Homeमाय व्हॉईससंजय राठोडना लावलेला...

संजय राठोडना लावलेला कायदा आदित्य ठाकरेंना का नाही?

एका युवतीच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात आपल्या मंत्रिमंडळातले सहकारी संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून काढून टाकणारे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तोच न्याय आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत का लावला नाही, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज केला. दिशा सालीयन हिच्या हत्त्येत आदित्य ठाकरे यांचा हात आहे, असा आरोप आहे. मग राठोड यांना लावलेला नियम, त्यांना लावलेला कायदा आदित्य ठाकरेंच्या बाबतीत का लावला गेला नाही, असे ते म्हणाले.

समान नागरी कायद्याबाबत उद्धव ठाकरे यांनी अजूनही ठोस भूमिका घेतलेली नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समान नागरी कायद्याचा नेहमी पुरस्कार केला होता. उद्धव ठाकरेंमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी समान नागरी कायद्याला बिनशर्त पाठिंबा जाहीर करावा, असे ते म्हणाले.

आदित्य

शिवसेना भवन हे हिंदुत्वाचे केंद्र मानले जाते. काल तिथे मुस्लिम बोर्डाचे मौलाना उद्धव ठाकरेंना भेटायला गेले. मग आता बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचारांवर चालणारी उद्धव ठाकरे यांची सेना तेथे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करणार का नाही? तसे जमत नसेल तर त्यांनी सेनाभवनावर लावलेला बाळासाहेबांचा फोटो काढून टाकावा आणि त्याठिकाणी भोंगा लावावा. मग पहाटे जे होते ते सुरू करावे असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला.

काल आदित्य ठाकरे यांच्या गाडीला एका दुचाकीने धडक दिली. ही घटना घडली नसून घडवली गेली आहे, असा माझा आरोप आहे. आपली सुरक्षा वाढवण्यासाठी संजय राजाराम राऊत यांनी जसा प्रयत्न केला. तशाच प्रकारचा हा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे पोलिसांनी याची चौकशी करून हे षडयंत्र तर नाही ना.. याची खात्री करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. राहुल गांधी मणिपूरमध्ये संवाद साधायला गेले आहेत, याबद्दल गुणगान गाणाऱ्या राऊत यांनी राहुल गांधींच्या मणिपूर दौऱ्याबाबत सांगण्याऐवजी गोरेगावच्या पत्रा चाळीत जाऊन दाखवावे, असा चिमटाही राणे यांनी काढला.

Continue reading

इराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची चर्चा!

अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम उद्या संपत असतानाच अमेरिकेबरोबर पाकिस्तानात होऊ घातलेल्या चर्चेला इराणने नकार दिला आहे. आम्ही सरशीत असताना आमच्या अटीशर्तींवरच अमेरिकेबरोबर चर्चा होईल, असे इराणच्या लष्करी गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या होर्मूझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण...

लग्नासाठी भाड्याने मिळणार कोल्हापूरची चित्रनगरी व नितीन देसाईंचा स्टडिओ?

चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रिकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूरची चित्रनगरी तसेच कर्जतमधला एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे सांस्कृतिक...

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख...
Skip to content