Homeटॉप स्टोरीराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार...

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा लांबणीवर?

येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपापल्या कार्यक्षेत्रातल्या युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींनाच मंत्रिपद देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नव्याने लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहे.

भाजपा नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत, येणाऱ्या विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत आपापल्या मतदारसंघातील उमेदवाराला निवडून आणू शकणाऱ्या आमदारालाच मंत्रीपदाचे बळ द्यावे, असे निश्चित करण्यात आले. या निकषामुळे भाजपा तसेच शिवसेनेच्या सध्याच्या काही मंत्र्यांना नारळ मिळण्याची दाट शक्यता आहे. भाजपाच्या मंत्र्यांना नारळ मिळाला तरी हायकमांडसमोर त्यांचे काही चालत नाही. मात्र शिवसेनेचे तसे नाही. उद्धव ठाकरेंना बाजूला करून पक्ष शिंदे यांच्या दावणीला बांधण्याच्या प्रक्रियेत शिंदेंसोबत असलेले जे काही मंत्री सध्या मंत्रिमंडळात आहेत, त्यांना बाजूला सारल्यास पक्षात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंकडून हा कथित प्रस्तावित विस्तार लांबणीवर टाकला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार हे मंत्री या निकषात बसत नाहीत. किंबहुना त्यांच्यामुळे मंत्रिमंडळाची छबीही खराब होत आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडून ग्रामीण, शहरी भागातील पाणीपुरवठ्याची कामे अपेक्षेनुसार झाली नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात सरकारविषयी नाराजी आहे. तानाजी सावंत यांनी आरोग्य खात्यात कोणतीही महत्त्वाची कामगिरी बजावली नाही. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात स्वत:चे ‘खासगी सचिव’ही नेमले आहेत. संजय राठोडविरोधात भाजपा समर्थक औषधे विक्रेत्यांच्या तक्रारी आहेत. एका युवतीच्या आत्महत्त्या प्रकरणानेही त्यांची प्रतीमा वादात राहिली आहे. अब्दुल सत्तार यांच्या बेताल वक्तव्यांमुळे सरकार नेहमीच अडचणीत आले आहे. केंद्राच्या कृषि योजनांचा लाभ खालपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यातही ते अपयशी ठरले आहेत. संदीपान भुमरे यांची कामगिरीही बऱ्यापैकी प्रभावहीन राहिली आहे. त्यामुळे हे पाच मंत्री भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या रडारवर आहेत. मात्र, शिवसेनेतल्या उठावात याच पाच मंत्र्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना खंबीरपणे साथ दिल्याने शिंदेंच्या समोर अडचण निर्माण झाली आहे. यावर तोडगा कसा काढायचा आणि त्यानंतर विस्तार कसा करायचा, हा प्रश्न त्यांना भेडसावत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content