत असले तरी ह्या बेरोजगार तरुणांची काटेकोर तपासणी करायला ते काही गुन्हेगार नक्कीच नाहीत. त्यात दुरून येणाऱ्या, वाहतूककोंडी व इतर कारणांमुळे काही मिनिटे उशीर झालेल्या उमेदवारांना प्रवेश नाकारला जात असेल तर ती बेरोजगारांच्या दुर्दैवात भर आहे असेच म्हणावे लागेल. दहा वाजताची परीक्षा असताना साडेनऊच्या ठोक्याला परीक्षा केंद्रात उमेदवारांचा प्रवेश बंद करण्यात येतो. आधीच बैठक क्रमांकाच्या घोळावरून या परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या असतानाच परीक्षा देण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या बेरोजगार उमेदवारांना दोन तीन मिनिटे उशीर झाल्याने परीक्षेलाच बसू दिले जात नसेल तर सरकारने यात हस्तक्षेप करून धोरण बदलण्याची गरज आहे जेणेकरून सर्व उमेदवारांना स्पर्धा परीक्षांत सहभाग घेण्याची संधी मिळून न्याय मिळेल.”
 
“वैभव मोहन पाटील
[email protected]
रविवारी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये उमेदवारांना काही मिनिटे उशीर झाल्याने परीक्षेला बसू न देण्याचा घडलेला प्रकार बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. राज्यातील लाखो बेरोजगार पदवीधरांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एमपीएससी परीक्षेचा मोठा आधार असतो. त्यामुळेच काही मोजक्या जागांसाठी लाखो बेरोजगार अर्ज करतात. या बेरोजगारांकडून एमपीएससीकडून तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत परीक्षा फी म्हणून दर परीक्षेला उकळली जाते. परीक्षेची वेळ दहाची असताना त्यांना साडेआठ वाजताच परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात येतात.

 

सुरक्षा व तपासणीच्या कारणास्तव लवकर बोलावण्याचे प्रयोजन असल्याचे सांगण्यात येत असले तरी ह्या बेरोजगार तरुणांची काटेकोर तपासणी करायला ते काही गुन्हेगार नक्कीच नाहीत. त्यात दुरून येणाऱ्या, वाहतूककोंडी व इतर कारणांमुळे काही मिनिटे उशीर झालेल्या उमेदवारांना प्रवेश नाकारला जात असेल तर ती बेरोजगारांच्या दुर्दैवात भर आहे असेच म्हणावे लागेल. दहा वाजताची परीक्षा असताना साडेनऊच्या ठोक्याला परीक्षा केंद्रात उमेदवारांचा प्रवेश बंद करण्यात येतो. आधीच बैठक क्रमांकाच्या घोळावरून या परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या असतानाच परीक्षा देण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या बेरोजगार उमेदवारांना दोन तीन मिनिटे उशीर झाल्याने परीक्षेलाच बसू दिले जात नसेल तर सरकारने यात हस्तक्षेप करून धोरण बदलण्याची गरज आहे जेणेकरून सर्व उमेदवारांना स्पर्धा परीक्षांत सहभाग घेण्याची संधी मिळून न्याय मिळेल.”
 

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content