Homeमाय व्हॉईससंजय राठोडना लावलेला...

संजय राठोडना लावलेला कायदा आदित्य ठाकरेंना का नाही?

एका युवतीच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात आपल्या मंत्रिमंडळातले सहकारी संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून काढून टाकणारे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तोच न्याय आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत का लावला नाही, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज केला. दिशा सालीयन हिच्या हत्त्येत आदित्य ठाकरे यांचा हात आहे, असा आरोप आहे. मग राठोड यांना लावलेला नियम, त्यांना लावलेला कायदा आदित्य ठाकरेंच्या बाबतीत का लावला गेला नाही, असे ते म्हणाले.

समान नागरी कायद्याबाबत उद्धव ठाकरे यांनी अजूनही ठोस भूमिका घेतलेली नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समान नागरी कायद्याचा नेहमी पुरस्कार केला होता. उद्धव ठाकरेंमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी समान नागरी कायद्याला बिनशर्त पाठिंबा जाहीर करावा, असे ते म्हणाले.

आदित्य

शिवसेना भवन हे हिंदुत्वाचे केंद्र मानले जाते. काल तिथे मुस्लिम बोर्डाचे मौलाना उद्धव ठाकरेंना भेटायला गेले. मग आता बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचारांवर चालणारी उद्धव ठाकरे यांची सेना तेथे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करणार का नाही? तसे जमत नसेल तर त्यांनी सेनाभवनावर लावलेला बाळासाहेबांचा फोटो काढून टाकावा आणि त्याठिकाणी भोंगा लावावा. मग पहाटे जे होते ते सुरू करावे असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला.

काल आदित्य ठाकरे यांच्या गाडीला एका दुचाकीने धडक दिली. ही घटना घडली नसून घडवली गेली आहे, असा माझा आरोप आहे. आपली सुरक्षा वाढवण्यासाठी संजय राजाराम राऊत यांनी जसा प्रयत्न केला. तशाच प्रकारचा हा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे पोलिसांनी याची चौकशी करून हे षडयंत्र तर नाही ना.. याची खात्री करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. राहुल गांधी मणिपूरमध्ये संवाद साधायला गेले आहेत, याबद्दल गुणगान गाणाऱ्या राऊत यांनी राहुल गांधींच्या मणिपूर दौऱ्याबाबत सांगण्याऐवजी गोरेगावच्या पत्रा चाळीत जाऊन दाखवावे, असा चिमटाही राणे यांनी काढला.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content