Homeबॅक पेजधनत्रयोदशीच्या दिवशी 'अशुभ'...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो मुद्दामच दक्षिणेला पेटवतात. यामागे काय कारण आहे, ते आपण जाणून घेऊ.

पारंपरिकपणे दिवाळीला मातीच्या आणि कणकेच्या पणत्या घरा-दारांत पेटवल्या जातात. अलीकडच्या बदलत्या काळात घराच्या दारात किंवा घरासमोर उंच जागी, एखाद्या झाडावर किंवा घराच्या छप्परावर आकाशकंदील लावला जातो. हा आकाशकंदील म्हणजेच आधुनिक युगातील आकर्षक दिवाच! धनत्रयोदशीच्या दिवशी लावलेला हा दिवा कार्तिक पौर्णिमेपर्यंत तेवत ठेवण्याची प्रथा आहे.

यमदेवाच्या आदरार्थ पेटवला जातो दिवा

धनत्रयोदशीच्या दिवशी पेटवलेला हा आकाशकंदील दक्षिण दिशेला लावण्याची प्रथा आहे. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो मुद्दामच दक्षिणेला पेटवतात. यमदेवाच्या आदरार्थ तो पेटवला जातो, असे मानले जाते. यासंबंधाने एक पुराणकथा सापडते.

“हे” कराल तर कधीही अकाली मृत्यू येणार नाही!

पुराणकाळी हैम नावाचा एक राजा होता. त्याच्या मुलाचा लग्नानंतर चौथ्याच दिवशी सर्पदंशाने मृत्यू झाला. स्वतः यमाच्या दूतालाही या मुलाचे प्राण घेऊन जाताना खूपच दुःख झाले. त्याने आपल्या मनातील सल यमराजासमोर बोलून दाखवली. तेव्हा यमाने सांगितले की, जो कोणी धनत्रयोदशीपासून पाच दिवसापर्यंत आपल्या घराच्या दारात दिवे पेटवेल, त्याला कधीच अकाली मृत्यू येणार नाही. तेव्हापासून लोकं धनत्रयोदशीला आपल्या दारात दिवा पेटवायला लागले.

स्वर्गवासी पूर्वज अदृश्यरूपाने येतात घरात वास्तव्याला

या पुराणकथेत तथ्य असो वा नसो, परंतु ती पिढ्या दर पिढ्या मुलांना ऐकवली जाते. दिवाळीला दारात आकाशकंदील लावला, तर त्या उजेडात आपले स्वर्गवासी पूर्वज अदृश्यरूपाने उत्सव काळात वास्तव्याला येतात, अशीसुद्धा कथा काही भागात मुलांना ऐकविली जाते.

धनत्रयोदशीला नवीन वस्तू घरात आणण्याची प्रथा

धनत्रयोदशीच्या दिवशी काहीतरी नवीन वस्तू खरेदी करून घरात आणण्याची प्रथा आहे. असे केल्याने धनलक्ष्मी प्रसन्न होते, अशी समजूत आहे. आदिमकाळी या दिवशी शेतीप्रधान संस्कृतीत हंगामातील कापणीचे नवे धान्य घरी आणले जायचे. त्या पुरातन परंपरेतून पुढे धनत्रयोदशीला नवी वस्तू घरात आणण्याच्या प्रथेचा उगम झाला असावा, असे मानले जाते.

Continue reading

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १०...

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....
Skip to content