Homeटॉप स्टोरीमहापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीही...

महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीही स्वबळावर?

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढतानाच मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी काँग्रेसने चालवली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही त्याच भूमिकेवर शिक्कामोर्तब झाल्याचे कळते.

या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या बैठकीत लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकजुटीने लढण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले. मात्र, मुंबईसह विविध महापालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची भूमिका काय असणार, याविषयी त्यांनी मौन पाळले.

याच बैठकीत पुढच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांवर विभागवार जबाबदारी सोपविण्यात आली. गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते, त्या जागांवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश शरद पवारांनी दिले. राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्यावर विभागवार जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानुसार, जितेंद्र आव्हाडांवर ठाणे-पालघरची, धनंजय मुंडेंवर नाशिक, नगरसह मराठवाड्याची, अनिल तटकरे आणि शेखर निकमांवर कोकणाची, तर अनिल देशमुखांवर विदर्भातल्या नागपूर विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राजेंद्र शिंगणेंवर विदर्भातल्या अमरावती विभागाची, शशिकांत शिंदेंवर सांगली, सातारा आणि कोल्हापूरची जबाबदारी, तर सुनील शेळकेंवर पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपावण्यात आली असल्याचे कळते.

राष्ट्रवादीच्या पक्षसंघटनेत तीन वर्षांपेक्षा अधिक काळ जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष पदावर असणाऱ्यांना बदलण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रवादीकडून विभागवार शिबिरे घेण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीच्या शिबिरांमध्ये राज्यातील प्रश्नांवरदेखील चर्चा करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी, म्हणजेच येत्या १० जूनला राष्ट्रवादीकडून अहमदनगर जिल्ह्यात भव्य सभेचे  आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचा वर्धापनदिन आणि छत्रपती राज्याभिषेक दिवस एकत्र साजरा करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content