Homeएनसर्कलमातोश्री-२च्या आधी शाखा...

मातोश्री-२च्या आधी शाखा अधिकृत का करून घेतली नाही?

मुंबईत बांद्रा रेल्वेस्थानकाजवळची अनधिकृत शाखा तोडली म्हणून बाळासाहेबांचा फोटो तोडल्याचा बनाव करुन काल महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण केली. संजय राजाराम राऊत यांच्या मालकांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मातोश्री-२ अधिकृत करून घेतली. त्याआधी मुंबईतल्या अनधिकृत शाखा का नाही अधिकृत करून घेतल्या, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी केला.

मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेली शाखा तोडली जाते. का नाही घेतली ती अधिकृत करून? ते म्हणत आहेत की आदेश वर्षामधून निघाले. मागच्या अडीच वर्षांत वर्षामधूनच आदेश निघत होते ना… कंगनाचे घर, कार्यालय तोडायला लावले. नवनीत राणांच्या घरावर कारवाई करायला गेले. राणेंचा बंगला तोडण्यासाठी तुमच्या मालकांनी आणि मालकीणींनी किती फोन केले? अनधिकृत शाखा पाडली ही जर नीच कृती असेल तर मग ही जी कृती होत होती तेव्हा नीचपणा कोण करत होते? बाळासाहेबांचा फोटो काढायला महापालिका अधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती. त्यांनी फोटो तोडलेला नाही, असे ते म्हणाले.

आज सकाळी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर विठ्ठलाच्या दर्शनाला आले होते. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी हिंदूंच्या देवाचे दर्शन घेतले म्हणून त्यांना पोटशूळ उठतोय. तेच जर जामा मशिदीत नतमस्तक झाले असते तर यांना चालले असते. बीआरएस भाजपाची बी टीम आहे, असे हे म्हणतात. मग संजय राऊत यांची उबाठा काय राष्ट्रवादीची ढ टीम आहे, असा सवालही नितेश राणे यांनी केला. प्रकाश आंबेडकर जे हिंदूंची बदनामी करतात, छत्रपतींची बदनामी करतात, त्यांच्यासोबत तुम्ही युती करता? प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आम्ही मांडीला मांडी लावून बसत नाही. जे त्यांच्या सोबत बसतात त्यांना विचारा. जे जे उद्धव ठाकरेंशी निगडित आहेत त्यांना दंगली घडवायचा प्रयत्न आहे. म्हणूनच उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट व्हावी, अशी मी वारंवार मागणी करत आहे, असेही ते म्हणाले.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content