Homeटॉप स्टोरीराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार...

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा लांबणीवर?

येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपापल्या कार्यक्षेत्रातल्या युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींनाच मंत्रिपद देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नव्याने लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहे.

भाजपा नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत, येणाऱ्या विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत आपापल्या मतदारसंघातील उमेदवाराला निवडून आणू शकणाऱ्या आमदारालाच मंत्रीपदाचे बळ द्यावे, असे निश्चित करण्यात आले. या निकषामुळे भाजपा तसेच शिवसेनेच्या सध्याच्या काही मंत्र्यांना नारळ मिळण्याची दाट शक्यता आहे. भाजपाच्या मंत्र्यांना नारळ मिळाला तरी हायकमांडसमोर त्यांचे काही चालत नाही. मात्र शिवसेनेचे तसे नाही. उद्धव ठाकरेंना बाजूला करून पक्ष शिंदे यांच्या दावणीला बांधण्याच्या प्रक्रियेत शिंदेंसोबत असलेले जे काही मंत्री सध्या मंत्रिमंडळात आहेत, त्यांना बाजूला सारल्यास पक्षात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंकडून हा कथित प्रस्तावित विस्तार लांबणीवर टाकला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार हे मंत्री या निकषात बसत नाहीत. किंबहुना त्यांच्यामुळे मंत्रिमंडळाची छबीही खराब होत आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडून ग्रामीण, शहरी भागातील पाणीपुरवठ्याची कामे अपेक्षेनुसार झाली नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात सरकारविषयी नाराजी आहे. तानाजी सावंत यांनी आरोग्य खात्यात कोणतीही महत्त्वाची कामगिरी बजावली नाही. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात स्वत:चे ‘खासगी सचिव’ही नेमले आहेत. संजय राठोडविरोधात भाजपा समर्थक औषधे विक्रेत्यांच्या तक्रारी आहेत. एका युवतीच्या आत्महत्त्या प्रकरणानेही त्यांची प्रतीमा वादात राहिली आहे. अब्दुल सत्तार यांच्या बेताल वक्तव्यांमुळे सरकार नेहमीच अडचणीत आले आहे. केंद्राच्या कृषि योजनांचा लाभ खालपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यातही ते अपयशी ठरले आहेत. संदीपान भुमरे यांची कामगिरीही बऱ्यापैकी प्रभावहीन राहिली आहे. त्यामुळे हे पाच मंत्री भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या रडारवर आहेत. मात्र, शिवसेनेतल्या उठावात याच पाच मंत्र्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना खंबीरपणे साथ दिल्याने शिंदेंच्या समोर अडचण निर्माण झाली आहे. यावर तोडगा कसा काढायचा आणि त्यानंतर विस्तार कसा करायचा, हा प्रश्न त्यांना भेडसावत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content