Homeडेली पल्सउद्धवजी.. तेव्हा तुमची...

उद्धवजी.. तेव्हा तुमची नैतिकता कोणत्या डब्यात बंद होती?

उद्धव ठाकरे यांनी आपण नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. मग भारतीय जनता पार्टीबरोबर निवडणूक लढवून काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार बनवताना आपण आपली नैतिकता कोणत्या डब्यात बंद केली होती, असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल एका पत्रकार परिषदेत केला.

उद्धव ठाकरे यांनी खुर्चीकरीता विचार सोडला तर एकनाथ शिंदे यांनी विचारांसाठी खुर्ची सोडली. ते सत्तेत होते, मंत्री होते. ते सत्ता सोडून विरोधकांकडे म्हणजे आमच्याकडे आले. हे लक्षात आल्यानंतर ठाकरे यांना कळलं की, आपल्याकडे संख्याबळ नाही, आपण हरणार आहोत. आपले लोक आपल्याला सोडून गेले आहेत. त्यामुळे लाजेपोटी, भीतीपोटी अविश्वासाच्या ठरावाला सामोरे न जाता त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, असेही फडणवीस म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लोकशाहीचा, लोकमताचा विजय झाला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पाणी फिरले. उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचवेळेला अपात्र सदस्यांच्या अपात्रतेच्या विषयावर निर्णय घेण्याचे सर्व अधिकार अध्यक्षांकडे दिले. हे प्रकरण इतके असाधारण नाही की आम्ही त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने जे निर्णय घेतले आहेत, तसे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्यांना आहे. ते स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात. त्यांना आम्ही कोणत्याही पद्धतीची बाधा आणू शकत नाही. एकाच पक्षावर दोन किंवा त्यापेक्षा अधिक गटांनी दावा केल्यानंतर अध्यक्षांना याचा अधिकार आहे की ते राजकीय पक्ष कोणता आणि कोणाकडे आहे, हे निश्चित करू शकतात. राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी निमंत्रित केले हे योग्यच आहे,  संवैधानिकच आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

घटनाबाह्य बोलणारे झाले कालबाह्य – एकनाथ शिंदे

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आमचे सरकार घटनाबाह्य म्हणणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने चांगली चपराक बसली असून ते आता कालबाह्य झाले आहेत. सदस्यांच्या अपात्रतेबद्दल अध्यक्ष मेरीटप्रमाणे निर्णय करतील.

आजही हे लोक म्हणतात की, आमच्याच पक्षाचा व्हिप लागणार… माणसे किती आहेत? तुम्ही धनुष्यबाण गहाण ठेवला. आम्ही तो वाचवला. त्याला वाचवण्याचं काम आम्ही केलं आणि निवडणूक आयोगाने आम्हाला शिवसेना हे पक्षाचे नाव तसेच धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह दिले आहे. त्यामुळे फक्त लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे शिवसेना, शिवसेना करत आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Continue reading

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच 'भूकंप'सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले....

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ‘वेपिंग’ करताना कॅमेऱ्यात कैद!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला असला, तरी सध्या चर्चा मात्र त्यांच्या विजयाची नाही, तर कर्णधार रियान परागच्या एका वादग्रस्त कृत्याची होत आहे. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना रियान पराग 'वेपिंग' (ई-सिगारेटचा...

सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत माओवादी इस्रायल पूर्ती ठार

झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील सारंडा वनक्षेत्रात सुरक्षादलांसोबत झालेल्या भीषण चकमकीत 'पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया' (पीएलएफआय)चा सक्रिय सदस्य आणि १ लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी इस्रायल पूर्ती मारला गेला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कोब्रा २०९ बटालियन, झारखंड पोलीस...
Skip to content