HomeArchiveअटल स्मृती उद्यान...

अटल स्मृती उद्यान तरूण पिढीसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Details
अटल स्मृती उद्यान तरूण पिढीसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशात नवभारताची संकल्पना रूजविली. आज दिसणाऱ्या विकासाचा पाया अटलजींनी रचला आहे. त्यांचे विचार, त्यांचे व्यक्तिमत्त्व तरूण पिढीला प्रेरणा देण्यासाठी अटल स्मृती उद्यान उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी व्यक्त केला.

 
बोरिवली येथे उभारण्यात आलेल्या अटल स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री योगेश सागर, राज्यमंत्री अविनाश महातेकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार भाई गिरकर, प्रवीण दरेकर, मनीषा चौधरी आदी उपस्थित होते.
 
अटल स्मृती उद्यान हे श्रद्धेय अटलजींची सर्वोत्तम स्मृती आहे. या उद्यानांतून ते आपल्यात आहेत असाच भास होतो. अटलजींचे व्यक्तिमत्त्व हे निस्पृह, कणखर आणि अतुलनीय कटिबंधता असणारे आहे. अटलजींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सर्वाधिक विकास दर होता. त्यांनी सुरू केलेला विकासाचा सपाटा आजही सुरू आहे, असे ते म्हणाले.
 
अटल स्मृती उद्यानाजवळ होणाऱ्या मेट्रो स्थानकास या उद्यानाचे नाव द्यावे, अशी मागणी तावडे यांनी केली आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून या स्थानकास अटल स्मृती उद्यान मेट्रो स्थानक असे नाव देण्यासंबंधी मेट्रो कार्पोरेशनला कळविण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
अटल बिहारी वाजपेयी हे आदरणीय व्यक्तिमत्व होते. अशा व्यक्तिमत्वाकडे आदर्श म्हणून पाहिले जाते. त्यांचे प्रत्येक भाषण, विचार हे पुढील पिढीसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचे काम या उद्यानाच्या माध्यमातून होणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशात नवभारताची संकल्पना रूजविली. आज दिसणाऱ्या विकासाचा पाया अटलजींनी रचला आहे. त्यांचे विचार, त्यांचे व्यक्तिमत्त्व तरूण पिढीला प्रेरणा देण्यासाठी अटल स्मृती उद्यान उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी व्यक्त केला.

 
बोरिवली येथे उभारण्यात आलेल्या अटल स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री योगेश सागर, राज्यमंत्री अविनाश महातेकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार भाई गिरकर, प्रवीण दरेकर, मनीषा चौधरी आदी उपस्थित होते.
 
अटल स्मृती उद्यान हे श्रद्धेय अटलजींची सर्वोत्तम स्मृती आहे. या उद्यानांतून ते आपल्यात आहेत असाच भास होतो. अटलजींचे व्यक्तिमत्त्व हे निस्पृह, कणखर आणि अतुलनीय कटिबंधता असणारे आहे. अटलजींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सर्वाधिक विकास दर होता. त्यांनी सुरू केलेला विकासाचा सपाटा आजही सुरू आहे, असे ते म्हणाले.
 
अटल स्मृती उद्यानाजवळ होणाऱ्या मेट्रो स्थानकास या उद्यानाचे नाव द्यावे, अशी मागणी तावडे यांनी केली आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून या स्थानकास अटल स्मृती उद्यान मेट्रो स्थानक असे नाव देण्यासंबंधी मेट्रो कार्पोरेशनला कळविण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
अटल बिहारी वाजपेयी हे आदरणीय व्यक्तिमत्व होते. अशा व्यक्तिमत्वाकडे आदर्श म्हणून पाहिले जाते. त्यांचे प्रत्येक भाषण, विचार हे पुढील पिढीसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचे काम या उद्यानाच्या माध्यमातून होणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
 ”
 
 
 
 

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content