Homeडेली पल्सया संत्र्यांचं करायचं...

या संत्र्यांचं करायचं काय…

संत्रानगरीत तुमचे स्वागत आहे, हा बॅनर पुन्हा नागपूरमध्ये लावू नका, अशी मागणी आमदार देवेन्द्र भुयार यांनी केली. संत्र्यांच्या ज्यूसशिवाय त्यांचा काही उपयोग नाही आणि खाऊन खाऊन खाणार किती? कारण बांग्ला देशने आपली संत्री घेतलेली नाहीत. त्यामुळे, या संत्र्यांचं करायचं काय, हा प्रश्न संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे, असे भुयार यांनी विचारले.

आमदार अनिल देशमुख यांनी संत्र्याच्या सीझन संपल्यावर सरकारने निर्णय घेतल्याचा आरोप करतानाच इतके दिवस सरकार झोपले होते का, असा प्रश्न विचारला. त्यावर मंत्री सत्तार यांनी सांगितले की, मी स्वतः मतदारसंघात जाताना नागपूरमधून संत्री विकत घेऊन गेलो असल्याने संत्र्याचा सीझन किंवा हंगाम संपला, असे कसे म्हणता येईल…

आमदार रोहित पवार यांनी विचारले की, तुम्ही निर्णय उशिरा घेतला म्हणून हेक्टरी मदत जाहीर करून सहाशे कोटी रुपयांचे पॅकेज संत्रा उत्पादकांना देणार का… पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी रोहित पवार यांच्या मागणीचा विचार करू आणि त्यावर संत्रा उत्पादकांचे नुकसान झाले असल्यास मंत्रिमंडळासमोर जाऊन मदतीचा विचार करू, असे सांगितले.

शेतमाल निर्यातीचे प्रोटोकॉल असतात. पण केंद्र सरकारच्या त्याबद्दलच्या निर्णयामध्ये संत्र्याचा उल्लेख नाही. संत्र्यासह विविध लिंबूवर्गीय फळांच्या निर्यातीसंदर्भात सामंजस्य करार झालेला आहे. त्यार प्रभावी काम झालेले नाही, याकडे आमदार यशोमती ठाकूर यांनी लक्ष वेधले. मंत्री सत्तार यांनी उत्तर दिले की, आपण एक बैठक घेऊन केंद्र सरकारकडे जाऊ. केंद्राचा करार आहे आणि राज्य सरकारला भूमिका नाही. पण राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर केंद्राकडे जाऊ, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.

आजही विरोधक पायऱ्यांवर

नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आज, अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही नागपूरमध्ये कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचा विषय उपस्थित करत ही निदर्शने करण्यात आली.

Continue reading

बहुभाषिक ॲक्शन चित्रपट ‘राजा शिवाजी’ महाराष्ट्रदिनी होणार प्रदर्शित!

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीने आज एक अत्यंत महत्वाकांक्षी घोषणा केली आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत, भव्य ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा 'राजा शिवाजी' हा चित्रपट येत्या महाराष्ट्रदिनी, १ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी,...

पटकथेसाठीचे वनलाईनर गुंफून लिहिलेले ‘फिल्मी कथा’चे प्रकाशन

सुमारे ३० ते ३५ वनलाईनर एकत्र गुंफून अभिनेते आणि सिद्धहस्त लेखक प्रकाश राणे यांनी लिहिलेला "फिल्मी कथा" हा कथासंग्रह डिंपल प्रकाशनच्या वतीने अंधेरी येथे प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकाचे प्रकाशन सुसंवादिनी मंगला खाडिलकर, निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी, अभिनेत्री गायिका रसिका धामणकर (अबोली मालिकेमधील...

‘कप बशी’त दिसणार पूजा सावंत आणि ऋषी मनोहर!

नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत होत असतात. आता आगामी "कप बशी" या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून सध्या मुंबईत या चित्रपटाचे चित्रिकरण...
Skip to content