Homeटॉप स्टोरीअजितदादांच्या निर्णयांवर फडणवीसांची...

अजितदादांच्या निर्णयांवर फडणवीसांची नजर?

राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये वाढत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी आता त्यांच्या सहकारी पक्षांनी पावले टाकली असून पवार यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या निर्मयांवर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नजर राहणार असल्याचे कळते.

अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाबरोबरच वित्त खाते सोपविण्यात आल्यानंतर सत्ताधारी भारतीय जनमता पार्टी तसेच शिवसेनेच्या गोटातल्या आमदारांना पुरेसा निधी मिळेल की नाही याबद्द साशंकता निर्माण झाली होती. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पुण्याचे पालक मंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निधी अडविला गेल्याचीही रंगली होती. त्यानंतर त्यांनी पक्षाचे नेत फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही तक्रार केल्याचे बोलले जात होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशा तक्रारींवर आता तोडगा काढण्यात ला आहे. वित्तमंत्री तथा उपमुक्यमंत्री अजित पवार घेत असलेले निर्णय प्रथम उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाहणीसाठी जातील. त्यांनी मान्यता दिल्यानंतर अंतीम मान्यकरीता ते मुख्यमंत्र्यांकडे जातील. त्यामुळे पवार यांना सत्तेत राहताना आपल्या मित्रपक्षांचे पंख झाटण्यावर मर्यादा पडतील, असे बोलले जाते.

Continue reading

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १०...

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....
Skip to content